दोन कट्टर शत्रूंच्या युद्धात कुण्या सैनिकाने हाती पांढरे निशाण घेवून
शरणागती स्वीकारल्यास त्याला अभय देण्यात येतं. अर्थात त्याला केवळ बंदी बनवण्यात येतं़
त्याचे प्राण सुरक्षित ठेवण्यात येते, हा एक संकेत असतो आणि जगभरातील
युद्धभूमीत तो पाळण्यात येतो.
संकेत, नियम, अट या बाबी जगाच्या पाठीवर अनन्य साधारण महत्त्व प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या संकल्पना वा पाळण्याच्या धारणा वेगवेगळ्या असल्या तरी मतितार्थ शिस्त हाच असतो.
व्यवहार असो, प्रशासन असो वा कुण्या देशाचा कारभार असो, संकेत वा नियम पाळावेच लागतात.
विकास आणि प्रगती त्याच ठिकाणी दिसून येते, जिथे संकेतांचे पालन केले जाते़
आपल्या देशात वाहतूक नियमांचे संकेत न पाळल्याने होणारी जीवितहानी कधीही भरून
न निघणारी आहे़ शासकीय स्तरवरही ते मान्य झाले आहे़
छायाचित्र पहा़ हा टँकर एका रसायनाने भरून आहे.
नादुरुस्त असल्याने ते वाहन रस्त्यातच धोकादायक स्थितीत उभे ठेवण्यात आले आहे.
कारण संबंधित चालकाने अन्य वाहनांना देण्यात अपेक्षित असलेला इशारा दिलेला नाही.
अर्थात संकेत पाळलेले नाही.
अर्थात काही नुकसान झाल्यास ते भरून निघणार नाही.

No comments:
Post a Comment