Tuesday, 18 February 2020

बेटी बचाओ, राजनिती पढाओ  

यंदाच्या १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्टÑात शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले.  यात भाजपचे  २४, शिवसेनेचे १८, राष्टÑवादीचे  चार, तर काँग्रेस आणि एमआयएमचा  प्रत्येकी एक खासदार  निवडून आला आहे. यापैकी आठ महिला खासदार संसदेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात भाजपकडून सर्वांधिक पाच, शिवसेना, राकाँ, अपक्ष  यांचे प्रत्येकी एकेक मिळून एकूण आठ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून                        एकू ण ८६७ उमेदवारांपैकी ८० महिला उमेदवारांना विविध पक्षांनी निवडणूक  रिंगणात उतरवले. यापैकी आठ महिलांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकीय कुटुंबातीलच आहेत. यात मुलगी, सून, अशी नाते जपणाºया आहेत. सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडून आल्या.  भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रीतम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हीना गावीत (भाजप-नंदुरबार), पूनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या सर्व लोकसभेसाठी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
बारामती मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांच्यावर मात केली.  सुळे यांनी आपल्या विजयाची हँट्ट्रिक केली आहे. कारण त्या  तिसºयांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. मागील  निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचेच शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व  माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. मागील निवडणुकीत त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.(यंदा मात्र त्यांचा हा मान अन्य ओडिशातील महिला उमेदवाराकडे गेला आहे.) २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्टÑवादीचे मनीष जैन यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता.
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांना पराभूत केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि  त्या विजयी ठरल्या. आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यावर मात केली. यंदा त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या निवडणुकीत हीना गावीत यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीतही पूनम -प्रिया असाच सामना रंगला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यां                                                     नी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ  यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आनंदराव आडसूळ यांनी राष्टÑवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना  पराभूत केले होते. पराभवाची परतफे ड करीत नवनीत लोकसभेवर निवडून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राकाँ उमेदवार धनराज महाले यांचा पराभव केला.
देशपातळीवर पाहिले तर १७  व्या लोकसभा निवडणुकीतील ५४२ वजयी उमेदवारांत महिला सदस्यांची संख्या केवळ ७८ इतकी आहे. विशेष म्हणजे महिला खासदारांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून त्यांची टक्केवारी ही १७ इतकी आहे. यापूर्वी महिला सदस्यांची सर्वाधिक संख्या ही नवव्या लोकसभेत २८ इतकी होती. राष्टÑीय निवडणूक आयोगाद्वारा लोकसभेच्या  ५४२ जागांबाबत केलेल्या निकालानुसार, यंदा निवडून आलेल्या सर्वाधिक ४० महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर  निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून  संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजय मिळाला आहे.याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष  राहुल  गांधी यांचा पराभव करत  विजय मिळवला  आहे. मनेका गांधी सुल्तानपूर आणि अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल  यांनी मिर्झापूर येथून निवडणूक जिकंली आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा , प्रज्ञा ठाकूर भोपाळ, मीनाक्षी लेखी  नवी दिली, किरण खेर चंडीगड आणि रिता बहुगुणा जोशी यांनी अलाहाबाद  येथून विजय मिळवला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून  तृणमूल काँग्रेस उमेदवार मुनमुन सेन, सलचर येथील सुष्मिता देव, सुपोल येथून रंजीत रंजन कन्नोज येथून समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, रामपूर येथून भाजप उमेदवार जयाप्रदा यांचा मात्र पराभव झाला.
यात उल्लेखनीय असे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून एकूण ८ हजार ४९ उमेदवार मैदान  उतरले होते. आणि यापैकी केवळ ७२४ महिला उमेदवार होत्या, जे प्रमाण कमीच आहे. काँगे्रसने सर्वाधिक ५४  आणि भाजपने ५३ महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवले होते. अन्य राष्टÑीय पक्षात बसपाने २४, तृणमूल कांग्रेसने २३, माकपाने १०, भाकपाने चार आणि राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने  एक महिला उमेदवाराला तिकीट दिली.अपक्ष महिला उमेदवारांचा संख्या २२२  इतकी होती, तर चार ट्रान्सजेंडर उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राजकीय पक्ष अपयशी

यंदा राज्यातील राजकारणाला दोनदा उभारी मिळाली. मे महिन्यात लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के)उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती.
याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता  टिळक भाजप (पुणे), मंजुळा  गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज   बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.

नातेसंबंधांना प्राधान्य

भारतीय लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला  नाही, जी  काही  उमेदवारी दिली आहे, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून येते. कारण तेच ते चेहरे पुढे आणले आहे. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिले आहे. यावरून  नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले  असे म्हणता येईल. राष्ट्रीयच काय पण प्रादेशिक पक्षानेही आपल्या किती जागा निवडून येवू शकतात, याचाच विचार केल्याचे दिसून येते.
एकीकडे महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्षित करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सदोदित चालू आहे. भारतीय लोकसंख्या ही आता तरुणांची आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते.
भारतीय राजकारणाने आता भारतीय महिलांना अन्य क्षेत्रासोबतच  राजकीय क्षेत्र  पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांचा हव्यास धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन, देशाच्या दुसºया संरक्षण मंत्री तसेच विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हेच दाखवून दिले आहे. मात्र, त्यासाठी महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर ठेवता कामा नये.

© संजय इस्तारी मुंदलकर            

No comments:

Post a Comment