Thursday, 26 September 2019

सामूहिक आत्महत्यांची ‘स्लो पॉयझिंग’


सामूहिक आत्महत्यांची ‘स्लो पॉयझिंग’


 बेसुमार जंगलतोड, जमिनीत पावसाचे पाणी न मुरणे, नद्यांचा प्रवाह रोखणे, प्लास्टिमुळे कचºयांचा ढिग, जमिनीतील पाण्याचा प्रचंड उपसा, नद्या बुजवणे, रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर अशा अनेक कृत्यांतून मानवाने निसर्गाच्या विरोधात मागील अनेक दशकांपासून आपल्याच पायावर कुºहाड मारून घेतली आहे. आता एक प्रकारे जगात सामूहिक आत्महत्यांची ‘स्लो पॉयझिंग’ प्रारंभ झाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
साधारण: कोणत्याही जागतिक विषयांशी संबंधित परिषदा वा बैठका वा सभांमध्ये आंतरराष्ट्रीय नेते, तज्ज्ञ मंडळी उपस्थित असतात़ ही पूर्ण अधिकारप्राप्त आणि विचाराने प्रगल्भ अशी मंडळी असतात; परंतु या सर्व प्रकाराला स्विडनमधील केवळ १६ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने छेद दिला आहे. हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघाच्या न्यू यॉर्क शहरात कालपरवा पार पडलेल्या हवामान कृती परिषदेत ती उपस्थित होती. यावेळी तिने उपस्थितांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला. हे सर्व चुकीचे होत आहे. मी इथे थांबायला नकोय. समुद्राच्या दुसºया बाजूला असलेल्या शाळेत मी जायला हवे. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी माझी स्वप्नं आणि माझं बालपण हिरावून घेतले असल्याचा थेट आरोप ग्रेटाने केला. थानबर्ग हिने आपले प्रश्न जगाच्या नेत्यांसमोर ठेवले आणि त्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ग्रेटा थनबर्ग हिला ‘राईट लाईव्हलीहुड अवॉड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या शक्तीविरोधात युवा आंदोलनाचा आवाज बनलेल्या गे्रटाला पुरस्कार बहाल करताना स्वीडिश मानवाधिकार पुरस्काराच्या ज्युरीने जाहीर केले की, या अवॉर्डला ‘पर्यायी नोबल पुरस्कार’ या नावानेही ओळखल्या जाते. १० लाख स्विडिश मुद्रा अर्थात १०,३०० डॉलर्स इतक्या रकमेचा पुरस्कार तिला मिळणार आहे. उल्लेखनिय की जागतिक पर्यावरणाविषयी जागृतीसाठी ग्रेटाने तब्बल एक वर्षाची शाळेतून सुटी घेतली आहे़ तिचे हे समर्पण पाहून १५०पेक्षा अधिक देशातील ४० लाखांहून अधिक तरुणांनी काही दिवसांपूर्वी याविषयीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विशेष असे की मार्च २०१९ मध्ये तिला शांततेच्या नोबेलसाठी नामांकन मिळाले आहे.
बैठकीचे आयोजन करणारे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटेनियो गुटेरेस यांनी सांगितले, की जगावर एक मोठे हवामान संकट आले आहे आणि त्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे. वेळ संपत आहे; पण आता उशीरही झालेला नाही. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल म्हणाल्या, की जगातील वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आपला देश दुप्पट खर्च करेल. फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनिल मॅक्रॉन म्हणाले, की उष्णकटिबंधीय जंगलांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अतिरिक्त मदत देण्याचे वचन दिले. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी जगात गोष्टी बदलू लागल्याचे सांगितले. परिषदेला जगभरातील नेत्यांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. जागतिक हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत, हे आधी आपल्याला स्वीकारावे लागेल. तसेच, चर्चा करण्याचे दिवस संपले असून आता कृती करण्याची गरज आहे,असे मोदी यावेळी म्हणाले.
जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ) च्या अहवालात असे म्हटले आहे की गेल्या पाच वर्षांत कार्बन उत्सर्जनात २० टक्के इतकी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत हे विक्रम नोंदवणारे सर्वात उष्ण वर्ष होते. म्हणजेच २०१४ ते २०१९ या पाच वर्षात जगाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते.
इम्पीरियल कॉलेज लंडनच्या ग्रँथमहॅम संस्थेचे अध्यक्ष आणि वाचन विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्राध्यापक ब्रायन हॉकिन्स म्हणाले, की आपण शाळकरी मुलांचा आवाज ऐकला पाहिजे. कारण आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती जगावर आली आहे.
भारतात दरवर्षी उष्णतेचे नवनवे विक्रम होत आहेत. पारा तब्बल ४९ अंश सेिल्सअसपर्यंत जात असल्याने जगणे असह्य झाले आहे. कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने पृथ्वीचे तापमान येत्या शतकांपर्यंत २ ते ४ अंश इतके वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा भारतातील १० शहरांचे तापमान जागतिकस्तरावर पोहोचले होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर हे शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये गणले जात आहे. देशातील  काही भागात  एवढी उष्णता वाढेल की त्या वातावरणात जगणेही कठीण होईल अशी भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
