Sunday, 18 August 2024

वाहने, प्रदूषण, जीवितहानी आणि अक्षम्य बेजबाबदारी

 भारतच काय, जगात सर्वच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर वाढण्याची गरज आहे. इंधनाचे दर वाढण्याचे मुख्य कारण त्याच्या वाढत्या मागणीत आहे. इंधनाचे दर वाढले म्हणून सर्वजण ओरड करीत असले तरी स्वतंत्र वाहनाचा वापर कुणीही टाळत नाही. 



file photo

प्रत्येकाला स्वत:ची चारचाकी असण्याचे स्वप्न दाखवणाºया  वाहन निर्मित ी कंपन्या  आणि  त्यांना यात मदत करणाºया अर्थात पैसा पुरविणाºया आर्थिक ( वित्तीय) संस्था यामुळे  सर्वांची मनोवृत्ती सुरुवातीला दुचाकी आणि नंतर चारचाकी वाहनाकडे सातत्याने झुकत चालली आहे.


आणि मग अपघात आणि प्रदूषणासारख्या समस्यांतून जीवन-मरणाचा  न संपणारा संघर्ष सुरू होतो.  देशात प्रदूषणाने होणारे मृत्यू आणि अपघातात होणारे मृत्यू, यामुळे ही वाहन समस्या किती गंभीर आहे हे आपणास लक्षात येईल. वाहन बाळगण्यात महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी असल्याची माहिती असून, त्याखालोखाल तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात अशी क्रमवारी  दिसून येते. कुणी किती वाहन बाळगावेत, याबाबत कोणतेही कायदे  नसल्याने हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे दुर्लभ आहे. मात्र, वाहननिर्मिती, प्रदूषण आणि होणारी जीवितहानी या मुद्यावर अक्षम्य  अशी बेजबाबदारी दिसून येते.



वाढत्या  शहरीकरणातून देशभरातील वाहनाची संख्या वाढत आहे़ आणि त्यामुळे रस्ते अपघात आणि प्रदूषण अशा दोन प्रमुख समस्या वाढत्या वाढत्या वाढत आहेत़ वायू प्रदूषणाने जगातील विविध देशात दरवर्षी लाखो मृत्यू होतात आणि यात भारताचाही समावेश आहे.



आज सर्वंच ठिकाणी नवनवीन समस्या समोर येत आहेत आणि या समस्यांचे मूळ   शहरीकरणात दिसून येते. लोकसंख्या वाढली, शहरे फुगली, वाहने वाढली आणि जीव हातातून जाण्याइतपत रस्ते अपघात आणि प्रदूषणही वाढले. यात मानवी स्वभाव देखील कारणीभूत आहे. कारण भारतीय नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मनातून स्वीकारली  नाही वा शासन प्रशासनाने तशी वेळ  आपल्या लोकांवर आणली, असे म्हणता येईल. 




सर्वसामान्यांच्याही  घरी तीन ते चार वाहने आहेत आणि त्यातूनच शहरांमधून वाहनांची कोंडी होते. वाहतूक कोंडीचा ताण वाढल्याने शहरी भागामध्ये ताणतणाव यात वाढ झाली आहे. वाहनातील वायू प्रदूषणातून होणाºया मृत्यूमध्ये जगातील मृत्यूंमध्ये भारत सर्वांत वरच्या स्थानी असल्याचे सांगण्यात येते. चारचाकी वाहनामंधून कार्बनचे उत्सर्जन होते. याचा लहान बालकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यांना लहानपणीच श्वसनाच्या विकारांना समोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास ज्यांना त्रास होतो . 



वाहतूक कोंडीने अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्यात सर्वांत मोठी समस्या ही प्रदूषणाची आहे. वाहनातून बाहेर पडणाºया विषारी वायुंमुळे होणारे वायू प्रदूषण आणि वाहनांचे आवाज आणि हॉर्न यामुळे ध्वनीप्रदूषण असे दुहेरी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या मानवी आरोग्यावर होणाºया विपरित परिणामातून मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे.



वाहन प्रदूषणामुळे फुप्फ्ुसाचे गंभीर आजार जडणे, श्वसनाचे आजार आणि तणावाखाली राहिल्याने ‘स्ट्रोक’ ने मृत्यू होणे ही याची प्रमुख कारणे असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. प्रदूषणाने होणाºया मृत्यूसोबतच आणखी एक मोठी समस्या जगाच्या पातळीवर वाढली ती म्हणजे या वाढत्या कार्बन उत्सर्जनाने पृथ्वीचे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. यातून ऋतुचक्र बदल झाल्याचे दिसत आहे. 



पावसाचे व्यस्त होत जाणारे प्रमाण आणि त्यातून कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती निर्माण होत आहे. याच्याच परिणाम म्हणजे अंटार्टिक आणि आर्क्टिक खंडातील हिमखंड वितळण्याचा वेग वाढला त्यामुळे समुद्रांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. याचेही गंभीर परिणाम पुढील काळात होणार आहेत.  देशाची राजधानी दिल्लीत ल वायू प्रदूषणामुळे सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना रस्त्यावर प्रवेश असावा असा अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता, तो कितपत यशस्वी झाला, ते त्या  दिल्लीतील राजकारणी जाणो. प्रदूषणाची ही समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे हे वास्तव आहे. 



संजय इस्तारी मुंदलकर