Wednesday, 22 November 2023

SAANJANTANOO वेदना सरल्या नाही ...






वेदना सरल्या नाही


तू दिल्या वेदना सरल्या नाही

                     तुझ्यासवे चाफा कधी फुलला नाही


चंद्रही लोपला, कुणी न सोबती

कशी जपावी या चांदण्यांशी नाती

श्वास कधी हा बहरला नाही


जरी फाटले आभाळ पेलेन सारे 

गाईन मग मी सूर मिलनाचे

खेळ हा सखे गं नित्याचा नाही



संजय मुंदलकर 

गीतकार : सावरू कशी ...(अल्बम)

यू ट्यूब : नूतन्स म्युझिक डॉट

Wednesday, 15 November 2023

आजचा दिवस उद्यावर ...

 मागील काही वर्षांमध्ये नागरीकरणाची  झपाट्याने  झालेली प्रक्रिया पाहता भविष्यात शहरांची संख्या आणखी वाढेल, याबाबत अंदाज सहजरित्या बांधता येतो. आपण पाहत आहोत की शहरे  झपाट्याने वाढत आहेत, ज्यावर  कुणाचेही नियंत्रण नाही. शासन, प्रशासन आणि सरकारचेही! 

औद्योगिकीकरण आणि रोजगाराच्या नवीन संधींमुळे शहरांकडे स्थलांतराचा कल वाढला , दिवसांगणिक वाढत आहे. नवीन उद्योगांची स्थापना आणि वाढत्या व्यापारामुळे शहरे सातत्याने विस्तारत आहेत. सोबतच अनेक समस्याही निर्माण होत आहेत. विविध प्रकारच्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करून अवाढव्य निवासी संकुले बांधली जात आहेत. यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये शेतीसाठी असलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे. 

मात्र, त्याचवेळी भारतातील बहुतांश शहरे पाणी, वीज, आरोग्य, वाहतूक, घरे, स्व

च्छता  अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे लोक अशाप्रकारे वंचित आहेत आणि दुसरीकडे अशी शहरे विकसित होत आहेत. निश्चितच   विसंगत  दृश्य आहे. मग यातून निर्माण होणारे प्रश्न येत्या काळात आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता नाकारणार कशी?   चिंतन करण्यासारखा  मुद्दा हा आहे, की  इतक्या प्रचंड लोकसंख्येचा आणि संसाधनांचा वाढता भार सहन  करण्यासाठी आपली  शहरे  तयार आहेत का? की आपण डोळे  मिटवून ढोंग आणतोय...

मागील काही वर्षात लहान शहरांचे नागरीकरण झाले़ हे ठीक आहे़ कारण त्याच्या शेजारच्या गावखेड्यातील लोकांनीच तिथे आश्रय घेतल्याचे  पाहावयास मिळते;परंतु मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आश्रय घेतल्याने विविध स्तरावर आणि नको तितक्या समस्या निर्माण झाल्या़ निवास, पाणी, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगार, गुन्हे अशा काही. प्रश्न बिकट असे, की यात  कुठेही  ताळमेळ  बसला नाही  किंवा अजूनही बसत नाही़ कारण  एखाद्या मोठ्या शहरावर चोहोबाजूंनी लोकांचे लोंढे येत असेल, तर त्यावर कुणालाही नियंत्रण मिळविता येत नाही. एखाद्या मोठ्या शहरात येणारी लोकसंख्या ही दोन वेळेच्या घासाची सोय करण्याठी आलेली असते़ त्यांची शासनदरबारी नोंद होत नाही़ मात्र, त्यांच्या वास्तव्याने अनेक समस्या निर्माण होत असतात. यापैकी अनेकजण मुक्कामाचा डेरा हलवत असतात. साधारणपणे ही मंडळी मोठ्या शहरातील रेल्वेस्थानक परिसराचा आश्रय घेतात़ काही लहान धंद्यानिमित्ताने येणारी मंडळी भाड्याच्या घरात  राहून  जगण्याचा  प्रयत्न करतात़ त्यांची या  ना  त्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाकडे  नोंद  होते़  सांगायचे असे की वरील दोन्ही प्रातिनिधिक घटकांमुळे  स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड ताण येतो़ पुढे विविध समस्या निर्माण होतात. 

आपल्या  गरजेनुसार आपल्याला  घर मिळावे असा कुणाच्याही मनात स्वाभाविकपणे  येणारा विचार त्यांच्याही मनात येतो आणि  पुढील काळात सीमेंटच्या जंगलात तेही आपला वाटा उचलतात. मग  यातून आपल्या  निसर्गाचा  विध्वंस घडून येतो़ पीक नष्ट करून सुपीक जमीन पडित दाखवत प्लाट तयार करून  लोकवस्ती तयार केली जाते. आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतो, तो असा.  

एखादी  गोष्ट उपलब्ध करून घेण्याची  ऐपत नसल्याने असमतोल वाढत जातो आणि तो तसाच कायम राहतो. मग कुठे तरी शहरीकरणाच्या वेगवान प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न होतो. ठोस धोरण तयार करताना संसाधनांवर वाढत्या लोकसंख्येचे अवलंबित्व अधिकच असल्याचे आढळून  येते. परिणामी  समस्या  आणखी  गुंतागुंतीची होत जाते. लोकसंख्या  वाढीचा  सर्वात  वाईट  परिणाम शहरांवर दिसून येतो. राजकारण्यांसाठी तर हातचे  जुने  सुटत नाही आणि नवे  धरता येत नाही, अशी स्थिती निर्माण होते. लोकं मात्र आजचा दिवस उद्यावर ढकलत  जगत राहतात.

Thursday, 9 November 2023

दिवाळी गोधन ...

आपल्या देशातील बहुतांश राज्यात पाच दिवसांची दिवाळी साजरी होतो. हा मोठा सण. शहरी भागात या सणाचे पूर्णपणे राजकारण आणि व्यावसायिकरण झाले असले तरी ग्रामीण भागात परंपरा, वारसा जपण्यात येतो.


दिवाळी उत्सव हा मुळातच कृषी, आरोग्य, आनंद यावर त्रिसूत्रीवर आधारित आहे. भारत कृषिप्रधान देश. औद्योगिकरणाला अधिक भाव असला तरी त्याचे मूळ शेतातील पिकेच आहे़ ते नाही तर काहीच नाही.
साधारणत: नवरात्र दसरा सणापासून सोयाबीन, मूग, ज्वारी वा हायब्रिडचा हंगाम सुरू होता़े याच कालावधीत शेतात पºहाटीची बोंडे फुटतात म्हणजे त्यातून कापूस बाहेर पडतो. पहिल्या कापसाचा वेचा हा ‘सीतादेई’ वा ‘सीतादेवी’ या पुजेने सुरू होतो.

दिवाळी सण कालावधीत हिवाळा सुरू होतो़ त्यामुळे आरोग्य अन्य ऋतुंच्या तुलनेत अधिक सुधारते़




घरात पिके येतात़ त्यामुळे घरोघरी आनंदाचे वातावरण असतेग़ाठीला पैकापाणी असतो. याचवेळी यात्रा वगैरे सुरू होतात. भाऊबिजेने त्यात आणखी भर पडते़ माहेरवासीण भावाकडे जाते वा तो येतो. नातेवाईकांची घरोघरी गर्दी़़़ पिकांची चर्चा ़़़ संस्कारांची देवाण घेवाण़़़विचारांची आदान प्रदान एका पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित होत असते़ एकादवेळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो़ आणि दिवाळीनंतर बार उडवूया असे निश्चित होते. एका नव्या पिढीचे बिज रोवल्या जाते, ते असे !
मात्र, यात शेतकºयांच्या जिवाभावाला विसरता येत नाही़ ती म्हणजे पाळीव जनावरे, गाय, बैल, बकरी, कुत्री, मांजरे, कोंबडे ही सर्व पाया-पायांशी वावरणारी सगेसोयरे. दिवाळीसणात गाय शेळी यांची विशेषत्वाने पुजा करण्यात येते़ गावाच्या सीमेपर्यंत नेऊन त्यांची पुजा अर्चा होते.


वसुबारसपासून म्हणजे पहिल्या दिवसांपासून शेणाचे ‘गोधन’ टाकण्यात येते़ हा शेणाचा एक मोठा गोळा असतो. त्याभोवती रांगोळी, पुजा केली जाते. रात्री त्यावर दिवनालीचा दिवा लावण्यात येतो.


दिवाळीसणात निसर्गाने शेतपिके, घराच्या कोठ्यातील जनावरे, मानवी नाते यांच्यात गुंफण घातली ती अशी ...

***

Tuesday, 7 November 2023

धुके आणि धूर

 मित्रांनो, असे म्हणतात की मृत्यू प्रत्येक जीवाचे अस्तित्व नष्ट करतो, ते एक सत्य आहे आणि प्रत्येकाला स्वीकारावेच लागते. एक दिवस जायचेच आहे, असे म्हणत मानवजातही जगत एकेक दिवस ढकलत असते. अर्थात हे झाले  मनुष्याला  एका  ठराविक   वयानंतर येणाºया मृत्यूबाबत; परंतु कुणी स्वत:हूनच आपला मृत्यू ओढवून  घेत  असेल  तर...


होय! ही मानवजात जर आपल्या मृत्यूचा रस्ता स्वत:च तयार करत असेल तर त्याला काय म्हणावे? आणि  हे  सर्व  या जगातील प्रत्येक माणूस अगदी तुम्ही आम्ही सर्वजण करत आहोत. कारण  संपूर्ण जगभराला जल, वायू, जमीन प्रदूषणाचा  जो  विळखा पडलाय, तो आपल्यामुळेच! हवा, जमीन, पाणी, आकाश या सर्व ठिकाणी मानवाने आपल्या मरणघंटा बांधून ठेवल्या आहेत. आणि अशा अकाली मृत्यूमुळे केवळ नुकसानच नुकसान होत असल्याचे  दिसून येते.



