देशभरात आज दोन भीषण रस्ते अपघात झालेत. महाराष्ट्र आणि शेजारच्या मध्य प्रदेशात. आणि एकूण १९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकस्तरावर सांगण्यात येत आहे. (यात बालकांचाही समावेश आहे)
मध्य प्रदेशातील इंदूरहून अमळनेरच्या दिशेने जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस धार जिल्ह्यातील खलघाट पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
दुसरा अपघात अमरावती जिल्ह्यात परतवाडा- बैतुल (मध्य प्रदेश) मार्गावरील निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर दुचाकी आणि कार वाहनाच्या या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी आहे मृतांमध्ये बोदड,खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. दुचाकी आणि कारच्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
वरील दोन्ही घटनांत पावसाचा नक्कीच संबंध आहे. असे असले यात मानवी चुकांच मानता येईल. कारण कोणत्याही रस्ते पुलावरून वाहनाचा वेग कमी असावा, असा नियम आहे आणि ही बाब त्या बसचालकाला माहिती असावीच. त्यामुळे ही बस नक्कीच वेगात असावी. अन्यथा पुलावरील कठडा बुडापासून तुटला नसता.
दुसरे असे, की हा कठडा पूर्ण तुटला आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम कच्चे होते, हे सिद्ध आहे.
अमरावती झालेल्या घटनेतही वेग कारणीभूत असू शकतो. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून पडणे आणि सकाळपर्यंत कुणालाच त्याबाबत न कळणे, यावरून दोन्ही वाहनांची मोठी धडक झाली असावी. जो कुणी जखमी असेल, त्यालाही अन्य कुणाशी संपर्क आलेला नाही, यावरून तोही गंभीर असावा.
सध्या पावसाचे दिवस आहेत. पाण्यामुळे रस्ते निसरडे होतात. रस्त्यात खड्डे असतील, तर त्याचा अंदाज येत नाही. तरीही वेगाचा हव्यास धरून मृत्यूपर्यंत पोहोचण्यास माणसाला घाई झालेली असते, असेच म्हणावे लागेल.
अनेकदा आपले वाहन अन्य वाहनावर धडकणार (अर्थात दिवसाच्या उजेडात) आहे, हे आपल्याला त्या अगोदर काही सेकंद कळलेले असते;परंतु ती घटना / अपघात का कुणास टाळता येत नाही. प्रामुख्याने ही बाब चालकाच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि न होणारी घटना होऊन जाते. याशिवाय अशावेळी संबंधित व्यक्ती वा वाहनातील इतरांना जोरदार मानसिक धक्का बसून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. (कारण अपघात म्हणजेच मृत्यू, ही मानवाची मानसिकता झालेली
आहे.) आणि किरकोळ वा गंभीर जखमा होऊन मृत्युमुखी पडतो. ही शक्यता बहुतांश वेळा नाकारता येत नाही. या संदर्भात एक बातमी वाचण्यात आली होती, की एका चारचाकी वाहनातील महिलेला अपघात पुढ्यात दिसत होता़ बचावाची कोणतीही स्थिती नसताना तिने आपले बाळ तत्काळ वाहनाबाहेर टाकले. घटनेत तिचा मृत्यू झाला;परंतु बाळ वाचले. सांगायचे असे की वाहनचालक वा अन्य व्यक्ती तत्कालिन काय निर्णय घेतात, त्यावरही अवलंबून असते.
संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment