Saturday, 29 February 2020

तेलाचं बोटं...

 लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.


प्रसंग १ : लहानपणी आई केसाला फक्त तेलाचं बोट लाव, असं सांगायची. आम्हाला मात्र मोठ्या अनिच्छेनं केलेल्या आंघोळीनंतर केसांना चिप...चिप करायची सवय होती. त्यामुळं हा प्रकार आईच्या लक्षात आला की, कधी कधी तिच्या हातचा धपाटा बसायचाच बसायचा! मात्र, आई फक्त तेलाचं बोटच लाव, असं का म्हणते, हे काही अजूनही समजलंं नाही.
प्रसंग २ : एकदा आई जेवताना म्हणाली होती, की भाजी ‘लव लव’ खा. असं ती अनेकदा म्हणायची. यातून हा जेवायचा, तो जेवायचायं, असं  तिला सूचवायचं असे. ‘लव लव’ खा, या वाक्याचा अर्थ तिला भाजीला भाकर ही ‘लावून लावून’ खा अर्थात भाजी थोडी खा. जेवणारी मंडळी बाकी आहे, असं काहीसं सांगण्याचा तिचा हेतू असायचा; पण आईच्या बोलण्यातून येणाºया तेवढ्या दोन-चार वाक्याचा अर्थ समजायला आम्हाला अर्ध आयुष्य लागलं.
प्रसंग ३ : तिदस्ताच्या दिवाळीपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या आसपास पोहोचले होते. तो ८२ रुपयांवर अनेकदा टांगता राहिला़ आज काल ८० रुपयांच्या आसपास झुलता असतो. सांगायचे हे की पेट्रोल महाग झाले तरी दुचाकी वा तत्सम वाहने वापरणाºयांची संख्या कमी झालेली नाही़़़होणारही नाही. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने महागाईची झळ नको तितकी सोसावी लागत असली तरी भारतवासी ज्याप्रमाणे नेटपँक कितीही महाग झाला तरी मोबाईलचा वापर करणे सोडणार नाही, त्याचप्रमाणे वाहन विकत घेणे आणि त्याला रस्त्यावर दौडवणे (चालवणे) सोडणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. अर्थातच आजच्या अर्थपूर्ण आर्थिक घडीला मागणी तसा पुरवठा होण्याची स्थिती नाहीच मुळी...कारण लोकसंख्या...





सांगायचं असे की १९ व्या आणि २० व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे अर्थात विविध संशोधनामुळे जगाचा जन्मदर  वाढला. यात मनुष्याचे आयुर्मान वाढले असले तरी तीव्र गतीच्या लोकसंख्यावाढीमुळे अन्नधान्य, निवारा, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी यासारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात  प्रगती साधली असली तरी आता कोणत्याही क्षेत्रातील विकासाला ही अवाढव्य  लोकसंख्या मुख्य अडथळा ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी आपली, समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जगाची ऐशोआरामाची वृत्ती वाढली. दुचाकी, चारचाकी वाहनांची गरज सरली; पण शौक निर्माण झाला. कुठलीही गरज नसताना महागडे मोबाईल हाती आले. सर्व आयुष्य आँनलाईन झाले. कुणालाही वेळ राहिला नाही़ संवाद संपला. सुख-दु:खाची विचारणा संपली़ महिला, बालकांवरील अत्याचार वाढले आणि अधोगती सुरू झाली.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्यादिन साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.