आपल्या देशापुरता  विचार करावयाचे झाल्यास, येथील प्रत्येक राज्य प्रदूषणाच्या मगरमिठीत सापडले आहे. मनुष्याचा पाण्यापेक्षा हवेशी अधिक संबंध असतो. कारण श्वसनासाठी चोवीस तास हवेची गरज असते. मात्र, आता  हीच हवा प्रदूषित झाली आहे, नव्हे आपण ती केली आहे...आजच्या या घडीला करतही आहोत. मोठ्या संख्येत वाहनांचा वापर, उद्योगांमध्ये नियमांचे उल्लंघन अशा मानवनिर्मित बाबी कारणीभूत आहेत.


सध्या देशातील प्रदूषणाचा चांगलाच गाजत आहे. जगातील अत्यंत धोकादायक आणि गंभीर प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील काही शहरांचा समावेश आहे़ यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली सुद्धा आहे. दिल्लीतील प्रदूषणाचे कारणे अनेक सांगण्यात येतात़ बोंब उठली, ती थोपविण्यासाठी काही कारखान्यांना नोटिशी रवाना होतात़ मूळ मुद्दा कायम राहतो़ पराली (शेतपिकांचा शिल्लक भाग) जाळणे, वाहनांची भरमसाठ संख्या, फटाक्यांचा धूर, कारखान्यांतून बाहेर पडणारा धोकादायक वायू अशी काही या प्रदूषित वातावरणाची कारणे. याठिकाणी संबंधित सर्व ‘प्रताप’ मानवनिर्मित आहेत, ही बाब मंडळी विसरतात. 


दिल्ली महानगर आणि  शेजारच्या राज्यात औद्योगिक क्षेत्र अधिक आहेत. रासायनिक, चामडे, खत निर्मिती उद्योगांची भरमार असल्याचे प्रदूषित वायूची निर्मिती अधिक राहणारच! सुरुवात येथूनच होत असल्याचे या कारखान्यांची तपासणी होते का, असा प्रश्न निर्माण होणारच. दिल्लीतील ही स्थिती पाहता सरकारकडून येत्या दिवाळी सण उत्सवाच्या कालावधीत फटाके जाळण्यावर बंदी येऊ शकते. कारण लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम होत असतो. मुंबईत यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. कारण या शहरातही हीच समस्या निर्माण झाली आहे.  




सम-विषम

राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषण थोपविण्यासाठी सर्व वाहनांना आॅड आणि इव्हन अर्थात विषम-सम असा उपाय सूचविण्यात आला. या नियमानुसार, वाहनाचा शेवटचा क्रमांक विषम (१,३,५) असेल तर ते फक्त विषम तारखांनाच रस्त्यांवर धावेल. तर, वाहनाचा क्रमांक सम (२,४,६) असल्यास, त्याच तारखेला वाहन घराबाहेर पडू शकेल. आप सरकारने २०१६ मध्ये पहिल्यांदा ही योजना लागू केली होती. यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अभ्यास करण्यात आला आणि संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आले. मात्र, हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेइतकी सुधारणा झाली नाही. नंतरच्या वर्षातही विषम-सम योजना लागू होती. यातून वाहनांच्या एकूण प्रदूषणापैकी दुचाकींमुळे ५६ टक्के प्रदूषण होते. २०१९ मध्ये सुद्धा हा नियम लागू करण्यात आला होता. कॉन्सिल आॅन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या अभ्यासानुसार, सम-विषमचा विशेष फायदा नाही. दिल्लीतील वाहतुकीमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांनुसार, विषम-सममुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रत्येक वाहनातून उत्सर्जित होणाºया वायूंमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारण्यावर त्याचा किरकोळ परिणाम होतो. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी एक्यूआय ४५० ते ५०० असल्यास विषम-सम नियम लागू करावा.


कोरोना काळ

याशिवाय मागील कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात या आजारांची लागण झाली होती, अशा काही जणांना अन्य आजारांचा सुद्धा संसर्ग होत असल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ हवेची गरज आहे. केवळ श्वास घेऊन चालणार नाही, तर तो स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेचाच असावा. यात वावगे काय? आपण प्रदूषण का करतोय, हा प्रश्न स्वत:च्या मनात का निर्माण करत नाही? आपण दररोज वापरत असलेल्या वाहनातून बाहेर पडत असलेला विषारी वायू का थांबवत नाही? फटाके न फोडल्याने वातावरणातील हवा स्वच्छ राहत असेल, तर त्याचा आपल्याला हव्यास का नाही? झाडांद्वारे स्वच्छ हवा वातावरणात पसरत असेल, त्याकडे आपले हात का वळत नाही?


निसर्ग ‘धुके’ निर्माण करतो आणि स्वत:ला अत्याधुनिक, प्रगतीचे पाईक, विकासाचा महामेरू समजणारी मानवजात ‘धूर’ निर्माण करते़ 

निसर्ग स्वार्थाविना कर्तव्य पार पाडतो आणि माणूस स्वार्थाला गोचिडासारखा चिपकून धूर निर्माण करतो़.


संजय मुंदलकर



Tuesday, 10 October 2023

SAANJANTANOO तुझा हरेक नखरा

 






दिलाचा तुझ्या ठाव जाणतो मी

नजरेतली फितुरी जाणतो मी 

झाकू नकोस मुखडा चंद्राचा

तुझा हरेक नखरा जाणतो मी


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)


SAANJANTANOO मी तुझीच रे धरा

 गगनी तू मगनी तू

हृदयी तू अंतरी तू

मी तुझीच रे धरा

मी तुझीच रे धरा

सांजना ... प्रियवरा

प्रियवरा ... सांजना


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)




Wednesday, 4 October 2023

नोकरी वा रोजगार मिळविण्याचे वय वाढले

 भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात आरबीआयने या आधी देशातील लोकांची बचत ५० वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे आणि अनेकांवर कर्जाचे ओझे वाढत आहे, असा अहवाल जाहीर केला होता. आता देशातील बेरोजगारीबाबत चिंताजनक अहवाल अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, देशातील २५ वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी ४२.३ टक्के बेरोजगार आहेत. अर्थात १२+ शिक्षण घेऊनही त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही़ यात कला, वाणिज्य, विज्ञान, आयटीआय, आयआयटी, अभियांत्रिकी, संगणक, वैद्यकीय क्षेत्राचा समावेश असू शकतो़ मोठा पैसा खर्च करून शिक्षण घेतले आणि या महागड्या शिक्षणानंतर हाताला काम मिळू शकले नाही. (कदाचित ते मिळविता येवू शकले नसेल़ कारण काहींना आरक्षण असले तरीही तीव्र स्पर्धा करावी लागते)





अझीम  प्रेमजी विद्यापीठाच्या ‘स्टेट आॅफ वर्किंग इंडिया’ या अहवालात असेही नमूद केले, की देशातील बेरोजगारीचा दर २०१९-२० मध्य ८.८ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये ७.५ टक्के आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच देशातील सुशिक्षित  तरुणांमध्ये  बेरोजगारीचे  प्रमाण वाढले आहे.


या अहवालानुसार, सर्वाधिक २२.८ टक्के बेरोजगारी दर २५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतलेल्या २५  वर्षांखालील  तरुणांमधील बेरोजगारीचा दर २१.४  टक्के आहे, जो सर्वाधिक आहे. ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ १.६ टक्के आहे. यावरून हेच दिसून येते, की नोकरी वा रोजगार मिळविण्याचे वय वाढले असून, ते ३५ वर्षांच्या पलीकडे पोहोचले आहे़ त्याआधी नोकरी हस्तगत करण्याची  ‘वेळ’ ही आजच्या अत्याधुनिक काळात तरी नाही, जेव्हा की सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण मोठा खर्च करून घेतलेले शिक्षण वाया जाणार की काय, अशी भीती उदयास येणे साहजिकच आहे. कारण पालकांनी स्वकमाईतून वा कर्जातून  मोठ्या  रकमा  उभ्या  केलेल्या असतात. ही बाब स्वप्नात सुद्धा नाकारता येणे शक्य नाही. याशिवाय २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरक्षर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १३.५ टक्के असल्याचे  दिसू आले़ तर, ४० वर्षे आणि त्यावरील निरक्षर गटातील बेरोजगारीचा  दर २०.४ टक्के आहे. यातून  हाच निष्कर्ष बाहेर पडतो, की सुशिक्षितांच्याच हाताला नोकरी वा रोजगार मिळत नसेल तर निरक्षर तर दूर की बात है...



अझीम प्रेमजी विद्यापीठाने हा अहवाल सरकारी आकडेवारीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. एनएसओचे रोजगार-बेरोजगार सर्वेक्षण, श्रमिक कार्यबल सर्वेक्षण, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, लोकसंख्या जनगणना यासारख्या अधिकृत आकडेवारीचा आधार घेतल्याचे म्हटले आहे. यात समाधानाची एक बाब सुद्धा उल्लेखित आहे. देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला असला तरी उत्पन्नाची पातळी स्थिर राहिली असल्याचे म्हटले आहे. 



याशिवाय सदर अहवालात महिलांना मिळत असलेल्या संधीचाही उल्लेख केला आहे. कोरोना  महामारीआधी  महिलांच्या  उत्पन्नात घट होऊ लागली होती. २००४ पासून महिला रोजगार दर एकतर घसरत आहे किंवा स्थिर आहे. २०१९ पासून महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. महामारीच्या काळात महिलांनी अधिक प्रमाणात स्वयंरोजगार सुरू केले. कोरोना महामारीच्या आधीच्या दिवसांत ५० टक्के  महिला स्वयंरोजगार करत होत्या आणि  त्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 


संजय मुंदलकर

Sunday, 1 October 2023

IT'S POLITICLE दिसंबर बहुत दूर नहीं ...

 पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि  तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीनिमित्त प्रचार, सभांतून सत्ताधारी-विरोधकांतील आरोप-प्रत्यारोप-टीकांचा धुरळा उडेल. एक  दिवशी मतदान पार पडून निकाल जाहीर होईल. भारतीय निवडणूक आयोगाने आपले  वेळापत्रक घोषित केले़ आणि सत्ताधारी आणि विरोधकांना कामाला जुंपले. तसा अप्रत्यक्ष प्रचार मागील काही महिन्यांपासूनच सुरू झाला होता. कारण या दोघांनाही ‘पंचराज्य’ कोणत्याही  परिस्थितीत काबीज करायचे आहे. [ SANJAY MUNDALKAR' NITYAASAN ]


पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे म्हणजे  केंद्रीय  पातळीवरील  सत्तांतराचे  वर्ष. त्यामुळे  राजकीय दृष्टीने पाहता देशातील मानसिक बदलांचा कस लागणार आहे. कारण ही ‘पंचराज्य’ च   सत्ताधारी आणि विरोधकांचे नशीब ठरवेल. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी सत्ताप्राप्तीसाठी दंड  थोपटले आहे. याठिकाणी  ज्या पक्षांची सत्ता येईल, त्या पक्षांचे ‘हौसले बुलंद’ होतील, यात शंका नाही. जो यशस्वी ठरेल, त्याचंच ‘खरं’ असेल. 


‘पंचराज्या’ची निवडणूक ही सत्ताधारी वा विरोधकांसाठी २०२४ आधी सेमी फायनल नाही,तर मोठा ‘स्पीड बे्रकर’ म्हणता येईल. कारण हा मोठा अडथळा जो पार करेल, त्याची ‘नाव’ पार होणार आहे. या राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचे मोठे परिणाम निश्चितच लोकसभा निवडणुकीवर दिसून येतील. मुळातच मोदी सरकारच्या  नऊ वर्षांत देशवासीयांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे प्रतिबिंब या निवडणुकीच्या निकालात पाहता येईल. सत्ताधाºयांचाही प्रवास सोपा नाही. प्रचारासभादरम्यान २०१४ पासून आतापर्यंत निवडणुकीत  दिलेल्या किती आश्वासनांची आणि कशी पूर्तता केली, तेही छातीठोकपणे सांगावे लागणार आहे, अन्यथा आश्वासन पूर्ण न केल्याबाबत माफी मागत आगामी लोकसभा निवडणुकीआधी ते पूर्ण करण्याची ‘फुल्ल गॅरंटी’ द्यावी लागणार आहे. अर्थातच, हे काम तितके सोपे नाहीच. 





देशाची वाटचाल बदलली, काँग्रेसनेही बदलावे

काँग्रेसलाही पुढील लोकसभेत सत्ता गाठायची असल्यास २०१४ पासूनच्या  निवडणूक प्रचारपद्धतीला तिलांजली देत  नव्याने मूळ रुजवावे लागेल. सुमारे दहा वर्षांची सत्ता भोगल्यानंतर यूपीएला (आता काहीसे नामकरण इंडिया असे ...) बदलणे गरजेचे आहे. काँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्यानंतर  मागील नऊ वर्षांत देशाची वाटचाल पूर्णपणे बदलली आहे. भाजपामुळे नवी आव्हाने निर्माण  झाली आहेत.

निवडणूकही ‘डिजिटल’ झाली आहे, असे म्हणता येईल. झालेल्या चुकांची खुलेदिलाने देशवासीयांची माफी मागावी लागेल. याशिवाय केवळ सत्ताधाºयांवर टीका करून चालणार नाही तर देशासमोर विकासाच्या नव्या संकल्पना मांडाव्या लागतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  मुद्यांना कसे सोडविता येईल, याचाही उहापोह करावा लागेल. विद्यमान सरकारने नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. मुख्य म्हणजे देशात भाजपा समर्थक तयार झाल्याच्या मुख्य बाबीकडे  दुर्लक्ष करता येणे काँग्रेसला परवडणारे नाही.


मागील कर्नाटक निवडणुकीत प्रामुख्याने  ‘नमो’ आणि  ‘रागां’  यांच्यातील जुगलबंदी  पाहावयास मिळाली़ काँग्रेसने आपली प्रचारपद्धती बदलविल्याने कर्नाटक हाती आला़ आता आणि पुढील सर्व निवडणुकांत ही हेच करावे लागणार आहे़ कारण पाच राज्यापैकी फक्त राजस्थान आणि  छत्तीसगडमध्ये  सत्ता आहे़ भाजपाकडेही एकटेच मध्य प्रदेश राज्य आहे़ (या राज्यातही सहज सत्ता मिळालेली नाही) तेलंगणामध्ये बीआरएसची आणि मिझोराममध्ये एमएनएफ सत्तेत आहे. तर, राजकारणाची  दिवसेंदिवस बदलत असलेली दिशा आणि दशा  पाहून  ही  पाचही  राज्ये  ताब्यात  घेण्यासाठी  ‘दिसंबर बहोत दूर नही...’



संजय मुंदलकर


Friday, 29 September 2023

संयुक्त कुटुंबात हात आणि साथ सोबत-सोबत ...

 काही दशकांआधी भारतीय समाज संयुक्त होता. मोठ्या कुटुंबातून वास्तव्यास होता. एकेका कुटुंबात सामान्यपणे १० ते १२ सदस्यांचा समावेश असे. आईवडिल, मुले, सुना, नातू या नात्यांसोबत कधी कधी विधवा बहीण, आत्या वा अन्य नातेवाईकांचाही समावेश असे. सकाळपासून सुरू होणारा स्वयंपाक पार काही तासांपर्यंत चालायचा. शेतातील  कामे  असो वा घर हातभार लावणारी अनेक हात असल्याने कामे  कशी भराभर व्हायची !



काळ बदलत गेला. शेतांचे तुकडे झाले तसे कुटुंबे  दुभंगली. देशात कारखानदारीसोबतच विविध कार्यालये उदयास आली. नोकरीकडे जाणाºयांचे प्रमाण वाढले. आपल्या आईवडिलांच्या कुशीत पहुडणारी मुले  आता आपल्या मातापित्यांना आपल्याजवळ ठेवण्याच्या ‘पात्रते’ची  झाली. कधी  कधी  आईवडिलांना  भार समजून  तो वाटणीला आला. विवाहित बहिणींना  वेगवेगळ्या चॉईस मिळाल्या. जो तो आपल्या पुरतेच पाहू लागला. आणि त्यातून नव्या समस्या निर्माण झाल्या़ कुठे आजी आजोबा दूर झाले तर कुठे आत्या दुरावल्या. जगाचे रहाटगाडगे समजून समाजाने हे सर्व  मान्य केले. अद्यापही भारतीय कुटुंब विभागलेलेच आहे. संयुक्त  होण्याची वेळ आली असताना कुणाचीही मने समोर धजावत नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.






मात्र, त्याचवेळी अमेरिकन समाजात मोठे बदल होत आहेत. याठिकाणी संयुक्त कुटुंबे झपाट्याने वाढत आहेत. कदाचित त्यांनी ही कुटुंबपद्धत ‘सुखा’सोबत ‘समाधाना’चीही मानली असावी. कारण २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी आजोबांसोबत राहत आहेत. एका सर्वेक्षणानुसार,२०१५ ते २०२०च्या दरम्यान ‘सँडविच’ कुटुंबांची संख्या २८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, जे  त्यांचे पालक आणि  प्रौढ मुलांची काळजी घेतात, त्यांना ‘सँडविच’ पिढी म्हणतात. एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या लॉरा रेगन सहा वृद्ध सदस्यांच्या  कुटुंबाला  मदत  करतात. कधी कधी वृद्ध आई-वडील आणि मुलांची काळजी घेणे हे दोन भिन्न वास्तवांमध्ये जगण्यासारखे असते. दोन पिढ्यांना सुखी ठेवणे हे अवघड काम आहे; परंतु त्यांच्याकडूनच कामाचे व्यवस्थापन करायला शिकले आणि कुटुंबासोबतच्या आयुष्यातील  प्रत्येक दिवस  ही एक अनमोल भेट आहे याची मला जाणीव झाली, असे रेगन सांगतात.



विभक्त कुटुंबापेक्षा संयुक्त कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असल्याचे आढळून आले आहे. संयुक्त कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो, असेही अमेरिकन समाजात घडत आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये राहणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत़ तर, विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या केवळ  २० टक्क्यांची आहे. २७ टक्के उच्च उत्पन्न मिळवणाºया व्यक्ती संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा वाटा अनुक्रमे २१ आणि २४ टक्के आहे. 



संयुक्त कुटुंबातील सहजीवनात राहणारे ४८ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत. त्याच वेळी, विभक्त कुटुंबातील ४४ टक्के तरुण आनंद मानून घेतात. अमेरिकासारख्या नोकरीप्रधान समाज व्यवस्थेत लहान मुलांना आईवडिलांची जशी गरज आहे, तशीच आजी आजोबांची आणि अन्य नात्यांचीही आहे. संयुक्त कुटुंबाचा आनंद मिळतो, तो असा. कारण मनाने एकत्र राहण्याचे सुख केवळ याच समाज व्यवस्थेत अनुभवता येते. संयुक्त कुटुंबातील जबाबदाºयांच्या ओझ्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो, असे मानले जाते. कालांतरान े मात्र ही कुटुंबे पालक व मुलांत समतोल राखण्यास शिकली असल्याचेही आढळून आले आहे. ते आता जबाबदारीला ओझे मानत नाहीत. कारण त्यांचे हात आणि साथ आता सोबत-सोबत असतात़ 


संजय मुंदलकर

Wednesday, 20 September 2023

महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी सुगीचे दिवस मानायचे का ...

