Friday, 1 March 2024

पिपल सुना, पनघट सुना, घर शमशान का बना नमुना ...







 पिपल सुना पनघट सुना 

घर शमशान का बना नमुना

फसले कटी आयी बैसाखी

तेरा आना रह गया बाकी

 चिट्ठी आयी है... आयी है ...


वरील ओळींहून ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनी  मानवी मन आणि मानवी  हृदयाचा ठाव घेतला होता़ प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला  हा प्रातिनिधिक प्रसंग त्यांनी अतिशय  उत्कटतेने स्वरांतून सादर केला़ 

तू  निघून  गेलास़़़ घराजवळील  पिंपळाचं झाडं सुनं झालंय़़़ ती विहीर सुद्धा नि:शब्द झालीं़़़दोन घोट पिण्यासाठी कुणीही तिच्याकडं फिरकेना़़़घरात स्मशान शांतता थयथय करतेय़़़ पिकांचा हंगाम आटोपून धान्याच्या राशी घरात येऊन पडल्यात  तर बैसाखी सण सुद्धा चार दिवसांवरच ठेपलायं़ आता तुझीच  काय ती प्रतीक्षा आहे़़़ 


अशा काळजाचा ठाव घेणाºया शब्दांवर आपला स्वर ओवाळून टाकणारे ज्येष्ष्ठ गायक पंकज उधास यांनी दोन दिवसांआधी सोमवारी समस्त संगीतप्रेमींची, भारतवासीयांची संगत सोडली़ एका अनंत प्रवासाला ते निघून गेले़ 


आपल्या  गायकीने  गेली अनेक वर्षे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गझल, हिंदी चित्रपट गायक पंकज उधास  देश विदेशात लोकप्रिय होत़े  त्यांच्या जाण्याने भारतीय गझल गायकीच्या क्षेत्राचे मोठे  नुकसान झाले आहे़ पंकज उधास भारतीय गझल गायकीतील  लोकप्रिय नाव होते. त्यांच्या अनेक गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली होती. 


१७  मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे पंकज उधास यांचा जन्म झाला होता. ज्येष्ठ गायक मनहर उधास आणि निर्मल उधास हे त्यांचे मोठे बंधू होत़ पंकज उधास यांना डॉक्टर व्हायचे  होते़ त्यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, याचदरम्यान त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू  झाला आणि त्यांचे डॉक्टर व्हायचे स्वप्न मागे पडले. 



Photos Courtesy : Google



बॉलिवूडमध्ये संधी

पंकज उधास यांचे वडील शेती करत असे. मोठे बंधू मनहारआणि निर्मल यांच्यामुळेच पंकज उधास यांची संगीतात  गोडी निर्माण झाली आणि यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. पंकज उधास यांना १९७२ मध्ये प्रदर्शित ‘कामना’ चित्रपटात पहिल्यांदा  गाण्याची संधी मिळाली होती. यात यश मिळाले नसले तरी त्यांच्या गाण्याचे कौतुक झाले. त्यानंतर पुढे त्यांनी गझल गायनास सुरुवात केली. 

पंकज उधास यांचा पहिला गझल अल्बम ‘आहट’ १९८० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून त्यांना यश मिळू लागले आणि २०११ पर्यंत त्यांनी  ५० पेक्षा अधिक अल्बम आणि  शेकडो संकलन अल्बम रिलीज केले. डिसेंबर १९८७ मध्ये म्युझिक इंडियाने लाँच केलेला त्यांचा ‘शगुफ्ता’ हा अल्बम भारतात कॉम्पॅक्ट डिस्कवर रिलीज झालेला पहिला अल्बम होता.


१९९०साली ‘घायल’ चित्रपटासाठी त्यांनी लता दीदी मंगेशकर यांच्यासोबत ‘माहिया तेरी कसम’ हे युगल गीत गायले. या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. १९९४ मध्ये साधना सरगम यांच्यासोबतचे ‘मोहरा’तील ‘ना कजरे की धार’ गाणे अतिशय लोकप्रिय  ठरले. साजन , ये दिल्लगी , नाम,  फिर तेरी कहानी याद आयी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक म्हणून नाव मिळविले़


आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गीतांचे गायन केले़ गझलांसोबत गीतांच्या गायनातून हृदयाला भिडवणारा जादुई आवाज  शांत झाला. एक सुवर्ण स्वर मागे सोडून ते अंतिम प्रवासाला निघून गेले़ 

पंकज उधास यांना मनस्वी श्रद्धांजली! 