श्वास तुटत चालला 

लोकसंख्यावाढीने  केवळ खाण्यापिण्याच्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर जमिनीतील पाणी संपतेय, प्रदूषण इतके वाढले की हवेतील प्राणवायू संपतोय, दुष्काळ पडतोय, महापूर येतोय, सूर्याचं  तापमान  वाढतेय, हे सर्व एका दिवशी झालेले नाही, तर मागील अनेक वर्षापासून तीळतीळ  सुरू  आहे आणि त्यातूनच मानवाचा श्वास तुटत चालला आहे.  परिणामी मोठ्या समस्या निर्माण झाल्याने विकासकामे जागच्या जागी थांबली. लोकांना मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या.  मुलगाच हवा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म  दिला जातो. अशिक्षित असो शिक्षित लोकसंख्यावाढीच्या परिणामाची चिंता कुणातही दिसून येत नाही. यावाढीमुळेच  समाजात विसंगत आर्थिक स्थिती  निर्माण झाली. आजच्या घडीला एकीकडे एका घरात सरासरी चार-चार दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी वाहन, प्रशस्त  महागडे घर आणि आधुनिक सुविधा दिसून येत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, गरिबी, एक वेळच्या भुकेसाठीही अन्न मिळत नाही, भीक मागण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, हे विरोधी  चित्र अनुभवास येते. ही स्थिती बदलण्यासाठी  लोकसंख्या  नियंत्रणाचा  उपाय होता़ मात्र, ती वेळही  कधीचीच निसटून गेली आहे. आता ओढूनताणून केलेल्या  उपायांचा परिणाम तत्काळ  दिसून  येणार नाही. त्यासाठी पुढील १०० वर्षे वाट पाहावी  लागेल, असे तज्ज्ञ सांगतात़ ते सर्व पाहायला आम्ही असू की नाही, शंका आहे. तितकीच शंका या जगाच्या अस्तित्वाबाबतची आहे.         
                                               
© संजय इस्तारी मुंदलकर                                                                    

Tuesday, 18 February 2020

बेटी बचाओ, राजनिती पढाओ  

यंदाच्या १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्टÑात शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले.  यात भाजपचे  २४, शिवसेनेचे १८, राष्टÑवादीचे  चार, तर काँग्रेस आणि एमआयएमचा  प्रत्येकी एक खासदार  निवडून आला आहे. यापैकी आठ महिला खासदार संसदेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात भाजपकडून सर्वांधिक पाच, शिवसेना, राकाँ, अपक्ष  यांचे प्रत्येकी एकेक मिळून एकूण आठ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून                        एकू ण ८६७ उमेदवारांपैकी ८० महिला उमेदवारांना विविध पक्षांनी निवडणूक  रिंगणात उतरवले. यापैकी आठ महिलांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकीय कुटुंबातीलच आहेत. यात मुलगी, सून, अशी नाते जपणाºया आहेत. सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडून आल्या.  भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रीतम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हीना गावीत (भाजप-नंदुरबार), पूनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या सर्व लोकसभेसाठी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
बारामती मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांच्यावर मात केली.  सुळे यांनी आपल्या विजयाची हँट्ट्रिक केली आहे. कारण त्या  तिसºयांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. मागील  निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचेच शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व  माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. मागील निवडणुकीत त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.(यंदा मात्र त्यांचा हा मान अन्य ओडिशातील महिला उमेदवाराकडे गेला आहे.) २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्टÑवादीचे मनीष जैन यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता.
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांना पराभूत केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि  त्या विजयी ठरल्या. आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यावर मात केली. यंदा त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या निवडणुकीत हीना गावीत यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीतही पूनम -प्रिया असाच सामना रंगला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यां                                                     नी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ  यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आनंदराव आडसूळ यांनी राष्टÑवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना  पराभूत केले होते. पराभवाची परतफे ड करीत नवनीत लोकसभेवर निवडून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राकाँ उमेदवार धनराज महाले यांचा पराभव केला.
देशपातळीवर पाहिले तर १७  व्या लोकसभा निवडणुकीतील ५४२ वजयी उमेदवारांत महिला सदस्यांची संख्या केवळ ७८ इतकी आहे. विशेष म्हणजे महिला खासदारांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून त्यांची टक्केवारी ही १७ इतकी आहे. यापूर्वी महिला सदस्यांची सर्वाधिक संख्या ही नवव्या लोकसभेत २८ इतकी होती. राष्टÑीय निवडणूक आयोगाद्वारा लोकसभेच्या  ५४२ जागांबाबत केलेल्या निकालानुसार, यंदा निवडून आलेल्या सर्वाधिक ४० महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर  निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून  संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजय मिळाला आहे.याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष  राहुल  गांधी यांचा पराभव करत  विजय मिळवला  आहे. मनेका गांधी सुल्तानपूर आणि अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल  यांनी मिर्झापूर येथून निवडणूक जिकंली आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा , प्रज्ञा ठाकूर भोपाळ, मीनाक्षी लेखी  नवी दिली, किरण खेर चंडीगड आणि रिता बहुगुणा जोशी यांनी अलाहाबाद  येथून विजय मिळवला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून  तृणमूल काँग्रेस उमेदवार मुनमुन सेन, सलचर येथील सुष्मिता देव, सुपोल येथून रंजीत रंजन कन्नोज येथून समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, रामपूर येथून भाजप उमेदवार जयाप्रदा यांचा मात्र पराभव झाला.
यात उल्लेखनीय असे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून एकूण ८ हजार ४९ उमेदवार मैदान  उतरले होते. आणि यापैकी केवळ ७२४ महिला उमेदवार होत्या, जे प्रमाण कमीच आहे. काँगे्रसने सर्वाधिक ५४  आणि भाजपने ५३ महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवले होते. अन्य राष्टÑीय पक्षात बसपाने २४, तृणमूल कांग्रेसने २३, माकपाने १०, भाकपाने चार आणि राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने  एक महिला उमेदवाराला तिकीट दिली.अपक्ष महिला उमेदवारांचा संख्या २२२  इतकी होती, तर चार ट्रान्सजेंडर उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राजकीय पक्ष अपयशी