याशिवाय देशातील अन्य राज्यांमधील विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळू शकेल. मात्र, त्याच वेळी या सर्व जागा महिलांसाठी फक्त १५ वर्षांसाठी राखीव असतील. म्हणजेच त्यांना पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म अनुभवता येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर आरक्षण सुरू ठेवायचे असल्यास नव्याने कायदा करावा लागेल़ तरीही महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी हे सुगीचे दिवस मानायचे का, हाही एक मोठा प्रश्न आहे़




मागील २७ वर्षांपासून सातत्याने मागणी होत असलेले महिला आरक्षण विधेयक मोदी सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी ( १९ सप्टेंबर) मांडले. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये कारभार सुरू झाल्यानंतर मांडण्यात आलेले ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे नाव या विधेयकाला देण्यात आले आहे. त्यावर बुधवारी चर्चा होणार आहे. उल्लेखनिय असे विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमधील प्रत्येक तिसरा सदस्य हा महिला सदस्य असेल. 



असे असले तरी या महिला आरक्षण विधेयकाला एक इतिहास सुद्धा आहे. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात हे विधेयक राज्यसभेमध्ये ९ मार्च २०१० रोजी बहुमताने संमत झाले भारतीय जनता पार्टी, डावे पक्ष आणि जेडीयूने समर्थन केले होते. लोकसभेमध्ये मात्र मांडण्यात आले नाही. राष्ट्रीय जनता दलाबरोबरच समाजवादी पक्षाने त्यावेळी   विरोध केला होता आणि नेमकेच हे दोन पक्ष त्यावेळी यूपीए सरकारचा भाग होते. हे सदर विधेयक संसदेमध्ये मांडल्यास सरकारला समर्थन देणाºया पक्षांकडून विरोध होईल, अशी भीती त्यावेळी काँग्रेसला होती. यानंतर काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी २०१७  साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून सरकारने सदर विधेयक मांडल्यास आपला पक्ष समर्थन करेल असे म्हटले होते. शिवाय  काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा १६ जुलै २०१८ रोजी पत्र लिहून विधेयकाला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती.

 

लोकसभेमध्ये बुधवारी  (२० सप्टेंबर) विधेयक पारित होण्याची १०० टक्के शक्यता असून, यानंतर ते राज्यसभेत पारित केले जाईल़ राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर कायद्यात रुपांतर होईल. 


लोकसभेत सध्या ८२ महिला सदस्य आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’  विधेयकाचे  कायद्यात रुपांतर झाल्यास ३३ टक्के आरक्षणानुसार या जागा १८१ वर पोहोचतील. जागा महिलांसाठी राखीव असतील.  विधेयकामध्ये राजधानी दिल्लीच्या विधानसभेमध्ये सुद्धा  महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अर्थातच दिल्लीच्या विधानसभेतील ७० पैकी २३ जागा  महिलांसाठी राखीव असतील. याशिवाय देशातील अन्य राज्यांमधील विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळू शकेल. मात्र, त्याच वेळी या सर्व जागा महिलांसाठी फक्त १५ वर्षांसाठी राखीव असतील. म्हणजेच त्यांना पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म अनुभवता येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर आरक्षण सुरू ठेवायचे असल्यास नव्याने कायदा करावा लागेल़ तरीही महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी हे सुगीचे दिवस मानायचे का, हाही एक मोठा प्रश्न आहे़ कारण संसदेत आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर तो कायदा होईल सुद्धा; परंतु त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे काय? त्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, असेही सांगण्यात येते़ यात कदाचित दोन लोकसभेइतका (अर्थात १० वर्षे) कालावधीही असेल़



इथंपर्यंत सर्व ठीक असले तर ही महिला आरक्षणाची मागणी थेट २७ वर्षांपासून हो त आहे. म्हणजेच इतक्या कालावधीत पाच निवडणुका पार पडल्या असत्या. कारण महिला आरक्षण विधेयकाची मागणी पहिल्यांदा सप्टेंबर १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोर्चाच्या सरकारने ८१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या स्वरुपात लोकसभेमध्ये करण्यात आली. हेच विधेयक १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही मांडले. अनेक पक्षांना एकत्र आणून तयार करण्यात आलेल्या सरकारच्या या विधेयकाला विरोध झाला. वाजपेयी सरकारने १९९९, २००२ आणि २००३ साली सुद्धा विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला. त्यातही  यश आले नाही. अखेर २००८ साली विधेयक सादर करण्यात आले. यात लोकसभासह राज्यातील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे म्हटले होते. राज्यसभेत ९ मार्च २०१० रोजी बहुमताने भाजपा, डावे पक्ष आणि जेडीयू आदी पक्षांच्या समर्थनाने पारित झाले; परंतु लोकनियुक्त प्रतिनिधी असलेल्या लोकसभेत मात्र सादर करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.


संजय मुंदलकर

Friday, 15 September 2023

‘झड’ गेलीय कुठं?

तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्यांच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ 


एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीनं सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया लोेकांना कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडली तरी काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़ 


काही शेतकरी दोघा-तिघांच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’ त  पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान फायद्याविषयी बोलू दाखवितात.  डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा अंदाज लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडं चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीनं जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़



घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरंही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा पडलेला असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातली धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोरगं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े शाळालाही सुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या, पुराच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू घोटत नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़

आजच्या पिढीला ‘झड’ काय असते, ते उमगत नाही, आम्हीही त्याचा अर्थ सांगत नाही़ झडचं नाही तर बोटानं दाखवणार काय? गावातल्या तलावातील पाणी हाच ‘पूर’ म्हणून सांगितला जातो. पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ कारण माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं निसर्गाच्या पायावर कुºहाडीचे, तंत्रज्ञानाचे कित्येक घाव घातले. जल, जंगल, हवा नासवून टाकली.

रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची  ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर गारठा वाढत जातो, थंडीनं हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते, तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़


दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं, तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़, आम्ही ती गमावून बसलो़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ काय असते, ते उमगत नाही, आम्हीही त्याचा अर्थ सांगत नाही़ झडचं नाही तर बोटानं दाखवणार काय? गावातल्या तलावातील पाणी हाच ‘पूर’ म्हणून सांगितला जातो. पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ कारण माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं निसर्गाच्या पायावर कुºहाडीचे, तंत्रज्ञानाचे कित्येक घाव घातले. जल, जंगल, हवा नासवून टाकली. विज्ञानानं माणसाच्या नको त्या विकासासाठी ‘विजय’ मिळविला असला तरी त्यासाठी बुद्धी गहाण टाकून स्वत:ची इतकी हानी करवून घेतली, की आता भरपाई होणं अशक्य आहे़ निसर्गाच्या विरोधात केलेल्या पापाचे परिणाम अख्खी मानवजात कुढत कुढत आज भोगत आहे़ 


संजय मुंदलकर

‘गावाकडची बेंबळा’ संग्रहातून

Sunday, 20 August 2023

SAANJANTANOO ऐ माझ्या राजसा

 ऐ माझ्या राजसा




ऐ माझ्या राजसा,कां रुसला असा?

घे ना जवळी, नको रे दुरावा


हे प्रीतीचे बंध सरेना कधी गंध

जीवनी तुझा श्वास जाहला जीव धुंद

वेडावली राधिका़


व्यर्थ तुजविन जगणे तू भ्रमर, मी फुलणे

नाते हे युगांतरीचे कधी ना सरे

रोमांचली प्रेमिका़


सप्तपदी चालुनी मी येईल तुज अंगणा

धागा शतजन्मीचा मोक्ष मिळता तुटेना

लाजरी बावरी़


संजय इस्तारी मुंदलकर

SAANJANTANOO मला की कुणाला?

         मला की कुणाला?


हा ऋतुगंध खुणावतो मला की कुणाला़

हा ऋतुगंध वेडावतो मला की कुणाला़


मोरपंखी आयुष्य माझे

थुईथुई करती तुषार संगती

सानुले गवतपान डोलते

झुलते खट्याळ वाºयावरी

हा ऋतुगंध हसतो मला की कुणाला?


लाजरे अन् बुजरे फुलपाखरू

एकांती मग्न फुलांसवे

मीही फुलले रोमांचले

मीही बहरले कुणा संगती

हा ऋतुगंध हसतो मला की कुणाला?


संजय इस्तारी मुंदलकर

                                                                      [ SAANJANTANOO]       

Tuesday, 4 July 2023

‘चित्रपती’ शांताराम

शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. माध्यमांवर त्यांची जबरदस्त पकड होती. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लिन यांनी  सुद्धा शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम  बापूंना  ‘चित्रपती’ ही पदवी दिली.


 शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटांतील सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेले नाव. शांताराम बापू  या नावाने ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत  त्यांनी आपला खोल  ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ साठ वर्षे  ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. 

शांताराम बापूंचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथील एका सुखवस्तू घरात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या एका मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली. चित्रपट निर्मितीचे मर्म आत्मसात करीत ते भराभर पुढे जात राहिले. १९२५ साली निर्माण झालेल्या ‘सावकारी पाश’चित्रपटात त्यांनी तरुण शेतकºयाची भूमिका केली. १९२७ साली त्यांनी ‘नेताजी पालकर’हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.



बाबूराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री. दामले, श्री. फत्तेलाल, श्री. धायबर आणि श्री. कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात ैप्रभात फिल्म्सची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. गोपाळ कृष्ण, राणी साहेबा, खुनी खंजर, उदयकाल  असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.

प्रभातचा पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी सैरंध्री हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचे धाडस केले; पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. त्यामुळे प्रभातला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.  डगमगून न जाता शांताराम यांनी ‘अमृतमंथन’ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली तयार केलेला ‘संत तुकाराम’ बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हिनिस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. भारताबाहेर दाखविला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. 

प्रभात फिल्म्सचा विस्तार करण्यासाठी चारही मालकांनी पुण्यात जागा घेतली आणि तेथे भव्य अशा अत्याधुनिक प्रभात स्टुडिओची स्थापना करण्यात आली. चित्रपटनिर्मितीला आधुनिक रूप प्राप्त झाले. एकीकडे पौराणिक चित्रपट बनवत असतानाच शांताराम बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांचीही निर्मिती केली. जरठ विवाहावर टीका करणारा ैकुंकू(दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा माणूस (आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.

राजकमल कला मंदिर

शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन ैराजकमल कला मंदिर ही स्वत:ची  संस्था स्थापना केली. राजकमलच्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. 

१९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारित डॉ. कोटणीस की अमर कहानी, १९५१ मध्ये  होनाजी बाळांचा अमर भूपाळी, उत्तम नृत्ये असलेला १९५५ सालचा रंगीत झनक झनक पायल बाजे, कैद्यांना प्रेमाने वागविण्याचा संदेश देणारा १९५७ मधील दो आँखे बारह हाथ आणि एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा १९५९ चा नवरंग  हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. 

डॉ. कोटणीस... आणि दो आँखे... या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२ मधील  ‘पिंजरा’ने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. ‘पिंजरा’ हा मराठीतील पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.

शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. माध्यमांवर त्यांची जबरदस्त पकड होती. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लिन यांनी  सुद्धा शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम  बापूंना  ‘चित्रपती’ ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार १९८५ साली शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने  त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कथानकाची निवड, त्याचा आशय, कॅमेºयाचे तंत्र, संकलन या  बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कला, मनोरंजनाचे माध्यम तर आहेच; पण  यातून  समाजाला  योग्य संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. या महान दिग्दर्शकाचे ३० आॅक्टोबर १९९० रोजी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत निधन झाले.              

    Ⓒ SANJAY MUNDALKAR

Saturday, 1 July 2023

पुष्पा, आय हेट टीअर्स ...

 आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आगामी १८ जुलैला स्मृतिदिन. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार  युग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले, ही कामगिरी मोठी मानली जाते.



राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ चित्रपटापासून (१९६५)  अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आनंद, आराधना, आन मिलो सजना, मर्यादा, दो रास्ते,अंदाज, बावर्ची, मेरे जीवन साथी, कटी पतंग, हम दोनो,अवतार, अमर प्रेम यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. दो दिलों के खेल मे हा प्रदर्शित झालेला चित्रपट अखेरचा (२०१०) ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले, हा एक विक्रम मानला जातो. 

संगीतातून रोमान्स

राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे. किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना स्वर दिला.आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. मेरे सपनों की राणी कब आएगी तू म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे चारचाकीने पाठलाग करणारा, जिंदगी कैसी हे पहेली...कभी ये हसाए कभी ये रूलाये, असे म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई, असे म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है...म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी ये जो मोहब्बत है, म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणाºया रोमँटिक राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर रूळलेली दिसतात. 

काका... कसे

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा पंजाबी भाषेतील अर्थ  लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा हिंदी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळी तरुण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये ‘काके’ अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू ‘काका’ हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 


हृषिकेश मुखर्जी यांची निर्मिती असलेला आनंद १९७१ मध्ये पडद्यावर आला होता.  राजेश  खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणले. गाण्यांसोबत संवादही लोकप्रिय ठरले. राजेश खन्ना  यांचा रेकॉर्ड केलेला आवाज टेपच्या माध्यमातून ऐकवला जातो-‘बाबू मोशाय...जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहाँपनाह...जिसे  ना आप बदल सकते है ना मै.....हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है, जिसकी डोर उपरवाले की उंगलीयों मे बंधी है...कौन, कब, कैसे उठेगा कोई नही जानता’ राजेश खन्ना  यांचे असे संवाद अमर बनले. 


१४  फिल्मफेअर नामांकन

राजेश खन्ना यांना  आनंद, बावर्ची, नमक हराम,अमृत या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी  गौरवण्यात आले. 


सुपरहिट गाणी

#  मेरे सपनों की राणी कब आएगी तू 

#   जिंदगी कैसी है पहेली

#  एक अजनबी हसिना से 

#  गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है गली गली

#  ये जो मोहब्बत है

#  हजार राहें मुड के देखी

#  जय जय शिवशंकर

#  जिंदगी प्यार का गीत है

#  ससुरा तिरथ, तिरथ साला साल ी है

#  कभी दोसती ने मारा

#  यू ही तुम मुझसे बात करती हो

#  नदीया  से दरिया

#  इतना तो याद है मुझे

#  ये जो चिलमन है

# नाच मेरी बुलबुल

#  जिंदगी के सफर में

#  ये लाल रंग मुझे 

#  जा ना याद आ मुझे 



Tuesday, 9 May 2023

किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली ...

आपल्या देशात सरकारकडून संरक्षण क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रासाठी  सर्वाधिक तरतूद करण्यात येते आणि त्यावर खर्चही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो़ भारतीय शिक्षणात अनेक टप्पे आहे़ त्यावर कितपत अंमलबजावणी करण्यात येते, हा भाग वेगळा़ ...

बालवाडी, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, व्यवस्थापन शिक्षण असे विविध टप्प्पे आहेत़ म्हणूनच मोठा आवाका असलेल्या या क्षेत्रात गैरव्यवहार, भ्रष्टाचार, बोगस  संस्था अशी गुरफटलेली समीकरणे दिसून येतात. 



गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बोगस शाळांचा मुद्दा गाजत होता. त्यामुळेच आता प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहर, गावागावांत तयार करण्यात आलेल्याप्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा  यांच्यावर पुढील काळात शिक्षण विभागाचे नियंत्रण  राहणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, इतकेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आणि समाजालाही मोठी आणि क्रांतिकारक अशी जबाबदार पार पाडावी लागणार आहे.

शाळा असो महाविद्यालये वा उच्च शिक्षण देणाºया संस्था, यावर आतापर्यंत शिक्षण विभागाचे  कोणतेही  नियंत्रण  नसल्याने  मनमर्जी कारभार पाहायला सर्वांनी अनुभवला. शिक्षणाच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी, मनमानी पद्धतीने शाळांचे संचालन या सर्व बाबींवर प्रशासनाचे नियंत्रण नव्हते, असे म्हणणे धाडसाचे धरणार नाही. अशातच आता शिक्षण विभागाने अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. याशिवाय प्ले ग्रुप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानी घेणे अनिवार्य केले आहे. मुलांना वयानुसार, मानसिक विकासानुसार शिक्षण देणे बंधनकारक असल्याचा  निर्णय  नवीन  शैक्षणिक धोरणानुसार घेण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन  होणार असल्याची माहिती आहे. 

मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत खासगी पद्धतीने नर्सरी, केजी अशा वर्गांच्या  शाळा चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर अंगणवाड्या असताना देखील आपल्या मुलांना नर्सरी, केजीसह इतर वर्गात पाठवण्याची मानसिक पालकांमध्ये दिसून आली़ याच बाबीचा गैरफायदा घेत अनेक संस्थाचालकांकडून वाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे असे प्रकार प्रकार समोर येत होते. त्याच्या घरी रंगीत टीव्ही, दुचाकी  वा  कार म्हणून आपल्याही घरी हवे, त्याचा मुलगा/ मुलगी  सायन्सला  म्हणून माझ्याही मुलगा/ मुलीने सायन्स अभ्यासक्रम घ्यावा, असा अट्टहास ( की वेडेपणा) करणाºया पालकाने आपल्या पायावर अनेक दगड पाडून घेतले. यात समाजातील किती पालकाचे नुकसान झाले, त्याची गिनती नाही़ शासनाने वा प्रशासनानेही कधी त्याचा आढावा घेतला नाही. परिणामी बेरोजगारी निर्माण करणाºया शिक्षणसंस्था निर्माण झाल्या़ 

एखाद्या  शाळेचा  वा महाविद्यालयातील  विद्यार्थी वा विद्यार्थिनी पुढील आयुष्यात काय करतो, तो कुठे आहे, त्याचे समाजात अस्तित्व आहे की नाही, याबाबत कोणत्याही शिक्षण संस्थेने हिशोब ठेवला नाही. किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली, ही  नोंद  समाजाकडेही नाही.

 विद्यार्थी जीवनात हुशार असलेली  मुले  प्रवाहाबाहेर गेल्याचे आणि त्याचवेळी  वशिला किंवा पैशांच्या जोरावर अभ्यासातील कच्ची मुले त्यांच्या किती तरी पुढे गेल्याचे याच समाजाने अनुभवली. आता  प्रत्येक  डोक्याची आकडेवारी  ठेवावी  लागणार आहे, तेव्हाच खर्च केलेला पैसा  सशक्त मनुष्यबळाच्या स्वरूपात वसूल  होईल, असे आम्हास वाटते.