कार्बन उत्सर्जन वाढल्याने जगभरातील तापमानात वाढ होत आहे. केवळ भारतातच नाही तर चीन, ब्राझील, स्पेन, नेपाळ आणि झिबॉम्बे या देशांचाही यात समावेश आहे. मॅसाच्युसेट्स  इन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी असे म्हटले की चालू शतकाच्या शेवटपर्यंत पृथ्वीच्या तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. प्रचंड प्रदूषणामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढत आहे. मानवाने नैसर्गिक संपत्तीची बेसुमार लूट केल्यामुळे निसर्गानेही आता आपला हात दाखवणे सुरू केले आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये  गेल्या १०० वर्षांमध्ये कधी नव्हे इतकी उष्णता यावर्षी जाणवली. त्यामुळे हा धोक्याचा  इशारा असून सर्वांनी मिळून प्रयत्न केले नाहीत तर धोका अटळ आहे, असा इशाराही पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.
युरोपमध्येही उष्णतेच्या लाटेचा फटका बसला असून पॅरिसमध्ये तापमान ४०अंशावर पोहोचले आहे. गेल्या ६५ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याचे सांगण्यात येते.  फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या देशांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यात फ्रान्सला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.आॅगस्ट २००३ मध्ये फ्रान्समध्ये अशीच उष्णतेची लाट आली होती. या  लाटेत सुमारे १५ हजार जणांचा बळी गेला होता. त्यावर्षी तापमानाने ४४  अंशांचा आकडा गाठला होता. रात्रीसुद्धा किमान तापमान २०अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होते. जागतिक तापमानवाढीचा  परिणाम  केवळ  निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून तो आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावरसुद्धा होत आहे. अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील हालचाली वाढतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे दोन्ही ध्रुव थरथरत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सन १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या ध्रुवाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. नासाच्या ‘जेट प्रपोल्शन लेबॉरटरी’चे वैज्ञानिक सुरेंद्र्र अग्निहोत्री आणि एरिक एविन्स यांनी पृथ्वीच्या थरथरण्याचे कारण हे जागतिक तापमानवाढीमुळे होणाºया ध्रुवीय बर्फ वितळण्यामुळे आणि  त्यातून वजनाच्या अस्ताव्यस्त प्रमाणामुळे असल्याचे संशोधनाअंती सिद्ध केले आहे. त्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून समुद्रातील पाण्याच्या हालचालींचा अभ्यास  केला होता. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ मासिकात काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा निष्कर्ष प्रकाशित झाला आहे. विसाव्या शतकात ध्रुव थोडेसे  कॅनडाकडे झुकल्याचे आढळले; परंतु २००२ नंतर ते इंग्लंडकडे झुकल्याचे आढळले असून अक्षाची गती दरवर्षी ७ इंचाने पूर्वेकडे वाढत आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे धृवावरील बर्फ वितळले. विशेषत: २००३ पासून ग्रीनलंडवरील  २७३ ट्रिलियन  किलो, तर पश्चिम अंटार्क्टिकावरील  १२४ ट्रिलियन किलो बर्फ वितळले. मात्र, पूर्व अंटार्क्टिकेवर ७४ ट्रिलियन किलो बर्फ दरवर्षी जास्त गोळा होत गेले. त्यामुळे सागरी प्रवाहात आणि पातळीतही बदल होत आहे. याच असमतोलामुळे पृथ्वीचे ध्रुव थरथरत असल्याचे म्हटले आहे.जागतिक तापमानवाढीमुळे अवर्षण, अतिवृष्टी, अल-निनो, तापमानवाढ, अशा मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. मानवाने निसर्गाविरोधी केलेल्या अक्षम्य अशा चुकांमुळे भविष्यात काय होणार आहे, हे आजच सांगता येत नाही.
जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांचे वितळणे चिंतेची बाब बनली आहे़ १९६० च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला; परंतु नेमके परिणाम कोणते याचा शोध  त्याकाळी लागणे अवघड होते. १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील, याबाबतचा मागोवा  घेणे सुरू  झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम  दिसून आला़ हिमनद्यांवर गेल्या १०० वर्षांत जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. तापमानवाढीने  पडणाºया बर्फापेक्षा  वितळणाºया बर्फाचे प्रमाण अधिक झाले.
शास्त्रज्ञांनुसार, यात हिमनद्या मागे पडल्या. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता आणि आता तो की झाला बर्फ आह याशिवाय हिमालय, आल्प्स, आन्देस अशा महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही हाच प्रकार आढळून आला आहे. या हिमनद्या पाणी पुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.  मात्र, त्या नष्ट  पावल्या तर नद्यांवर अवलंबून असणाºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित आहे. बेसुमार जंगलतोड, जमिनीत पावसाचे पाणी न मुरणे, नद्यांचा प्रवाह रोखणे, प्लास्टिमुळे कचºयांचा ढिग, जमिनीतील पाण्याचा प्रचंड उपसा, नद्या बुजवणे, रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर अशा अनेक कृत्यांतून मानवाने निसर्गाच्या विरोधात मागील अनेक दशकांपासून आपल्याच पायावर कुºहाड मारून घेतली आहे. आता एक प्रकारे जगात सामूहिक आत्महत्यांची ‘स्लो पॉयझिंग’ प्रारंभ झाली आहे.
© संजय इस्तारी मुंदलकर