यंदा राज्यातील राजकारणाला दोनदा उभारी मिळाली. मे महिन्यात लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के)उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती.
याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता  टिळक भाजप (पुणे), मंजुळा  गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज   बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.

नातेसंबंधांना प्राधान्य

भारतीय लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला  नाही, जी  काही  उमेदवारी दिली आहे, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून येते. कारण तेच ते चेहरे पुढे आणले आहे. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिले आहे. यावरून  नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले  असे म्हणता येईल. राष्ट्रीयच काय पण प्रादेशिक पक्षानेही आपल्या किती जागा निवडून येवू शकतात, याचाच विचार केल्याचे दिसून येते.
एकीकडे महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्षित करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सदोदित चालू आहे. भारतीय लोकसंख्या ही आता तरुणांची आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते.
भारतीय राजकारणाने आता भारतीय महिलांना अन्य क्षेत्रासोबतच  राजकीय क्षेत्र  पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांचा हव्यास धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन, देशाच्या दुसºया संरक्षण मंत्री तसेच विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हेच दाखवून दिले आहे. मात्र, त्यासाठी महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर ठेवता कामा नये.

© संजय इस्तारी मुंदलकर            

Tuesday, 4 February 2020

माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये


चार्ली चॅपलिनच्या अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना  कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभे राहते; पण अनेकांना हसवणाºया या  चेहºयामागचे दु:ख कोणाला फारसे माहित नसेल.  चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं; पण माझं  हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये. त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
चार्ली यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन असे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या  नवव्या  वर्षीच  नोकरी करावी लागली. बालपणीच त्यांचे आईवडील अलग झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या १३ वर्षी चार्ली यांचे शिक्षणही सुटले.
चार्ली यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास  सुरुवात केली होती. अवघ्या १९ व्या  वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी  करार  केला  आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अभिनयाची सुरुवात अमेरिकेत केली. १९३० त्या सुमारास त्यांना आठवड्याला १५० डॉलर्स मिळत होते. यावर्षी त्यांनी तब्बल १३ चित्रपट निर्मात्यांशी करार केला होता. १९१८ सालापर्यंत ते जगातील लोकप्रिय चेहरा बनले होते.
१९१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. १९२१ मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली.  चार्ली यांनी  अ वूमन आॅफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाईम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी  चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट आजही पसंत केले जातात. चार्ली  यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी  जग  युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली लोकांना हसवत होते.

आयुष्यही वादात

खासगी आयुष्यासोबतच चार्ली  यांचे व्यावसायिक आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होते.  १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटाने फारच वाद झाला होता. यात  चार्ली  यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकेच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.
चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती.  या लग्नातून त्यांना ११ अपत्ये झाली. त्यांनी पहिले लग्न १९१८ मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केले; पण हे लग्न दोन वर्षेच टिकले. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि  १९४३  मध्ये १८ वर्षांच्या उना ओनिलसोबत संसार थाटला. त्यावेळी चार्ली ५४ वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.

महात्मा गांधींचे चाहते

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली  भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. मात्र, असे सांगण्यात येते की, गांधीजींना चार्ली यांना कधी भेटायचेच नव्हते. नंतर त्यांना कळले की चित्रपटात अभिनय करणारे चार्ली यांना गरिबांबद्दल कळवळा आहे़ यानंतर त्यांनी चार्लीची भेट घेतली. यावेळी दोघांत खादीविषयी मोठी चर्चा रंगली होती, असेही सांगितले जाते. बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांत चार्ली चॅपलिन यांची नक्कल केली होती.

अभिनयाला अमेरिका घाबरली

एखाद्या विनोदी (कॉमेडियन) अभिनेत्यापासून कुण्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न विचारला तर कुणीही बुचकळ्यात पडेल. एखाद्या कलाकाराच्या अभिनयापासून कुण्या देशाला काय धोका निर्माण होणार; परंतु असे घडलेले आहे आणि ते अमेरिकासोबत...चक्क एका महा
शक्तीबरोबर!
साधारण: १९५०-६० च्या दशकात संपूर्ण जग दोन भागात विभागल्या गेले होते. एका बाजूूला अमेरिकाचे नेतृत्व, तर दुसºया बाजूला साम्यवादाचे समर्थक होते़ अर्थातच या गटाचे नेतृत्च रशियाकडे होते. त्याच काळात हॉलीवूडमध्ये चार्ली चॅपलिन सुपरस्टार होते. मात्र अमेरिकाची गुप्तचर संस्था एफबीआयला  चार्ली हे साम्यवादी विचारधारापासून प्रभावित असल्याचा संशय होता. तसेच, ते आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना साम्यवादी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एफबीआयचे म्हणणे होते. विशेष म्हणजे चार्ली यांच्या खासगी आयुष्यातील घटनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. सन २०१५ मध्ये ब्रिटनची गुप्तहेर संस्था एमआई-5ची काही गुप्त दस्तावेज सार्वजनिक करण्यात आला. त्यातून ही बाब उघड झाली होती. त्यावेळी चार्ली सर्वाधिक काळ लंडनमध्ये व्यतित करत होते. त्यामुळे एमआई-5 वर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, यातून काहीही सिद्ध झाले नाही. १९५३ मध्ये चार्ली चॅपलिन अमेरिकाबाहेर गेले असता त्यांना पुन्हा अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर ते  स्विर्त्झलँडमध्ये राहावयास गेले
२५ डिसेंबर १९७७  रोजी म्हणजे नाताळच्या दिवशीच वयाच्या ८८ व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे निधन झाले; परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचे कॉफिनच चोरल्याचे चौकशीतून समोर आले. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी ६ लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती; परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह सहा फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.

© संजय इस्तारी मुंदलकर

Monday, 3 February 2020

कथेवरून उंची गाठलेला ‘शराबी’