Ⓒ SANJAY MUNDALKAR

Tuesday, 2 May 2023

संस्कार आणि घटस्फोट

 ज्यावेळी कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांची चर्चा भरात येते, त्यावेळी भारत देश अव्वलस्थानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. कारण भारतात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मूळ धरून आहे. या देशाने नेहमीच परंपरा, संस्कृती, वारसा आदी बाबींचा आदर केला. म्हणूनच वर्ल्ड आॅफ स्टॅटिक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात घटस्फोटाची सर्वात  कमी  प्रकरणे असल्याचे स्पष्ट  केले आहे. 

 ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात जग हे एक कुटुंब आहे, ही धारणा भारताने कधीचीच अभिमानाने स्वीकारली आहे. आणि त्याची सत्यता दिवसांगणिक आणखीच वाढत असल्याचा प्रत्यय वारंवार दिसून येतो. जगातील देश संकटात सापडले असताना ते भारताकडे आशेने पाहतात, तेव्हा त्यांना कधीही निराशेचा सामना करावा लागत नाही. जिथून सर्वांना  ‘वसुधैव कुटुंबकम्’चे बळ  मिळते, तिथे  निराशा कशी येणार...हे बळ आपल्या कुटुंबातून आणि संस्कृतीतून मिळत असते. जन्मापासूनच वडीलधारी मंडळी संस्कारांबद्दल, संस्कृतीबद्दल बोलत असतात. सौजन्य शिकविण्यात येते.  त्यातून धार्मिक महत्त्वाचा सुद्धा विस्तार होत असतो.



कुटुंबाचा  स्पष्ट अर्थ आहे. आपुलकीने एकत्र राहणे आणि संकटसमयी पाषाणासारखे खंबीरपणे  उभे राहणे.  कुटुंबात  केवळ  स्वत:च्या महत्त्वाचीच चर्चा होत नाही, तर जवळच्या आणि प्रियजनांचीही चर्चा होत असते. स्वत:पेक्षा इतरांचीच चर्चा अनुभवास येते. आपण, माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहात, ही भावना कुटुंबातच  तयार होते आणि त्याची जडणघडण मजबूत होते आणि म्हणूनच विवाहाला अधिक महत्त्व प्राप्त होते, तेव्हा घटस्फोट होऊ नये, तो टाळला जावा, असा  पुरेपूर  प्रयत्न  करण्यात येतो. परंतु, जगण्याच्या, व्यवहाराच्या संकल्पना सातत्याने बदल्याने विवाह मोडण्यात येतो आणि त्याचा विच्छेद केला जातो.

असे असले तरी उपरोक्त  अहवालानुसार भारतात घटस्फोटाचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. तर, व्हिएतनाम देशात ७ टक्के, ताजिकिस्तानमध्ये १० टक्के, इराणमध्ये १४ टक्के, मेक्सिको, इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत  प्रत्येकी १७ टक्के, ब्राझील  देशात २१ टक्के आणि तुर्कीमध्ये २५ टक्के असल्याचे सांगण्यात येते.  पोतुर्गालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक ९४ टक्के आहेत. स्पेनमध्ये ८५ टक्के, लक्झेंबर्ग ७९ टक्के, रशिया ७३ टक्के, युक्रेन ७० टक्के, क्युबा ५५ टक्के, फिनलंड ५५ टक्के, बेल्जियम ५३ टक्के, फ्रान्स ५१ टक्के आणि अमेरिकेत सुमारे ४३ टक्के आहे.अहवालानुसार, घटस्फोटाची प्रकरणे आशियाई देशांमध्ये सर्वात कमी आहेत, तर युरोप आणि अमेरिकेची  स्थिती  दयनीय आहे. बहुतेक कुटुंबांची ताटातुट झालेली आहेत. अमेरिकन लोक स्वावलंबनाचा मुद्दा पुढे करत प्रौढ होताच वा त्यापेक्षाही कमी वयात  कुटुंबापासून  दूर जातात. भारतातील तरुण देखील त्याबद्दल बोलतात. परंतु, कुटुंब  वा  संस्कृतीपासून दूर जात नाहीत.

भारतातील  लोक  कुटुंब आणि संस्कारांना महत्त्व देतात. लग्न म्हणजे  केवळ दोन व्यक्तीनी एकत्र येणे नसून आत्मा, कुटुंब आणि धार्मिक  विधी यांचे  मिलन असा आहे. येथे दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक सुख-दु:खात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. परस्पर बुद्धीने वाद मिटवले जातात. अनेकदा पत्नी-पत्नीमधील वाद नातेवाईकांच्या पातळीवरच सोडविण्यात येतात़ कोर्टाची पायरी चढू दिली जात नाही. तथापि काहीवेळा प्रकरणे बिघडतात आणि  मग घटस्फोटाची दिशा सुरू होते. मात्र, भारतातील स्थिती ही अन्य देशांच्या तुलनेत फार वेगळी असल्याचे वारंवार अनुभवास येते. कारण या देशातील  धार्मिक परंपरांना, विधींना संस्काराच्या दृष्टीतून पाहण्यात येते आणि म्हणून भारतातील कुटुंब व्यवस्था अद्याप विस्क  ळीत झालेली नाही, हे मान्य करावेच लागतेच!

Ⓒ SANJAY MUNDALKAR

Monday, 1 May 2023

ऋतूंनी बदलविल्या जागा ...

मुख्य म्हणजे उत्पादकता घटल्याने रोजगारावर परिणाम होईल. उन्हाळ्याचा  कालावधी वाढल्याने  जगभरातील ८० दशलक्ष नागरिक येत्या सात वर्षांत म्हणजेच  २०३० पर्यंत आपला रोजगार/ नोकºया गमावू शकतात.त्याची झळ  भारतालाही पोहोचेल, असेही  सांगण्यात येत आहे. कडक उन्हाचा पाणी, जंगल, जमीन आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. 


मागील एप्रिल महिना उन्ह-पावसाने संपला आणि आता चालू मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस...देशातील काही भागात मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये विक्रमी तापल्यानंतर  यावर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. उष्ण वाºयांमुळे केवळ मानवच नव्हे, तर प्राणी आणि  जंगलावरही  वाईट  परिणाम होण्याची चिन्हे आहेत. एकूणच  एक पर्यावरणाची तर मोठी हानी होत आहे. आपल्या देशातील हवामान संस्थांसोबतच जागतिक बँकेनेही उष्णतेबाबत गंभीर इशारा दिला आहे.


जागतिक बँकेनुसार तापमानात सातत्याने होणारी वाढ  केवळ  या वर्षीच नव्हे तर पुढील अनेक वर्षे सामान्य जनजीवनावर प्रतिकूल परिणाम करत राहणार. त्यामुळे मानवी जीवनावर अनेक प्रकारे संकटाचे ढग दाटून राहतील. हवामानातील बदलामुळे मानवी जीवनाला दुहेरी धोका निर्माण होईल, असे जागतिक बँकेच्या ‘क्लायमेट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन इंडियाज  कूलिंग सेक्टर’ अशा शीर्षकाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.





यावर्षी अर्थात २०२३ मध्ये देशात  उष्णतेची  तीव्र  लाट  येईल, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी मार्च २०२२ मध्ये दिला होता. त्यांचा  हा अंदाज खरा ठरला. कारण फेब्रुवारी २०२३ मध्ये अचानक  हवामान बदलले आणि मागील १७ वर्षांत हा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण ठरला, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. यंदा फेब्रुवारीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. या महिन्यातील सहा दिवस कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके होते. 


 दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच मे-जूनमधील उन्हाळा अनुभवायला मिळाला. यंदाही उष्णतेच्या लाटेचा सामान्य जनजीवनावर वाईट परिणाम होईल, असा अंदाज आता हवामान खात्याने पुन्हा वर्तवला; परंतु मे महिन्यात वातावरण बदलले आणि चक्क पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विदर्भातील काही नद्यांना पुराची स्थिती अनुभवावी लागली.  मे महिन्यातील तापमान २९ ते ३० अंशांपर्यंत खाली आले आहे.  कुठून कसा ऋतू बदलतोय, ही बाब सर्वसामान्याच्या आकलनापलीकडील आहे, असे म्हणता येणार नाही. 

हवामानाचे ऋतू बदलत असल्याचा धोका वर्तविण्यात येत आहे़ आगामी २०६० वर्षांपर्यंत उन्हाळ्याचे दिवस १८ दिवसांपर्यंत वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानाचे दिवस  लक्षात  घेत  पीक लागवडीच्या कालावधीत बदल करावे लागणार, असेही म्हटले आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी असे चार-चार महिन्यांच्या कालावधीचे हंगाम कधीच मागे पडल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. तिन्ही ऋतूंनी आपापल्या जागा बदलविल्याचे प्रकर्षाने जाणवत आहेत. तसे पाहता मे महिना सर्वाधिक प्रखर उन्हाचा असतो. उष्म्याचे विक्रम  मोडणारा हा महिना असतो. जागतिक बँकेने आपल्या अहवालात उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर  वाईट  परिणाम  होणार असल्याचे म्हटले आहे़ शिवाय उत्पादकतेवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे  सांगण्यात आले.

हे  बदल कसे आणि कुणी केले? आणि शेवटी बोट जाते, ते मानवाकडेच!


संजय मुंदलकर                                                            

Tuesday, 25 April 2023

आपल्याच जाळ्यात मानव

 माणसाच्या आधी निसर्ग अस्तित्वात आला. पाने, फुले, हवा, पाणी, पशु-पक्षी अशा  सर्व गोष्टी निसर्गानेच बहाल केल्या.  माणूस स्वार्थी झाला आणि त्याच्या कार्यकक्षेत  नको तिकी ढवळाढवळ करायला सुरुवात केली. त्यामुळे जंगल, जमीन, पाणी, हवा अशा सर्व घटकांचे नुकसान केले. पाणी हे  सर्वात मोठे उदाहरण सांगता येईल. त्यामुळे जलप्रदूषण ही आज मानवाच्या अस्तित्वाची मोठी समस्या बनवली आहे. 

