Thursday, 22 August 2019

हरवली झडीतली ‘घोंगशी’


हरवली झडीतली ‘घोंगशी’





तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्यांच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ 


एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीनं सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया लोेकांना कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडली तरी काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़ 


काही शेतकरी दोघा-तिघांच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’ त  पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान फायद्यावि

षयी बोलू दाखवितात.  डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा अंदाज लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडं चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीनं जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़


घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरंही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा पडलेला असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातली धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोरगं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े शाळालाही सुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या, पुराच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू घोटत नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़

रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची  ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर गारठा वाढत जातो, थंडीनं हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते, तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़


दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं, तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़, आम्ही ती गमावून बसलो़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ काय असते, ते उमगत नाही, आम्हीही त्याचा अर्थ सांगत नाही़ झडचं नाही तर बोटानं दाखवणार काय? गावातल्या तलावातील पाणी हाच ‘पूर’ म्हणून सांगितला जातो. पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ कारण माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं निसर्गाच्या पायावर कुºहाडीचे, तंत्रज्ञानाचे कित्येक घाव घातले. जल, जंगल, हवा नासवून टाकली. विज्ञानानं माणसाच्या नको त्या विकासासाठी ‘विजय’ मिळविला असला तरी त्यासाठी बुद्धी गहाण टाकून स्वत:ची इतकी हानी करवून घेतली, की आता भरपाई होणं अशक्य आहे़ निसर्गाच्या विरोधात केलेल्या पापाचे परिणाम अख्खी मानवजात कुढत कुढत आज भोगत आहे़ 


संजय मुंदलकर

‘गावाकडची बेंबळा’ संग्रहातून

मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा...

मैं  हवा  हूँ कहाँ वतन  मेरा...


जमिनीवर, पाण्यावर इतकेच काय आकाशावरही आपला मालकी दावा सांगत त्याने इतरांचा हक्क नाकारला. दुसºयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आणि त्यातून  सत्तासंघर्ष  सुरू   झाला. सीमा बांधल्या गेल्या. मना-मनात भींती उभ्या राहिल्या. दुसºयांना हीन लेखणे, खालच्या दर्जाची वागणूक सुरू झाली. 