अनेकदा चित्रपटात दारू पिणाºयाचे दृश्य असतात़ काहीजण दारूड्याच्या भूमिकेतही असतात; परंतु तो कथेचा भाग असतो़ मुख्य कथानकापासून (screen play) तो बराच लांब असतो़ काहीवेळा उपकथानक म्हणूनही तसे काही दृश्य चित्रित केले जातात. चित्रपटाच्या एकूण यशात त्याचे स्थान दुय्यमच ठेवले जाते; पण अख्खा चित्रपट दारूड्याच्या भूमिकेवर आधारित असेल तर....? असा चित्रपट बॉक्स आॅफिसवर (box office)  गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश मेहरा दिग्दर्शित शराबी चित्रपटाने मात्र मोठे यश मिळवले़ अगदी साध्या सोप्या कथेच्या सक्षम कथानकावर शराबी हिट ठरला.
भारतीय चित्रपटक्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपट ‘शराबी’ला मागील वर्षात तब्बल ३५ वर्षे पूर्ण झालेत. अमिताभ यांच्यासह  जयाप्रदा, प्राण, दीपक पाराशर, ओम प्रकाश, सत्येन कपूर आदींची भूमिका असलेला हा चित्रपट १८ मे १९८४  रोजी पडद्यावर आला आणि हिट ठरला.(hit on screen)
अगदी साध्या कथेवरून उंचीचा कळस गाठलेला चित्रपट म्हणजे ‘शराबी’ होय असे म्हणता येईल. मुलाच्या दारू पिण्यावरून पित्याशी होत असलेले वाद, गैरसमज असे या चित्रपटात दिसून येते. अन्य चित्रपटासारखे याठिकाणी बाप हा दारूडा  नाही, तर मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्यावरून बाप (प्राण) आणि मुलगा (अमिताभ) यांच्या वादाला सुंदर चित्रीत करण्यात आले आहे. सोबत आहे जयाप्रदासोबतचा प्रेमालाप तसेच मर्मभेदक संवाद आणि गाणी.
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी कथेला दारूड्याचा चित्रपट असे काही होऊ दिले नाही, हेच त्यांचे मोठे यश आहे. या चित्रपटाचा बिग-बी यांच्या कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये समावेश होतो.‘शराबी’ एक किस्सा सांगण्यात येतो की शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या हाताला अपघात झाला आणि त्यांना पूर्ण शूटिंग करताना त्यांना हात खिशात ठेवून काम करावे लागले. शराबी पाहताना ही बाब स्पष्ट जाणवते. अमिताभ आपला डाव खिशात ठेवून असल्याचे दिसून येते. ती घटना अशी की दिवाळीच्या सणादरम्यान ‘शराबी’चे शूटिंग अर्थात छायाचित्रण सुरू होते. एक जळता फटाका अमिताभ यांच्या हातावर पडला आणि त्यामुळे हात भाजला.  चित्रीकरणाच्या तारखा ठरल्यामुळे शूटिंग रद्द करणे शक्य नव्हते. म्हणून उशीर न लावता  काम  सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जळालेल्या हातासोबतच शूटिंग पूर्ण केली. बिग-बी यांना चित्रपटात आपला डावा हात खिशात ठेवावा लागला; पण त्याकाळी लोकांमध्ये ही फॅशन झाली होती. याशिवाय ‘इनक्लाब’ मध्येही त्यांना आपला डावा हात खिशात ठेवावा लागला होता. याबाबत अमिताभ सांगतात, की त्यावेळी हातावरील घाव भरलेले नव्हते. त्यामुळे हा डावा हात खिशात ठेवावा लागत होता. अनेकांना ती फॅशन असल्याचा समज झाला होता. विशेष म्हणजे लोकांनी तिचे अनुकरणही केले होते.

३५ हजार फुट उंचीवर कल्पना

अमिताभ यांनी एका आठवणीत सांगितले होते, शराबीची कल्पना १९८३ मध्ये सूचली होती. त्यासाठी त्यांचा पहिलाच जागतिक दौरा सुरू होता. त्यावेळी बिग-बी आणि त्यांच्या टीमने अमेरिका, इंग्लंडमधील १० शहरांत कार्यक्रम सादर केले होते. न्यू यॉर्कहून त्रिनिदाद, टोबागो प्रवासादरम्यान प्रकाश मेहरा यांनी वडील-मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटाची कल्पना त्यांच्यासमोर ठेवली, ज्यामध्ये मुलगा एका मद्यपीच्या भूमिकेत असेल. बिग बी म्हणाले की, अटलांटिक महासागरावर हवेत सुमारे ३५ हजार फुटांच्या उंचीवर कल्पना सूचली होती.
संवाद लहान ठेवण्याचा सल्ला
आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारूला कधीच हात न लावणारे अमिताभ यांना चित्रपटात एका दारू पिणाºया मुलाचा ‘परफेक्ट’ असा अभिनय करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रकाश मेहरा यांना संवाद लहान लिहिण्याचा सल्ला दिला. कारण नशेत डायलॉग बोलण्यास वेळ लागतो. बिग बी नुसार, पहिल्या दिवशीच्या  शूटनंतर मी सर्व गोष्टींचे निरीक्षण करून प्रकाशजींना सांगितले की, चित्रपटात मला जास्त वेळ नशेत राहायचे आहे आणि डायलॉग लांब असतील तर बोलायला वेळ लागेल. कदाचित चित्रपट पाच तासांचाही होईल. त्यानंतर काही सीन लहान करण्यात आले. असे सांगण्यात येते की काहीजण बारमध्ये अमिताभ यांचे घड्याळ, सोन्याची साखळीची चोरी करतात, ते दृश्य खुद्द बिग बी यांनी कोरियोग्राफ केले होते.