संपूर्ण जगात  काही आजार, रस्ते अपघात यांमध्ये मृत्युमुखी पडणाºया लोकांपेक्षा अधिक मृत्यू हे प्रदूषित पाण्यामुळे होत असल्याचे संशोधक वारंवार सांगत असतात. संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोक आजही दूषित पाणी पितात. पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात  एकत्र मिसळले गेल्यानो ते प्रदूषित होते आणि मानवच काय  वन्यजीव-प्राण्यांच्याही आरोग्यास हानिकारक बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातही मोठ्या लोकसंख्येला स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी शहरी लोकांची आहे. गावखेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही दूषित पाणी पित असल्याचे वारंवार दिसून येते. परिणामी ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे. 


संयुक्त राष्ट्रानुसार, आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या देशांमध्ये प्रत्येक वर्षी ३५ लाख लोकांचा मृत्यू पाण्यामुळे होणाºया विविध आजारांमुळे होतो. प्रदूषित किंवा घाण पाणी प्यायल्याने प्रत्येक वर्षी जगात ८ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू होतो.लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या योग्य पातळीवरील सुविधा उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण जगात पाण्यामुळे होणाºया आजारांच्या उपचारांवर देशांचा होणारा खर्च नऊ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो. भारताशिवाय असे ३२ देश आहेत, जिथे पाण्यामुळे होणाºया आजारांची संख्या अधिक आहे. या सर्व देशांमध्ये स्वच्छतेच्या सोयी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्यास आजार आणि त्यासंबंधी गोष्टींवर होणारा खर्च कमी होईल, असेही युनोने म्हटले आहे.

प्रदूषित पाणी हे मानवासाठी विषासारखेच आहे. जगभरात मोठ्या प्रमाणातील आजारांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रदूषित पाणी हेच कारण आहे. प्रदूषित पाण्यात अनेक रोगकारक जीवाणू, विषाणू असल्याने या पाण्यामुळे रोगांचा फैलाव होतो. अशा पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने मणक्याचे हाडही वाकडे होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात.

मानवाच्या हाती विज्ञानाचे कोलीत लागले आणि विविध रसायनांचा शोध लावण्यात आला. पिकांवर रसायनिक द्रव्ये फवारण्यात येऊ लागली. पिकांच्या वाढीसाठी जमिनीत रासायनिक खते जवळजवळ पेरण्यात आली़ अतिरेक वाढल्याने ती नापिक बनली़ तर, तिच्यातील अर्क पाण्यात उतरला़ प्रवाहित होऊन नाले-ओढे प्रदूषित झाले आणि पुढे नद्या. त्यातील पाणी घरोघरी पोहोचले.

शहरातील घरांघरातील सांडपाणी जाणीवपूर्वक लहान मोठ्या नद्यांत सोडण्यात आले़ रासायनिकसारख्या तत्सम हजारो कारखान्यांतील दूषित घटके नद्यांत सोडण्यात आली़ त्यामुळे प्रत्येकाच्या घरात दूषित पाणी आपोआप पोहोचले. 

जगातील कोणताही देश असो वा कोणत्याही देशातील एखादे शहर असो, ही समस्या मानवानेच तयार केली आहे़ पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक स्रोत दूषित करण्यात आला आहे़ ही बाब नाकारता येणार नाही़ निसर्गाने प्रदान केलेल्या खळखळत्या नद्यांना अवरुद्ध करून त्यांच्या विदू्रपीकरणाचा मोठा खेळ अख्ख्या मानवजातीने खेळला़ आता निसर्ग त्याला आपल्या बोटावर नाचवत आहे.

Tuesday, 18 April 2023

प्रत्येक जण मृत्यूच्या दाढेत

 आज मंगळवारी नागपूरवासीयांसाठी  दु:खाचा ठरला़ बुलढाणा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर भीषण अपघात अपघातात भारतीय क्रिकेट खेळाडू प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा मृत्यू झाला. तर, ते स्वत: जखमी झाले. मेहकरजवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. कार चालकाला  झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती  मिळत आहे. तपासानंतर दुर्घटनेचे कारण बाहेर येईलच.


 सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या   मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजतो, मग त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

 देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, सुरक्षित व्हावी,हाही त्यामागील हेतू आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा हेतू साध्य झालेला आहे, असे काही ठाम म्हणता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका दिसून येते़  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच; परंतु सहापदरी आणि चारपदरी अशा अधिक रुंदीच्या मार्गांवरही असे अपघात वारंवार व्हावेत,हे मोठे दुर्दैव आहे.

      अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसते. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत असतात. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे, व्यवस्थित परवाने न दिलेले हे वाहक वाहतुकीच्या नियमांबाबत कधीच दक्ष नसतात. उलट आपण वाहतुकीचे नियम डावलून हमखास वाहतूक केली पाहिजे,याबाबत ते गरजेपेक्षा जास्त दक्ष असतात. त्यामुळे वेगाची मर्यादा न पाळणे, टोलनाक्यावर भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  रस्ते  आहेत  तेवढेच  आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे आव्हान समाजासमोर दिवसांगणिक बिकट होत चालले आहे.

Ⓒ SANJAY MUNDALKAR

Monday, 10 April 2023

शंभरीत पंच्चाहत्तरी

 भारतीय चित्रपटसृष्टीत मागील ७५  वर्षांत एवढा बदल झाला आहे की तो मोजक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. यासोबतच हेही खरे आहे की, भारतीय  चित्रपट देशातील  प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्पर्श करतो, त्याच्या समस्यांपासून ते नातेसंबंध आणि यश-अपयश या सर्व गोष्टी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आता विदेशातही भारतीय चित्रपटांना एक खास ओळख  मिळत आहे. 

कॅनडा, जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये भारतीय चित्रपटांची मोठी कमाई होत आहे. त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. मागील दिवसांत ‘आरआरआर’ ने केलेली  मोठी कमाल  जगाने अनुभवली आहे.

अनेक लेखकांनी स्वातंत्र्यानंतरच्या हिंदी चित्रपटांबद्दल बरेच काही सांगितले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीवर  नेहरूवादी  समाजवादाचा प्रभाव दिसून आला. 

तथापि, या काळात बनवलेले  काही महत्त्वाचे चित्रपट, जसे राज कपूरचा आवारा (१९५१), बिमल रॉयचा दो बिघा जमीन (१९५३), मेहबूब खानचा मदर इंडिया (१९५७) आणि गुरू दत्तचा प्यासा (१९५७) या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होते, की त्या काळातील हिंदी चित्रपट नेहमीच नेहरूंच्या भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत नव्हते. हेही खरे आहे की, अंदाज, नया दौर, हावडा ब्रिज यांसारखे तत्कालिन  चित्रपट नेहरूंच्या आधुनिक भारताच्या आदर्शाचे, आधुनिकतेच्या चांगल्या बाजू चित्रित करण्यात यशस्वी ठरले. देशाचा विकास डॉक्टर, अभियंता आदींच्या पात्रांच्या माध्यमातून दाखवला जातो आणि जुगार खेळणाºयांची पात्रे आणि दृश्ये, कॅबरे डान्स इत्यादींच्या माध्यमातून वाईट बाजू दाखवली जाते.  या दोन्ही बाबी समाजावर खोलवर परिणामकारक ठरल्या आहेत.



याशिवाय  देशातील  चित्रपटनिर्मितीवर काही महत्त्वाच्या घटनांचाही परिणाम झाला. भारत-चीन युद्धातील वेदनादायक सत्यता, १९६०च्या दशकातील हरित क्रांती, आणीबाणी  आदी ऐतिहासिक घटनांना हिंदी चित्रपटसृष्टी चुकली नाही. यानंतरच्या काळातील वाढलेली   लोकसंख्या आणि बेरोजगारी हा मुद्दा सुद्धा चित्रपटांत दिसून आला. १९८० च्या दशकात खलिस्तान चळवळीचा प्रभाव सुद्धा पाहावयास मिळाला. नव्वदच्या दशकापासून मात्र चित्रपटक्षेत्राच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी जागतिकीकरणासह आर्थिक उदारीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात केली. ही बाब चित्रपटक्षेत्रालाही लागू झाली.

मिस्टर इंडिया, तेजाब, कयामत से कयामत तक, मैने प्यार किया,  खिलाडी यासारख्या चित्रपटांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाने हिंदी  चित्रपटसृष्टी  अधिक मजबूत झाली. २१व्या शतकाच्या  वळणावर   प्रामुख्याने  गुन्हेगारी पात्रे आणि  समाजाची  काळी  बाजू  दाखवण्यात आली होती. तर, २००० सालानंतर चित्रपटांनी नवे रूप स्वीकारल्याचे आपणांस दिसून आले. पुढील दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शर्यत सुरू झाली आणि त्यावरच हिंदी चित्रपटाचे यश अवलंबून दिसून आले.

आज  हिंदी  चित्रपटांचा प्रवास वेब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचला आहे. यातून चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या  वेबसिरीज आणि चित्रपटांची निर्मिती करावी लागत आहे. कोरोना महामारीच्या काळाने तर प्लॅटफॉर्मला आणखी चालना दिली आहे. चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद झाल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन येथूनच होऊ लागले. अनेक वर्षे  चित्रपटाचा पडदा गरीब टेलिव्हिजनला हसत होता़ आता ओटीटीने रुपेरी पडद्याला मात्र जोरदार टक्कर दिल्याचे म्हणता येईल.


@ sanjay mundalkar

Wednesday, 5 April 2023

लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस चढण्यासारखे ... भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे.

 भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत  प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे. 






देशाच्या विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मैलाचे दगड ठरल्या आहेत, कृषी क्षेत्रापासून, आण्विक आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत, सामान्य माणसाला उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांपासून, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, वैद्यकीय शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत आणि उपचाराच्या विविध पद्धती, जैवतंत्रज्ञानापासून, जगात सक्षम आयटीपर्यंत. पॉवरहाऊस म्हणून, जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाºया प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने, भारताने मोठा बदल पाहिला आहे. आपली लोकशाही राज्यघटनेवर आधारित आहे़ याच कारणामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जागतिक स्तरावर नावलौकिक  निर्माण केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्विकासात एकापाठोपाठ एक अनेक पंचवार्षिक योजना आल्या आणि या योजनांनी महत्त्वाचा पाया म्हणून काम केले आहे. आजपर्यंत देशात जितक्या वेळा लोकसभा निवडणूक झाल्या, तितक्या वेळा देशातील लोकशाहीही मजबूत झाली आहे आणि विविध आव्हानांना तोंड द्यायलाही ती शिकली आहे. 

 हरितक्रांतीमुळे देशातील तृणधान्यांच्या उत्पादनात (विशेषत: गहू आणि धानाच्या उत्पादनात) अभूतपूर्व वाढ झाली. आज भारताकडे धान्याचा अतिरिक्त साठा आहे, जो स्वत:च्या गरजा पूर्ण करतो तसेच मित्र आणि गरजू देशांना मदत करतो. अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रवेशामागे डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाची ऊर्जा आणि क्षमता होती. इस्रोच्या स्थापनेचा उद्देश अंतराळ विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास तसेच अवकाश विज्ञान आणि ग्रह संशोधनातील संशोधन तसेच राष्ट्राच्या विकासासाठी होता. भारत आता चंद्र आणि मंगळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला जमिनीपासून आकाशापर्यंत नेणारा हा जगातील सर्वात मोठा दुग्धविकास कार्यक्रम होता. 

भारताने १८ मे  १९७४ रोजी पोखरण येथे पहिली अणुचाचणी करून आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली होती. २४ वर्षांनंतर ११ आणि १३  मे १९९८ रोजी एकामागून एक अशा पाच अणुचाचण्या घेतल्या. भारत आजच्या घडीला प्रत्येक  क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे़ अन्नधान्य उत्पादन, माहिती  तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य, संरक्षण, दळणवळण, अंतराळ संशोधन यासारख्या  प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविले.

मागील ७५ वर्षांत अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली; परंतु विकासाचा, संपन्नतेचा प्रवाह अखंड राहिला़ जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या आणि सर्वांत मोठी लोकशाही प्रणालीचा मान भारताला मिळाला आहे आणि तो मान फक्त आणि फक्त भारतच सांभाळू शकतो.

दोन वर्षांअगोदर कोरोना महामारीच्या काळात भारताने अमेरिकासह लहान मोठ्या देशांना औषधींचा पुरवठा केला़ तर, नंतरच्या काळात युद्धस्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचे संशोधन आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून संपूर्ण देशाचे लसीकरण करवून आणले़ ही जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम होती़ त्याचवेळी भारताने आपली गरज भागवून अन्य देशांना ही लस उपलब्ध करून दिली़ शिवाय ‘प्रथम शेजारी’ ही संवेदनात्मक भूमिकाही मोठ्या  बंधुच्या रूपात पार  पाडली. भारताच्या आजपर्यंत प्रत्येक सकारात्मक भूमिकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक झाले आहे, हेही लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस  चढण्यासारखे आहे, असे आम्ही मानतो.

संजय मुंदलकर

सर्वाधिकार सुरक्षित

Friday, 24 March 2023

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY त्या धाग्यातील तू सुद्धा एक, मग कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा? भाग ३

त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  कुठल्या दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व? कां करतोय ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? माझ्या प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! 


file photo


‘‘हा सगळा खेळ तुच खेळलास़ स्वार्थाचा  गोचिड अजूनही पोसतेस आपल्या मनावर! आणि हे जे तू, माझं वन केलं...माझं वन केलं म्हणून आव आणतेस ना, सब नाटक है...सब्ब नाटक!  आपल्या पोटच्या पोराचं स्वत:पेक्षा हजारपटीनं नुकसान केलंस़  नाकारणार हे सर्व ? आणि कसं? कुठला पुरावा आहे. अगं, समाजाचं सोड... तू आपल्या अंर्तमनाला तरी पुरावा देऊ शकतेस का?’’


नित्या केवळ हुंदके देत होती. निर्भय शब्दांच्या अस्त्र-शस्त्रांनी अगदी तुटून पडला.


‘‘ज्या वयात त्याला आई हवी होती, त्यावेळी कुणाच्या तरी संसारात मग्न होतीस़.. स्वार्थात मग्न होतीस ... स्पष्ट सांगायचं तर वासनेत तुडुंब होतीस. हे सर्व स्वीकारलसं आणि त्या लहानग्याचं मन धिक्कारलं? हेही तुला माहिती होतं, की त्याला वडील नाहीत आणि तू दहा-अकरा वर्षांच्या चिमुकल्यास आपल्या नणंदेच्या पदराआड लपवलं!’’


‘‘हो हो ... मी चुकलेचं...त्यावेळी परिस्थितीच तशी होती; पण मी हे सर्व वासनेसाठी केलं नाही. मी खोटं बोलत नाही. माझ्या घरातील लोकांनीच ही परिस्थिती जाणीवपूर्वक ढकलली माझ्यावर.’’


‘‘खोटं, साफ खोटं ... परिस्थिती तशी नव्हती, तर तसं ढोंग केलसं तू. काय होतं वय त्याचं आणि कोणती समज होती त्याला! आपली आई दुसºया कुण्या पप्पाजवळ राहायला गेली, हे त्यानं स्वीकारलं, असं समजतेस का तू? किती उन्हाळे-पावसाळे झेलले होते त्यानं? तुझ्यापासून दूर झाल्यानं त्याच्या मनावर जे काही ओरखडे पडले, ते नक्कीच पुसले जाणार नाहीत़, कदापिही नाही. ते व्रण आजन्म पुरेल त्याला.’’



नित्या काय बोलणार आणि कसं! सत्यता नाकारू शकणार नव्हतीच. आयुष्य आणखी एक वळण घेऊ पाहत होती. आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणारा हा माणूस कुठून आणि कसा आपल्या आयुष्यात आला, हे आकलनही तिला होईना.


‘‘नित्या, माझा निरजवर तेवढा अधिकार नाही, जितका तुझा आहे.तुझ्या उदरातून जन्म घेतलायं त्यानं. त्याची नाळ तुझ्याशी अधिक जुळलीयं. मी खूप पे्रम करतोय त्याच्यावर आणि तुझ्यावरही आणि हे सर्व जाणतेस, अनुभवतेस तू़. त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  मात्र, कुठल्या तरी दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व़ कां ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! कुठल्या बंधनांनं एकत्र आणलंय आपल्याला. कुठल्या परिस्थितीनं जुळलोयं तुझ्याशी? नियतीनं आणखी कुणी नाही आणि तुलाच कसं माझ्या आयुष्यात आणलं, तेही अशा स्थितीत की जिथं वाटा तर दिसताहेत; पण चालता येत नाही...

file photo


नित्या स्तब्ध ऐकत होती.


‘‘प्रेमव्यासंगी मानव आहे मी़  तुझ्यासारख्या विवाहितेवर प्रेम जडले.  काय चूक त्यात? मी चोर नाही़  कुणाचं घर फोडलं नाही, कुणाला लुटलं नाही, ‘ओटीपी’ मागून फसवणूक केली नाही. मी कदाचित पत्रकार म्हणून समाजाप्रति अधिक संवेदनशिल आहे, हे नक्कीच़ कारण मी समाजाचा अभ्यास करतो, त्याला अनुभवतो़ लोकांच्या अडचणीतून माना काढतोयं़ रस्त्यांवर संताप पाहतोय़ हाता-तोंडाशी मोठ्या कठीण परिस्थितीत गाठ भेट होणारी माणसं पाहतोय़अशा लोकांवर प्रेम करणं मी का नाकारावं? आणि  त्या धाग्यातील तू सुद्धा एक. कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा?’’


‘‘...याबाबत मला काहीही सांगता येणार नाही; पण मी त्यांच्या घरात गुदमरतेयं इतकंच मला सांगायचं... तिथं नाही राहू शकणार मी! माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्याला दिशा देणार ते तुम्हीच, इतकंच बोलू शकते.’’ नित्या  बोलली.

file photo


नक्कीच नात्यांमध्ये वेगवेगळी वळणं येऊ लागली होती. निर्भय आता नित्या आणि निरजमध्ये पूर्णपणे गुंतला होता. या प्रसंगापासून निशा आणि निहारिका अजाण असल्या तरी नित्या, निर्भयच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याबाबत अवगत होती़  निर्भय एका मुलीचा बाप आहे, ही जाणीव सुद्धा तिला होती. दोन बाजू निर्भयपर्यंत पोहोचत होत्या़  त्यांच्यात त्रिकोण नव्हता, हे ही सत्य होतं; परंतु त्या पाचजणांचं भविष्य कसं असेल, हे आजच्या घडीला कुणालाही सांगता येणं शक्य नव्हतं, अगदी नियतीला सुद्धा नाही...





 


 लेखक :        संजय मुंदलकर 
 कथा :           नवंतिका
              जिथं प्रेम हाच देव्हारा ...

                    (सर्वाधिकार सुरक्षित)
                     ही कथा सलग नाही
                     छायाचित्र प्रतिकात्मक  
                    [ all rights reserved]