Sunday, 15 March 2020

वाहतूक नियमांबाबत समाज संवेदनशील नाहीच...


वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणाºयांची फार मोठी आहे. अगदी तरुण मुले, मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोकांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात. सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून हॉर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नलची वाट पाहणे हा गुन्हा आहे. अनेकदा या अगदी क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याचा अनुभव येत असतो.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव  आदीमुळे भारतातील  सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.

आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाºया वाहनांपासून ते जलद धावणाºया दुचाकी, जीप, मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, कंटेनर, सीमेंट वाहून नेणारी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात. साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होते.त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाºया लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय सर्वजण हतबल आहेत.

रस्त्यावर सर्वाधिक कोण...
आपण अनेकदा बोलून जातो की रस्त्यांवर गर्दी अधिक आहे. भरदुपारी काम करणारी मंडळी आपापल्या कार्यालयात असेल, तर ही रस्त्यांवरील मंडळी कोण आहे. तर यात सर्वाधिक संख्या ही रिकामटेकड्यांची आहे. ज्यांना काहीही काम नाही आणि यात सर्वात प्रमाण हे गुन्हेगारांचे आहे. ही मंडळी आपले सावज टिपत असतात. यात तरुणांचा अधिक भरणा दिसून येतो. यात बेरोजगारही आहे. याशिवाय मार्केटिंगच्या नावावर अनेकजण रस्त्यांवर असतात...त्यांची वाहने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होईल, अशापद्धतीने ठेवलेली असतात.  काहीजण नुसतीच फिरायला आलेली असतात. काही ग्राहक असतात, काही दुसºया शहरातून आलेली असतात. या सर्वांची वर्गवारी केली तर समाजातील एक छुपी बेरोजगारी आपल्याला दिसून येते. [ हा एक वेगळा विषय असला तरी त्याचा संबंध रस्ते अपघातासोबत आहेच ]




माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळ्या प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त आॅफिस वा दुकानात  जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील. यातील बºयाचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे.

 मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या आॅफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाºया व्यक्ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटवरून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.

भविष्यात  प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा  आॅपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला आॅनलाईन घेता येईल. औषधीही घरपोच मिळतील. लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रिया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे  आदी कामे इंटरनेटच्या साहाय्याने  करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही. भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाºया खर्चातही झपाट्याने घट होत आहे. 


दुसरीकडे समाजविघातक समस्याही या इंटरनेटने निर्माण केल्या आहेत. हे विसरून चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा वाहतुकीशी संबंध जोडावा, अशी स्थिती तरी नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. आपण अजूनही काळाची पावले ओळखली नाहीत़, हे फार मोठे दुर्दैव आपल्या समाजाचे आहे आणि  त्यातून विविध अडचणी, समस्या निर्माण होतात. समाज निकोप, सुरक्षित तरच देश बलशाली, हे सूत्र कायद्याने शिकवण्याची गरज नाही, हे ज्या दिवशी सर्वांना समजेल, तो दिन सोन्याचा असेच म्हणावे लागेल.

महामार्गावरील अपघातांची कारणे

* जड वाहनांच्या चालकाने २४ तासांतून किती वेळ वाहन चालवावे, यावर बंधन नाही
* वाहनांना थांबण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘सब वे’ चा अभाव
* लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना आराम करण्यासाठी सोय नाही
* मोठ्या वाहनांकडून पहाटेच्या सुमारास अपघात होतात. याबाबत जागृती नाही
* वाहनचालकाची झोप न होणे हेही मुख्य कारण
* अपघातग्रस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी सोय जवळजवळ उपलब्ध नसणे


संजय इस्तारी मुंदलकर

© NITYAAYAN

No comments:

Post a Comment