Thursday, 6 February 2025

NOOTANS SNAP_SANJAY MUNDALKAR वाहतूक नियम न पाळल्याचा हा समाजावर झालेला परिणाम खोल असतो़

 

रस्त्यांवर वाहन चालविताना कुणाला कायदे पाळण्याची, समाजाप्रति कर्तव्यभावना असती, तर

नक्कीच भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू झाला नसता.


वाहतूक नियम न पाळल्याचा हा समाजावर झालेला परिणाम खोल असतो़

दहा मिनिटांत बाजारातून भाजीपाला घेवून येतो, असं सांगणारे बाबा थेट रुग्णालयात 

पोहोचल्याचा निरोप येतो.

सहज फिरावयास गेलेले आजोबाचे शवच घरी आणावे लागते.


आपल्या बाळाला शाळेत पोहोचवून परतणारी कुण्या 

आईचा अपघात झाल्याची बातमी ऐकावयास मिळते.


का होतंय असं? 

कशात रममाण आहोत आपण, की रस्त्यांवर वेगात असलेला ‘यम’बनलोय!

एक हसतं खेळतं कुटुंब कुणाच्या बेजबाबदारीमुळे क्षणात उद्ध्वस्त होतं.


प्रत्येकानं वाहतूक नियम पाळावा...



संजय इस्तारी मुंदलकर