संजय मुंदलकर 


Photos Courtesy : Google



Thursday, 29 February 2024

SAANJANTANOO सुकला ना गजरा

 



सुकला ना गजरा  


दिल्या घावांना फुंकारून राखतो कुरवाळतो मी

त्या वळणावरी ठेविल्या जखमा कित्येक मी 

टाक पाऊल माघारी गजरा ना सुकला अजुनी

तुझ्याच मिलनी रोखला राखला श्वास मी 



संजय मुंदलकर


(सर्वाधिकार सुरक्षित) 

Friday, 9 February 2024

SAANJANTANOO मी तुझीच रे धरा





तुझीच रे धरा


गगनी तू मगनी तू

हृदयी तू अंतरी तू

मी तुझीच रे धरा

मी तुझीच रे धरा

सांजना ... प्रियवरा

प्रियवरा ... सांजना


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Friday, 19 January 2024

बालकलाकार, नायिका, गायिका, खलनायिका, खाष्ट सासू

 बालकलाकार, नायिका, गायिका, खलनायिका, खाष्ट सासू असे  बºयाच भूमिकांतून लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री म्हणजे ललिता पवार...बालकलाकार, नायिका, गायिका, खलनायिका, खाष्ट सासू अशी अनेक लेबल त्यांना आपल्या कारकिर्दीत लागून गेले.

ललिता पवार यांचा जन्म नाशिकजवळील येवला येथे १८ एप्रिल १९१६ रोजी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत ललिता पवार यांनी सात दशके अर्थात ७० वर्षांत ७०० पेक्षा अधिक चित्रपटांत अभिनय साकारला आहे. 

ललिता पवार यांनी बालकलाकार म्हणून मूकपटात काम करायला सुरुवात केली. १९२८ साली ‘आर्यमहिला’ या मूकपटाच्या माध्यमातून ललिता पवार यांनी काम करण्यास सुरुवात केली. गनिमी कावा, ठकसेन राजपुत्र, समशेर बहादूर, चतुर सुंदरी, पृथ्वीराज संयोगिता, दिलेर जिगर या मूकपटांनंतर त्यांना बोलपटासाठी विचारणा झाली. 




ललिता पवार यांचा हिम्मत-ए- मर्दा हा चित्रपट खूपच गाजला. पुढे त्यांनी दुनिया क्या है या चित्रपटाची निर्मितीदेखील केली. अमृत, गोरा कुंभार, जय मल्हार, रामशास्त्री, अमर भूपाळी, मानाचं पान, चोरीचा मामला असे अनेक चित्रपट गाजले़ ललिता पवार यांनी नायिका म्हणून काम करण्यासोबत खलनायिका म्हणूनदेखील काम केले.

खलनायिका अशा...

ललिता पवार एकेकाळी बॉलिवूडमध्ये इतर महिला कलाकारांसारख्याच हिरोईन बनण्याचे स्वप्न बाळगून आल्या होता. एका घटनेने मात्र त्यांना खलनायिका बनवले.़़त्यांचे आयुष्यच बदलून गेले. १९४२ मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’चे छायाचित्रण सुरू असताना भगवान दादा यांना ललिता पवार यांना थोबाडीत मारायची होती. भगवान दादा यांनी त्यांना इतक्या जोरात थोबाडीत मारली, की ललिता पवार खाली कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यशावकाश तब्येतीतून बाहेर आल्या. लकव्यामुळे  मात्र डावा डोळा गमवावा लागला. भरीसभर चेहराही कायमचा बिघडला. डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचे हिरोईन बनण्याचे स्वप्न तुटले, हार तर मानली नाही. त्यांना नायिकेची भूमिका मिळाली नाही. मात्र इथूनच हिंदी सिनेमातील सर्वात खाष्ट सासूचा जन्म झाला. 