माणूस ...एक हाडा मांसाचा देह. पंचमहाभूतापासून बनलेला असल्याचे सांगण्यात येते. या माणसाजवळ असलेल्या मेंदूने आकाश, पाताळ, धरती, भूकंप, वारा, पाऊस, उन्ह, थंडी, वादळवारा, वावटळ, चक्रीवादळ आदींवर विजय मिळवला.  इतकेच काय चंद्र, मंगळ ग्रहावरही त्याने पाऊल ठेवले. आता तर तो सूर्यावरही जाण्याचा भाषा करत आहे. हाती आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याने साºया अत्याधुनिक सुविधांना आपल्या पायाशी लोळण घेण्यास भाग पाडले़ आरामदेही सुखानेही त्याच्यापुढे शेपूट हलवले. मात्र, त्याचवेळी त्याच्या अधोगतीचे संकेतही मिळाले होते. कारण या मानवाला सत्तेचा अहंकार, संपत्तीचा माज, अधिकाराचा गर्व होणे हे निश्चित होते.जमिनीवर, पाण्यावर इतकेच काय आकाशावरही आपला मालकी दावा सांगत त्याने इतरांचा हक्क नाकारला. दुसºयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आणि त्यातून  सत्तासंघर्ष  सुरू   झाला. सीमा बांधल्या गेल्या. मना-मनात भींती उभ्या राहिल्या. दुसºयांना हीन लेखणे, खालच्या दर्जाची वागणूक सुरू झाली. 
या सत्तासंघर्षातून काही महिन्यांपूर्वी जगातील माणुसकीला ओरडून आपल्या अस्तित्वाची ओरडून साद घालणारे छायाचित्र साºया जगाने पाहिले. आॅस्कर अलबर्टो मार्टिनेज रामिरेज आणि त्यांची अवघी २३ महिन्यांची चिमुरडी वालेरिया यांच्या नदीतील मृतदेहाचे ते छायाचित्र होते. ज्यावेळी माणुसकीने डोळे मिटले, त्याचवेळी या दोघा बापलेकीने डोळे मिटले असणार.  मध्य अमेरिकास्थित अल सल्वाडोर या देशातील आॅस्कर अलबर्टो  मार्टिनेज  रामिरेज हा  आपल्या  वालेरिया नावाच्या मुलीसोबत अमेरिकेत शरण घेण्यासाठी  निघाला होता. मात्र, यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घालत सीमेवरील रियो ग्रांडे नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपल्या लाडक्या चिमुरडीला आपल्या टी-शर्टमध्ये बांधले होते. नदीच्या प्रवाहात आपल्यापासून विलग होऊ नये  यासाठी त्याने मुलीला  स्वत:ला टी शर्टच्या  बांधले होते. त्या चिमुकलीनेही आपल्या वडिलाच्या गळ्यात  मागून  हात  टाकत घट्ट  धरून  ठेवले  होते. दोघांचेही दुर्दैव आड आले आणि सुरक्षित आयुष्याचे स्वप्न नदीत वाहून गेले. त्यांच्याकडे पाहून पाठमोरे झोपलेले असल्याचे भासते. काही क्षण असे वाटून  जाते  की  ते खरोखरच झोपलेले असणार; पण नाही, कधीही न उठण्यासाठी  नियतीने  त्यांना कायमची झोप घातली होती.  ते  दृश्य पाहून अनेकांच्या संवेदनशील  मनाला कापरे फुटले, डोळे  डबडबले, अंग शहारले, मन मन ओरडले असणार!  आणि तसे  घडले नसेल तर या जगाची किंमत शून्य आहे...अगदी शून्य!  आॅस्करची आई रोजा रामिरेज यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अलबर्टो अमेरिकेत शरण मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याला अमेरिकन अधिकाºयांसमोर हजर  व्हायचे होते. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. यासाठीच  २३ जून रोजी  अलबर्टोने मुलगी वालेरिया आणि पत्नी तानिया वानेसा अवालोस हिच्यासोबत नदी पार करत अमेरिकेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. नदी पार करत असताना  नदीच्या प्रवाहात बाप-मुलीला आपला जीव गमवावा लागला. तानिया  यांच्यानुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब व्हिजावर मागील दोन महिन्यांपासून मॅक्सिकोमध्ये वास्तव्यास होते. त्यांना अधिकृतरित्या अमेरिकेत वास्तव्य करावयाचे होते; परंतु संधी मिळत नसल्याने नदीतून जाण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी सुरुवातीला आॅस्करने वालेरियाला हिला सुरक्षितरित्या दुसºया किनाºयावर पोहोचवले. ते मला घेण्यासाठी परत निघाले असता वालेरिया घाबरली. तिनेही नदीत उडी घेतली. मग तिला वाचवण्यासाठी आॅस्करने प्रयत्न केला;पण दोघेही वाहून गेले. ज्या  ठिकाणी  या बाप-मुलीचे  शव  आढळले  ते ठिकाण अमेरिकेच्या टेक्सास सीमेपासून केवळ १०० यार्ड म्हणजेच ३०० फुटांवर होते, तर जवळपास केवळ दीड किलोमीटर अंतरावर मॅक्सिको आणि अमेरिकेला जोडणारा एक आंतरराष्ट्रीय पूल आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅक्सिकोच नव्हे तर संपूर्ण जगातून अवैध पद्धतीने अमेरिकेत शरण घेणाºयाप्रति कठोर भूमिका घेतली आहे. 
मॅक्सिकोच्या संपूर्ण सीमारेषेवर भिंत घालण्याचाही निर्णय त्यांनी घेतला असला तरी देखील अमेरिका-मॅक्सिकोच्या सीमेवर हजारो शरणार्थी अमेरिकेत दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या संसाधनांवर पहिला हक्क स्थानिक नागरिकांचा आहे. शरणार्थींमुळे त्यांना रोजगार मिळत नाही, अशी कठोर भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी  यापूर्वीच स्पष्ट केली आहे. यूएस बॉर्डर पोलिसांनुसार २०१८ मध्ये सीमेवर २८३ शरणार्थींचा मृत्यू झाला आहे. आॅस्करलाही अमेरिकेत प्रवेश न मिळण्यावर सत्तासंघर्ष, बांधलेल्या सीमा आणि मना-मनात उभ्या राहिलेल्या भींती कारणीभूत ठरल्या होत्या. यावेळी उस्ताद अहमद  हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेली गझल आठवते, मैं  हवा  हूँ कहाँ वतन  मेरा...

© संजय इस्तारी मुंदलकर