गाणीही लोकप्रिय (best songs) ‘शराबी’च्या यशात जितका वाटा कथा, पटकथा, संवादा आदींचा होता, तितकाच वाटा गाण्यांचाही होता. संगीतकार बप्पी लाहिरी यांनी सर्व गीतांचा उत्कृष्ट बाज चढवलेला.  दे दे प्यार दे...,  जहाँ मिल जाए चार यार..., इंतेहा हो गयी..., मुझे नौलखा मंगा दे...असो
की, मंझिले अपनी जगह , या सर्वांना  बप्पीदांनी न्याय दिला. अंजान आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरांनीही लिहिलेली ही सर्व  गाणी  हिट ठरली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही गाणी आजही सर्वांना ऐकावीशी वाटते. प्राण यांच्याशी कौटुंबिक वाद असो, ओम प्रकाश यांच्यासोबत मन मोकळे करणारे क्षण असो वा पे्रयसी जयप्रदासोबत प्रीतीचा प्रसंग असो अमिताभ यांनी सकस अभिनय केल्याचे दिसून येते. शराबीतील ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी, वरना ना हो, हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता. 

© संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 2 February 2020

ब्रिटनची ए (ब्रे) क्झिट...

सन २०१६ पासून सुरू झालेल्या ताणतणावानंतर ब्रिटनने ३१ जानेवारी २०२० रोजी युरोपीय महासंघातून बाहेर पडल्याचा आपला निर्धार पूर्ण केला. यावर पंतप्रधान बोरीस यांनी आपल्या देशात नवी पहाट उगवली ाहे. बदलांच्या क्षणात नव्या कर्तृत्वासाठी व्यासपीठ सज्ज झाले असून देशाला एकत्र करत पुढे नेणे हे माझे पंतप्रधान म्हणून कर्तव्य असल्याचे म्हटले आहे़ तसेच, एक नवी सुरुवात असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जॉन्सन यांनीच ब्रेक्झिटसाठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला होता. ब्रेक्झिटच्या मागणीला जून २०१६ मध्ये सर्वांत आधी संडरलँड नावाच्या शहराने सहमती दर्शवली होती. दुसरीकडे ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर युरोपसाठी नवी पहाट उगवेल, असा विश्वास युरोपीय महासंघाच्या युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, युरोपीय आयोगाच्या प्रमुख उरसुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय संसदेचे प्रमुख डेव्हिड सासोली यांनी संयुक्तपत्राद्वारे व्यक्त केला. तसेच, युरोपीय महासंघाचे सदस्य असताना मिळणारे फायदे आता ब्रिटनला मिळणार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअरमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. लंडन शहरातील मॉलवर युनियन जॅक फडकवण्यात आला. सर्व सरकारी इमारतींवर लाल, पांढºया आणि निळ्या रंगात रोषणाई करण्यात आली आणि या क्षणाची आठवण म्हणून ५० पेन्सच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याच वेळी हा प्रश्नही मनात निर्माण होतो की, असे काय झाले की साधारण: ५० वर्षांचे राजकीय, आर्थिक संबंध तोडल्याने ब्रिटनवासी आनंद व्यक्त करत आहे. त्यासाठी काही वर्षे भूतकाळात जावे लागणार आहे.
ब्रेक्झिट नेमके काय...
ब्रेक्झिट शब्द ब्रिटन आणि ब्रेक्झिट या दोन शब्दांतून निर्माण झाला आहे. म्हणजेच युरोपीयन महासंघापासून बाहेर पडण्याबाबतच्या करारातून नवा शब्द बाहेर आला आहे. सन २०१६ मध्ये युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्यावर ५२ टक्के-४ ८ टक्के असे मतदान झाले होते. या महासंघात काही युरोपीयन देशांचा समावेश असून त्यांच्यात मुख्यत्वे राजकीय आणि आर्थिक संबंध आहेत. दुसºया महायुद्धानंतर ‘ईयू’ अस्तित्वात आला होता. दोन देशांत आर्थिक संबंध असल्यास त्यांच्या युद्धाची