Monday, 28 March 2022

फक्त आणि फक्त वेशभूषातून अभिनय जगला ‘हा’ अभिनेता आणि गाठली मोठी उंची...

तळागाळातील माणसांसाठी कळवळा असणारा, अडल्या- नडल्याला सढळ हस्ते मदत करणारा, डॉ. राममोहन लोहियांबद्दल प्रचंड आदर असणारा, निर्मात्याला पैशांसाठी कधीही न नडणारा, असा हा ‘सज्जन खलनायक’ होता. सन २०१३ मध्ये अमेरिकेतील अनियतकालिकाच्या भारतीय एका आवृत्तीने हिंदी चित्रपटक्षेत्रातील २५ महान अभिनेत्यांची यादी तयार केली, त्यात निळू फुले यांचा समावेश होता.


डोक्यावर कडक तिरपी गांधी टोपी, अंगामध्ये  पांढरा झब्बा, काळे जाकिट, पांढरे शुभ्र धोतर, एका हाताने वर उचललेला सोगा,  पायात  कोल्हापुरी चपला, ओठावर मिशी, रस्त्यावरून चालताना व्यक्त केलेला मस्तवालपणा, अधून मधून तोंडातील तंबाखूची मारलेली पिचकारी, अशी एकूण वेषभूषा निळू फुले यांची राहायची़ ही काहीशी ठरलेली असायची, असेही म्हणता येईल़ कधीतरी ती कथानकानुसार ती बदलत जायची; परंतु खलनायकाचा सार त्यांच्या वेशभूषेतून समजून येत असे़ आणि निळू फुलेंच्या अभिनयाचे हेच यश होते. चेहºयावरील हावभाव, देहबोली आणि वेशभूषा यांतून अभिनयाने उंची कधीचीच गाठलेली असायची, संवाद तर दूरच राहिले. अशा आवेशात निळूभाऊंनी तब्बल २५० चित्रपट अभिनयाने परिपूर्ण केले. 




नीळकंठ कृष्णाजी फुले आणि नंतरच्या काळात फक्त निळू फुले़ ४ एप्रिल १९३० रोजी पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांचा वारसा सांगणाºया घराण्यात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसैनिक म्हणून चळवळीत भाग घेतला. राष्ट्रीय सेवादलाची बांधिलकी आयुष्यभर मानली. वयाच्या सतराव्या वर्षी आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ८० रुपये पगारावर काम करतानासुद्धा दरमहा १० रुपये निळूभाऊ राष्ट्र सेवा दलाच्या व्यवस्थापनाला देत असे. पुस्तकांच्या वाचनाच्या छंदातून ते वगनाट्य, लोकनाट्याकडे वळले.


१९५७ मधील लोकसभा निवडणुकीच्या दिवसांत निळंूनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ नावाचे लोकनाट्य  लिहिले आणि ते तुफान गाजले. नंतरच्या काळात ‘कथा अकलेच्या कांद्याची’ चे दोन हजारांवर प्रयोग झाले. हा अभिनय बघून दिग्दर्शक अनंत  माने  यांनी निळूभाऊंना १९६८ मध्ये ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये ‘झेल्या पाटील’ त्यांच्यावर सोपवला आणि येथूनच गावाकडचा अस्सल खलनायक (VILEN) जन्माला आला. त्यांचे कर्तृत्व आणि प्रसिद्धी, लोकप्रियता  अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या पहिल्या चित्रपटात अर्थात ‘सारांश’ मध्ये निळूभाऊंनी सत्तांध राजकारण्याची खलनायकी भूमिका केली होती. यातील एक दृश्य आठवा...अनुपम आपली पेर्इंग गेस्ट सुजाता हिला निळूंच्या घरी येऊन त्यांच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगतात. यावेळी निळूंनी जागवलेला अभिनय पहा़ आपल्याला चक्क निळूंचा संताप येतो; परंतु ते त्यांच्या अभिनयाचे यश असते. याचवेळी भिंगरीतील निळू डोळ्यांसमोर आणा. आपल्यातील प्रेक्षक शांत होतो. असेच काहीसे मशाल, कुली ( भूमिका नथू मामा), वो सात दिन, सिंहासन, पिंजरा मोहरे अशा हिंदी-मराठी चित्रपटांविषयी सांगता येईल. 


दोन ध्रुवांचा अभिनय

‘सिंहासन’मधील मूक प्रेक्षक बनलेला पत्रकार, सत्तेच्या खेळामधील जीवघेण्या चाली बघून वेडा होणारा आणि सहकाराच्या चळवळीतून ओसाड रानामध्ये द्राक्षाचे बगिचे फुलवणारा ‘सामना’मधील सरपंच भाऊंनी  ताकदीने केला. मुक्काम पोस्ट ढेबेवाडीमधील दरोडेखोर, पिंजरामधील नाच्या (१९७३),या तर दोन ध्रुवावरील भूमिका. चोरीचा मामलामधील ललिता पवारबरोबरचा हातगाडीवालाही अविस्मरणीय ठरला. 


सन १९७३ ते ७५ अशी लागोपाठ तीन वर्षे त्यांना राज्य शासनाचे अभिनयाचे पारितोषिक मिळाले. यात हात लावीन तिथे सोने, सामना आणि चोरीचा मामला या चित्रपटांतील  अभिनयाची दखल घेण्यात आली होती. १९९१ मध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक आणि ‘कला गौरव’सारखे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे जमा झाले. केसरी मराठा ट्रस्ट, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पुणे शाखा) कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

असा निळू कलावंत अचानक १३ जुलै २००९ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी आयुष्याच्या पडद्यावरून नाहीसे झाला. आता त्यांच्या उत्तुंग अभिनयाचा वारसा त्यांची कन्या गार्गी फुले थत्ते चालवत आहेत.


लेखन

संजय इस्तारी मुुंदलकर


सर्वाधिकार सुरक्षित

(लेखातील छायाचित्र गुगलवरून साभार)