कधी  खाष्ट  सासू तर कधी कठोर आई, त्या जेव्हा पडद्यावर येत त्यावेळी प्रेक्षकांपैकी  अनेकांच्या तोंडून शिव्याशाप बाहेर पडत. त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणे कठीण व्हायचे की, त्या अभिनय करतात, की सगळं खरं खरं घडत आहे. त्यांनी खाष्ट सासूच्या अशा व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या पाहून लोक क्रूर सासूचे उदाहरण देण्यासाठीही त्यांचे नाव घेतात.  दुसरीकडे पडद्यावर कठोर दिसणाºया  ललिता  पवार खºया  आयुष्यात मात्र  वेगळ्या  होत्या. 

 गायिका सुद्धा ...

 पहिल्या चित्रपटानंतर  ललिता पवार यांचे मानधन इतके वाढले, की अभिनयासोबत त्या चित्रपटांची निर्मितीही करू लागल्या. ललिता यांची कारकीर्द शानदार सुरू होती. त्या अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील होत्या. हिम्मत-ए- मर्दामधील  त्यांनी गायलेले ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे...’ हे गाणे चांगलेच गाजले.  रामानंद सागर यांच्या  ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत त्यांनी मंथराची भूमिका साकारली होती.  आयुष्याचा शेवटच्या टप्प्यात त्यांना जबड्याचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु वजन कमी होण्यासह स्मृतीभ्रंशही झाला. अशातच २४ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


*****



Wednesday, 22 November 2023

SAANJANTANOO वेदना सरल्या नाही ...






वेदना सरल्या नाही


तू दिल्या वेदना सरल्या नाही

                     तुझ्यासवे चाफा कधी फुलला नाही


चंद्रही लोपला, कुणी न सोबती

कशी जपावी या चांदण्यांशी नाती

श्वास कधी हा बहरला नाही


जरी फाटले आभाळ पेलेन सारे 

गाईन मग मी सूर मिलनाचे

खेळ हा सखे गं नित्याचा नाही



संजय मुंदलकर 

गीतकार : सावरू कशी ...(अल्बम)

यू ट्यूब : नूतन्स म्युझिक डॉट

Wednesday, 15 November 2023

आजचा दिवस उद्यावर ...

 मागील काही वर्षांमध्ये नागरीकरणाची  झपाट्याने  झालेली प्रक्रिया पाहता भविष्यात शहरांची संख्या आणखी वाढेल, याबाबत अंदाज सहजरित्या बांधता येतो. आपण पाहत आहोत की शहरे  झपाट्याने वाढत आहेत, ज्यावर  कुणाचेही नियंत्रण नाही. शासन, प्रशासन आणि सरकारचेही! 

औद्योगिकीकरण आणि रोजगाराच्या नवीन संधींमुळे शहरांकडे स्थलांतराचा कल वाढला , दिवसांगणिक वाढत आहे. नवीन उद्योगांची स्थापना आणि वाढत्या व्यापारामुळे शहरे सातत्याने विस्तारत आहेत. सोबतच अनेक समस्याही निर्माण होत आहेत. विविध प्रकारच्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करून अवाढव्य निवासी संकुले बांधली जात आहेत. यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये शेतीसाठी असलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे. 

मात्र, त्याचवेळी भारतातील बहुतांश शहरे पाणी, वीज, आरोग्य, वाहतूक, घरे, स्व

च्छता  अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे लोक अशाप्रकारे वंचित आहेत आणि दुसरीकडे अशी शहरे विकसित होत आहेत. निश्चितच   विसंगत  दृश्य आहे. मग यातून निर्माण होणारे प्रश्न येत्या काळात आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता नाकारणार कशी?   चिंतन करण्यासारखा  मुद्दा हा आहे, की  इतक्या प्रचंड लोकसंख्येचा आणि संसाधनांचा वाढता भार सहन  करण्यासाठी आपली  शहरे  तयार आहेत का? की आपण डोळे  मिटवून ढोंग आणतोय...