शक्यता नसते. याच संकल्पनेवरच महासंघाने आकार घेतला होता, असे मानले जाते. काळाच्या ओघात महासंघाने मोठे रुप धारण केले असून, त्यांचे आता स्वत:चे चलन (युरो) सुद्धा आहे. यातील सदस्य देश त्याचा वापर करतात. याशिवाय सदस्य देशांतील नागरिकांना अन्य सदस्य देशांमध्ये प्रवास करण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. सर्वकाही व्यवस्थित असताना ब्रिटनने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत आतापर्यंत दोन पंतप्रधानांना आपले पद सोडावे लागले आहे. सर्वांत प्रथम २३ जून २०१३ रोजी तत्कालिन पंतप्रधान डेव्हिड कामरन यांनी पहिल्यांदाच ईयूमधील आपल्या देशाच्या भूमिकेवरील भविष्याबाबत मत व्यक्त केले आणि तेथूनच ब्रेक्झिटला ‘हवा’ मिळाली. अर्थातच यात त्यांची दूरदृष्टी होती. असे असले तरी ब्रेक्झिटच्या ते विरोधातच होते. ही बाब त्यांच्या राजीनाम्यानंतरच दिसून आली.
दुसरे असे की पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी देशावर पडत असलेल्या आर्थिक ओझ्यावर लक्ष केंद्रित केले होते. कारण सन २०१४ मध्ये देशात येणारे विदेशी नागरिकांची संख्या ही देशातील तिसरी मोठी समस्या म्हणून अधोरेखित झाली होती.
दुसरे असे की ब्रिटनमध्ये १९९४ मध्ये जितकी संख्या होती, ती सन २०१४ मध्ये दुप्पट झाली. युरोपीयन महासंघातील सदस्य देशांतील मोठ्या संख्येतील नागरिक रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीसाठी ब्रिटनच्या दिशेने धाव घेत आहे आणि त्यातून सरकारसमोर रोजगार पुरवण्याची आणि लोकसंख्या या दोन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले होते़ यानंतर ब्रेक्झिटचा विचार समोर आला होता. २३ जून २०१६ रोजी घेतलेल्या मतदानात ब्रेक्झिटच्या पाठिंब्यात ५१.९ टक्के मते पडली होती, तर विरोधात ४८.१ टक्के मते आली होती. यात फारसा फरक नसला तरी ब्रिटनने महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता़ यात देशातील ३० दशलक्ष नागरिकांनी भाग घेतला होता. मात्र, त्याचवेळी युनाएटेड किंगडमचा भाग असलेल्या स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडने ईयूमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनमधील सार्वमतामध्ये ५२ टक्के नागरिकांनी ब्रेक्झिटसाठी कौल दिल्याने कॅमेरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी २९ मार्च २०१७ रोजी देशाचे प्रमुखपद स्वीकारले. युरोपीय महासंघाला पत्र लिहून दोन वर्षांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच, ब्रेक्झिटचा फायदा घेण्यासाठी जून २०१७ मध्ये मुदतपूर्व निवडणूक घेतली. मात्र, त्यांच्या हुजूर पक्षाने बहुमत गमावले. मार्च २०१९ मध्ये संसदेने थेरेसा मे यांचा ब्रेक्झिटचा आराखडा फेटाळल्याने त्यांनी जून महिन्यात राजीनामा दिला. त्यानंतर जुलैमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी बोरिस जॉन्सन यांची निवड करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले. पंतप्रधानांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला अधिक गती दिली. नव्या वर्षात म्हणजेच २३ जानेवारी २०२० रोजी ब्रिटनच्या संसदेमध्ये कायदा मंजूर झाला आणि २९ जानेवारी २०२० रोजी युरोपीय संसदेने ब्रेक्झिटला मान्यता दिली़ यानंतर महाराणी ऐलिझाबेथ (द्वितीय) नेही त्यास मान्यता दिली. शेवटी ३१ जानेवारीला ब्रिटन देश अधिकृतरित्या युरोपीय महासंघाबाहेर पडल्याचे घोषित झाले. अशाप्रकारे तब्बत ५० वर्षांचे नाते संपुष्टात आले.
*****
x