धूम्रपान केल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, असा गैरसमज ‘कुट कुट के ’ भरला आहे. वस्तुस्थिती याउलट असते. कारण मृत्यूच्या दिशेने टाकलेली त्यांची पावले संथ गतीने आपला मार्ग कापत असते. तंबाखू जाळून निघालेल्या धुरामध्ये निकोटीन टार, कार्बन मोनोआॅक्साईड असे घातक घटक माणसाच्या मन आणि शरीरावर दुष्परिणाम करत असतात. दुसरीकडे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्ये उत्साह अधिक असतो.
अनेकदा अन्य कुणासोबत संवाद साधताना ‘सर्व कळतं रे, पण ते करता (वळत) येत नाही़़़’ अ सा शब्द प्रयोग होतो़ अर्थात मला सर्व समजते़ मात्र, त्या बाबींची अंमलबजावणी करता येत नाही, असा अर्थ अभिप्रेत असतो.समाजातील व्यसनाबाबतही असंच काही म्हणता य ेईल़ सुटता सुटता नाही, ते व्यसन, असंच काहीसं म्हणता येईल़
आपली प्रकृती निरोगी राहिली तर मन:स्थितीही चांगली राहते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपोआप येते. अनेक वाईट व्यसने आणि सवयीमुळे व्यक्तीला मानाचे स्थान मिळत नाही. धूम्रपान हे सुद्धा एक घातक व्यसन. त्याचा दुष्परिणाम शरीरच काय मनावर होत असतो. परिणामी जीवनात आपण मागे राहतो. म्हणूनच मनाचा निर्धार करून व्यसनांपासून दूर राहायला हवे़ सरकार सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यावर व्यसनाबाबत इशारा देत असते; परंतु कळते पण वळत नाही, अशी स्थिती सर्वत्र दिसून येते.
धूम्रपानाबद्दल बोलायचे झाल्यास यामुळे हृदयरोगाची लागण होते आणि कॉलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब हे सुद्धा मानगुटीवर बसते. एका सर्वेक्षणातील निष्कर्ष असे सांगतो, की धूम्रपान करणाºया व्यक्तिंपैकी ४० टक्केलोक आपल्या वयाची ६० वर्षे गाठता-गाठताच मृत्यूलाही भेट देतात. वैज्ञानिक अभ्यासात धूम्रपानामुळे शरीरावर अनेक घातक परिणाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्य म्हणजे हे घातक परिणाम धूम्रपान करणाºया व्यक्तींच्या शरीरावर होतातच,शिवाय त्यांच्या जवळपास राहणाºया लोकांनाही परिणाम भोगावे लागतात.
अन्य एका माहितीनुसार, आपल्या देशात ६५ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धूम्रपान करतात. यात विडी, सिगारेट, चिलीम आदींचा समावेश असू शकतो. व्यसनी लोक बहाणेबाज असतात. धूम्रपान केल्याने आपल्याला काहीच होत नाही, असे ही मंडळी ठासून सांगतात आणि या लोकांमध्ये धूम्रपान केल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, असा गैरसमज ‘कुट कुट के ’ भरला आहे. वस्तुस्थिती याउलट असते. कारण मृत्यूच्या दिशेने टाकलेली त्यांची पावले संथ गतीने आपला मार्ग कापत असते. तंबाखू जाळून निघालेल्या धुरामध्ये निकोटीन टार, कार्बन मोनोआॅक्साईड असे घातक घटक माणसाच्या मन आणि शरीरावर दुष्परिणाम करत असतात. दुसरीकडे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्ये उत्साह अधिक असतो.
तज्ज्ञ म्हणतात की, तंबाखूतील निकोटीन नावाच्या रसायनामुळे माणूस धूम्रपानाच्या आहारी जातो. त्याचे त्याला व्यसन जडते. मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. विशेषत: पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांना व्यसन लागले तर ते सुटणे अवघड असते. ज्या कुटुंबातील आईवडील सिगारेट ओढतात, त्यांची मुलेही लहान वयातच व्यसनी होतात.
धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची पुरेपुर शक्यता वाढत असते. तंबाखूतील निकोटीन रक्तात चटकन मिसळून जाते. त्यामुळे त्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. धूम्रपानामुळे हृदयाचे स्पंदन अधिक वेगात होऊन जिवाला धोका निर्माण होतो. सिगारेट वा बिडीचे झुरके अर्थात कश मारण्यासाठी केवळ त्यातील तंबाखूच जळत नाही, तर तो झुरके घेणारा स्वत:सह इतरांचे मन तीव्र गतीने जाळत असतो. यात त्याचे कुटुंब आणि समाजाचाही समावेश होत जातो.
सर्व वाईट गोष्टींना जसा अंत असतो, तसाच त्याचा त्याग करून नवी दिशा मिळवता येते. येथेही धूम्रपानावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे़ मात्र, त्यासाठी दृढ निश्चय आवश्यक आहे. ‘वाटेल ते होवो, मी धूम्रपान करणार नाही’, असा मनाशी घट्ट निश्चय करणे आणि त्याचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. भक्कम मनोबलाच्या जोरावरच आपण कणखर निर्धार करून धूम्रपानास दूर करू शकतो. व्यसनी माणूस हा मानसिक दृष्टीने अस्थिर आणि अस्वस्थ असतो. तोंडातून येणाºया धुराच्या दुर्गंधीमुळे तो समोरील व्यक्तीवर प्रभाव टाकू शकत नाही. असा माणूस योग्य निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. योग्य निर्णयासाठी मन:स्थिती शांत, स्थिर असणे, आवश्यक असते. मात्र, त्याचा अभाव असतो. आणि हातातून वेळ गेली तेव्हा राख ही केवळ ‘अॅश ट्रे’ वरच बंदिस्त नसते, तर ती समाजात सर्वत्र पसरलेली असते.
संजय इस्तारी मुंदलकर