मागील काही वर्षात लहान शहरांचे नागरीकरण झाले़ हे ठीक आहे़ कारण त्याच्या शेजारच्या गावखेड्यातील लोकांनीच तिथे आश्रय घेतल्याचे  पाहावयास मिळते;परंतु मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आश्रय घेतल्याने विविध स्तरावर आणि नको तितक्या समस्या निर्माण झाल्या़ निवास, पाणी, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगार, गुन्हे अशा काही. प्रश्न बिकट असे, की यात  कुठेही  ताळमेळ  बसला नाही  किंवा अजूनही बसत नाही़ कारण  एखाद्या मोठ्या शहरावर चोहोबाजूंनी लोकांचे लोंढे येत असेल, तर त्यावर कुणालाही नियंत्रण मिळविता येत नाही. एखाद्या मोठ्या शहरात येणारी लोकसंख्या ही दोन वेळेच्या घासाची सोय करण्याठी आलेली असते़ त्यांची शासनदरबारी नोंद होत नाही़ मात्र, त्यांच्या वास्तव्याने अनेक समस्या निर्माण होत असतात. यापैकी अनेकजण मुक्कामाचा डेरा हलवत असतात. साधारणपणे ही मंडळी मोठ्या शहरातील रेल्वेस्थानक परिसराचा आश्रय घेतात़ काही लहान धंद्यानिमित्ताने येणारी मंडळी भाड्याच्या घरात  राहून  जगण्याचा  प्रयत्न करतात़ त्यांची या  ना  त्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाकडे  नोंद  होते़  सांगायचे असे की वरील दोन्ही प्रातिनिधिक घटकांमुळे  स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड ताण येतो़ पुढे विविध समस्या निर्माण होतात. 

आपल्या  गरजेनुसार आपल्याला  घर मिळावे असा कुणाच्याही मनात स्वाभाविकपणे  येणारा विचार त्यांच्याही मनात येतो आणि  पुढील काळात सीमेंटच्या जंगलात तेही आपला वाटा उचलतात. मग  यातून आपल्या  निसर्गाचा  विध्वंस घडून येतो़ पीक नष्ट करून सुपीक जमीन पडित दाखवत प्लाट तयार करून  लोकवस्ती तयार केली जाते. आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतो, तो असा.  

एखादी  गोष्ट उपलब्ध करून घेण्याची  ऐपत नसल्याने असमतोल वाढत जातो आणि तो तसाच कायम राहतो. मग कुठे तरी शहरीकरणाच्या वेगवान प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न होतो. ठोस धोरण तयार करताना संसाधनांवर वाढत्या लोकसंख्येचे अवलंबित्व अधिकच असल्याचे आढळून  येते. परिणामी  समस्या  आणखी  गुंतागुंतीची होत जाते. लोकसंख्या  वाढीचा  सर्वात  वाईट  परिणाम शहरांवर दिसून येतो. राजकारण्यांसाठी तर हातचे  जुने  सुटत नाही आणि नवे  धरता येत नाही, अशी स्थिती निर्माण होते. लोकं मात्र आजचा दिवस उद्यावर ढकलत  जगत राहतात.

Thursday, 9 November 2023

दिवाळी गोधन ...

आपल्या देशातील बहुतांश राज्यात पाच दिवसांची दिवाळी साजरी होतो. हा मोठा सण. शहरी भागात या सणाचे पूर्णपणे राजकारण आणि व्यावसायिकरण झाले असले तरी ग्रामीण भागात परंपरा, वारसा जपण्यात येतो.


दिवाळी उत्सव हा मुळातच कृषी, आरोग्य, आनंद यावर त्रिसूत्रीवर आधारित आहे. भारत कृषिप्रधान देश. औद्योगिकरणाला अधिक भाव असला तरी त्याचे मूळ शेतातील पिकेच आहे़ ते नाही तर काहीच नाही.
साधारणत: नवरात्र दसरा सणापासून सोयाबीन, मूग, ज्वारी वा हायब्रिडचा हंगाम सुरू होता़े याच कालावधीत शेतात पºहाटीची बोंडे फुटतात म्हणजे त्यातून कापूस बाहेर पडतो. पहिल्या कापसाचा वेचा हा ‘सीतादेई’ वा ‘सीतादेवी’ या पुजेने सुरू होतो.

