नमुने
गाव म्हटलं गावात अनेक नमुने असतात़ आता हे काय ‘बेण’ असं विचारालं, तर बरं होणार नाही़ ‘बेणं’ या शब्दाचा अर्थच जात असा़ ‘माती तशी चूल’ अशी म्हण तर विचारात घेतली तर ‘गाव तशा जाती’ राहणार आणि त्यातील ह्या ‘बेणी’ सुद्धा! गाव हे अगदी दहा-वीस घरांपासून तिकडे हजारांच्या लोकसंख्येत सांगता येईल़ लहान परिसर असल्याने प्रत्येकांच्या ओळखीशी आपण जुळलेले असतो़ त्यांचा स्वभाव माहिती असतो़ त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतात़
माझा जन्म गावातलाच़ गावातल्या मातीशी नाळ जुळलेला मी माणूस़ प्राथमिक शाळेत असेपर्यंत मी अनेकांची घरे बघितली नव्हती वा त्यांची माहिती नव्हती़ मात्र,वय वाढले गेले तशी गावाशी ओळख झाली़ ‘माणसां’शी ओळख झाली तशी त्यांच्या स्वभावाच्या विविध कंगोºयाशीही ओळख झाली़ अनुभव येत गेले़ तशी स्वभावावर लिंपण होत गेली़
माझ्या गावात ‘खंड्या’ नावाचा व्यक्ती होता़ आता तो हयात नाही़ बºयाच वर्षांपूर्वी तो देवाघरी गेला़ त्यावेळी अंदाजे माझं वय चौदा-पंधरा वर्षे असेल़ ह्या खंड्याचं मूळ नाव मला माहिती नाही़ बहुधा तो लहान भावासोबत राहात असावा़ तर हा खंड्या पाहायला काळा होता़ त्याचा वरचा ओठ दोन भागात तुटलेला होता़ तसा तो पाहायला वाईट नव्हता; पण काळ्या रंगावर ओठाची दोन ‘खांड’ झाल्याने तो भयानक दिसायचा़ कदाचित याच कारणामुळं त्याचं लग्न झालेलं नसावं़ लहान मुलं त्याला घाबरायची़ शेतातील कामे करून आपले आणि भावाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा़ माझ्या घराजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत़ विसर्जनाच्या दिवशी कुणी वाघाचं सोंग घेई, कुणी घोडा बनत, कुणी जिराफाचं सोंग घेत़ यात खंड्या वाघाचं रुप साकारत असे़ मुळातच तो रंगानं काळा होता़ त्यामुळं त्याच्या अंगावर पिवळे पट्टे उठून दिसतं़ तर हा खंड्या वाघाचा नाच करण्यात निपुण होता़ कधीही आणि केव्हाही तो तसे नृत्य करण्यास तयार असे़ देवी विसर्जनात खंड्याशिवाय कुणीही वाघाचे सोंग घेत नव्हते़ आणि कुणी तसा विचार केलेलाही त्याला खपत नसे़ त्याच्या या स्वभावाचा कुणीही फायदा घेत असे़ एका विसर्जनाच्या दिवशी अंगात ताप असूनही त्याने आपले काम चोख बजावले होते़ ‘देवी मला काहीही होऊ देणार नाही’, असे तो म्हणत असे़ आणि खरोखर त्याचा ताप दुसºया दिवशी पार पळाला़ एकदा तो विहिरीवर पाणी भरण्यास आला़ काही टारगट पोट्यांना हुक्की आली़ ते सर्वजण खंड्याजवळ आले आणि त्यांनी वाघाचा नाच सादर करण्यास सांगितलं़ झालं हा खंड्यानं बादली-दोन बाजूला ठेवला आणि तिथंच ‘डजगनं डजगनं’सुरू केलं़
काशिनाथ लांडगे हे गावातील आणखी दुसरं ‘बेणं’ होतं़ आडनांव लांडगे असलं तरी तो बघायला ‘वाघा’सारखाचं होता़ साडेसहा फूट उंची, धिप्पाड अंगकाठी, काळाकुट्ट रंग, चेहºयावर माताच्या वणा,आवाजातही मोठी जरब असं हे व्यक्तिमत्त्व होतं़ तर या काशिनाथबुवाच्या बायकोपोराबद्दल अनेकांनी वेगवेगळं ऐकलं होतं़ तो एकटाच राहत असे़ कदाचित त्यांच्या कामचुकारवृत्तीने,आळशीपणामुळे बायको त्याला सोडून गेली असावी़ पोटापाण्यासाठी तो फारसा काम करताना दिसत नसे़ त्याचा दिनक्रम ठरलेला असे़ दुसरं काही नाही केलं तरी त्याची सकाळची आंघोळ कधी चुकली नाही़ तो कधी आजारी पडलेला, असं मीच काय? कुणीही ऐकलेलं नाही़ कधी कधीच तो काम करायचा, असं म्हटलं तर हसायला नको़ कारण तो कामाला जाताना क्वचितच दिसायचा़ मात्र, रामकृष्ण मामाच्या कामठ्यात बसलेला असायचा आणि त्याच्याशी चकाट्या पिटायचा़ हा कामठा एसटी स्टँडला लागूनच होता़ त्यामुळे गप्पांना विषयांची वाणवा नसे़ तर हा काशिनाथ कुणावरही विनाकारण डाफरत असे़ त्याचं कुणाशी कधी वाजेल याचा भरवसा नसे़ कधीकधी तो गावखाºयाची रखवालीचं काम करायचा; पण रस्त्यावरूनच आवाज करीत त्यामुळं कमीत कमी डुकरं तरी पळून जायची़ पिकात मात्र शिरायचा नाही़
आमच्या गावात भागवताचं सप्ताहाभर दररोज जेवणाचा कार्यक्रम होत असे़ कुठे वरणभात,पोळीचं तर कुठे खिचडी,कढीचं जेवण राहायचं़ हा बुवा एकटा असल्याने त्याला आमंत्रण असायचंच; पणह्या काशिनाथबुवाचा आहार खूप होता़ तो किती खायचा, ह्याचा हिशोब लावताना जेवण वाढणारे थकून जातं़ एक पंगत संपली तरी त्याचं जेवण संपत नसे़ खिचडी तरी तो पायली-दोन पायल्यांची खात असेलच़ अनेकांनी त्यांच्या आहाराच्या अंदाज घेण्याचा प्रयत्न केला;परंतु ते कुणालाही साधलं नाही़
तसे गावात ‘बेणं’ खूप होते आणि आहेतही़ मात्र, आता खूप फरक पडला आहे़ गावातले दिवस बदलत आहेत, कदाचित म्हणून असावेत़ आबा, पक्या, ईठ्या, सुध्या असे अनेक भारी भारी ‘कॅरेक्टर्स’ आहेत़
No comments:
Post a Comment