दिवाळी सण कालावधीत हिवाळा सुरू होतो़ त्यामुळे आरोग्य अन्य ऋतुंच्या तुलनेत अधिक सुधारते़




घरात पिके येतात़ त्यामुळे घरोघरी आनंदाचे वातावरण असतेग़ाठीला पैकापाणी असतो. याचवेळी यात्रा वगैरे सुरू होतात. भाऊबिजेने त्यात आणखी भर पडते़ माहेरवासीण भावाकडे जाते वा तो येतो. नातेवाईकांची घरोघरी गर्दी़़़ पिकांची चर्चा ़़़ संस्कारांची देवाण घेवाण़़़विचारांची आदान प्रदान एका पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित होत असते़ एकादवेळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो़ आणि दिवाळीनंतर बार उडवूया असे निश्चित होते. एका नव्या पिढीचे बिज रोवल्या जाते, ते असे !
मात्र, यात शेतकºयांच्या जिवाभावाला विसरता येत नाही़ ती म्हणजे पाळीव जनावरे, गाय, बैल, बकरी, कुत्री, मांजरे, कोंबडे ही सर्व पाया-पायांशी वावरणारी सगेसोयरे. दिवाळीसणात गाय शेळी यांची विशेषत्वाने पुजा करण्यात येते़ गावाच्या सीमेपर्यंत नेऊन त्यांची पुजा अर्चा होते.


वसुबारसपासून म्हणजे पहिल्या दिवसांपासून शेणाचे ‘गोधन’ टाकण्यात येते़ हा शेणाचा एक मोठा गोळा असतो. त्याभोवती रांगोळी, पुजा केली जाते. रात्री त्यावर दिवनालीचा दिवा लावण्यात येतो.


दिवाळीसणात निसर्गाने शेतपिके, घराच्या कोठ्यातील जनावरे, मानवी नाते यांच्यात गुंफण घातली ती अशी ...

***

Tuesday, 7 November 2023

धुके आणि धूर

 मित्रांनो, असे म्हणतात की मृत्यू प्रत्येक जीवाचे अस्तित्व नष्ट करतो, ते एक सत्य आहे आणि प्रत्येकाला स्वीकारावेच लागते. एक दिवस जायचेच आहे, असे म्हणत मानवजातही जगत एकेक दिवस ढकलत असते. अर्थात हे झाले  मनुष्याला  एका  ठराविक   वयानंतर येणाºया मृत्यूबाबत; परंतु कुणी स्वत:हूनच आपला मृत्यू ओढवून  घेत  असेल  तर...


होय! ही मानवजात जर आपल्या मृत्यूचा रस्ता स्वत:च तयार करत असेल तर त्याला काय म्हणावे? आणि  हे  सर्व  या जगातील प्रत्येक माणूस अगदी तुम्ही आम्ही सर्वजण करत आहोत. कारण  संपूर्ण जगभराला जल, वायू, जमीन प्रदूषणाचा  जो  विळखा पडलाय, तो आपल्यामुळेच! हवा, जमीन, पाणी, आकाश या सर्व ठिकाणी मानवाने आपल्या मरणघंटा बांधून ठेवल्या आहेत. आणि अशा अकाली मृत्यूमुळे केवळ नुकसानच नुकसान होत असल्याचे  दिसून येते.



आपल्या देशापुरता  विचार करावयाचे झाल्यास, येथील प्रत्येक राज्य प्रदूषणाच्या मगरमिठीत सापडले आहे. मनुष्याचा पाण्यापेक्षा हवेशी अधिक संबंध असतो. कारण श्वसनासाठी चोवीस तास हवेची गरज असते. मात्र, आता  हीच हवा प्रदूषित झाली आहे, नव्हे आपण ती केली आहे...आजच्या या घडीला करतही आहोत. मोठ्या संख्येत वाहनांचा वापर, उद्योगांमध्ये नियमांचे उल्लंघन अशा मानवनिर्मित बाबी कारणीभूत आहेत.


सध्या देशातील प्रदूषणाचा चांगलाच गाजत आहे. जगातील अत्यंत धोकादायक आणि गंभीर प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील काही शहरांचा समावेश आहे़ यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली सुद्धा आहे. दिल्लीतील प्रदूषणाचे कारणे अनेक सांगण्यात येतात़ बोंब उठली, ती थोपविण्यासाठी काही कारखान्यांना नोटिशी रवाना होतात़ मूळ मुद्दा कायम राहतो़ पराली (शेतपिकांचा शिल्लक भाग) जाळणे, वाहनांची भरमसाठ संख्या, फटाक्यांचा धूर, कारखान्यांतून बाहेर पडणारा धोकादायक वायू अशी काही या प्रदूषित वातावरणाची कारणे. याठिकाणी संबंधित सर्व ‘प्रताप’ मानवनिर्मित आहेत, ही बाब मंडळी विसरतात. 


दिल्ली महानगर आणि  शेजारच्या राज्यात औद्योगिक क्षेत्र अधिक आहेत. रासायनिक, चामडे, खत निर्मिती उद्योगांची भरमार असल्याचे प्रदूषित वायूची निर्मिती अधिक राहणारच! सुरुवात येथूनच होत असल्याचे या कारखान्यांची तपासणी होते का, असा प्रश्न निर्माण होणारच. दिल्लीतील ही स्थिती पाहता सरकारकडून येत्या दिवाळी सण उत्सवाच्या कालावधीत फटाके जाळण्यावर बंदी येऊ शकते. कारण लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम होत असतो. मुंबईत यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. कारण या शहरातही हीच समस्या निर्माण झाली आहे.  




सम-विषम

राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषण थोपविण्यासाठी सर्व वाहनांना आॅड आणि इव्हन अर्थात विषम-सम असा उपाय सूचविण्यात आला. या नियमानुसार, वाहनाचा शेवटचा क्रमांक विषम (१,३,५) असेल तर ते फक्त विषम तारखांनाच रस्त्यांवर धावेल. तर, वाहनाचा क्रमांक सम (२,४,६) असल्यास, त्याच तारखेला वाहन घराबाहेर पडू शकेल. आप सरकारने २०१६ मध्ये पहिल्यांदा ही योजना लागू केली होती. यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अभ्यास करण्यात आला आणि संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आले. मात्र, हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेइतकी सुधारणा झाली नाही. नंतरच्या वर्षातही विषम-सम योजना लागू होती. यातून वाहनांच्या एकूण प्रदूषणापैकी दुचाकींमुळे ५६ टक्के प्रदूषण होते. २०१९ मध्ये सुद्धा हा नियम लागू करण्यात आला होता. कॉन्सिल आॅन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या अभ्यासानुसार, सम-विषमचा विशेष फायदा नाही. दिल्लीतील वाहतुकीमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांनुसार, विषम-सममुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रत्येक वाहनातून उत्सर्जित होणाºया वायूंमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारण्यावर त्याचा किरकोळ परिणाम होतो. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी एक्यूआय ४५० ते ५०० असल्यास विषम-सम नियम लागू करावा.


कोरोना काळ

याशिवाय मागील कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात या आजारांची लागण झाली होती, अशा काही जणांना अन्य आजारांचा सुद्धा संसर्ग होत असल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ हवेची गरज आहे. केवळ श्वास घेऊन चालणार नाही, तर तो स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेचाच असावा. यात वावगे काय? आपण प्रदूषण का करतोय, हा प्रश्न स्वत:च्या मनात का निर्माण करत नाही? आपण दररोज वापरत असलेल्या वाहनातून बाहेर पडत असलेला विषारी वायू का थांबवत नाही? फटाके न फोडल्याने वातावरणातील हवा स्वच्छ राहत असेल, तर त्याचा आपल्याला हव्यास का नाही? झाडांद्वारे स्वच्छ हवा वातावरणात पसरत असेल, त्याकडे आपले हात का वळत नाही?


निसर्ग ‘धुके’ निर्माण करतो आणि स्वत:ला अत्याधुनिक, प्रगतीचे पाईक, विकासाचा महामेरू समजणारी मानवजात ‘धूर’ निर्माण करते़ 

निसर्ग स्वार्थाविना कर्तव्य पार पाडतो आणि माणूस स्वार्थाला गोचिडासारखा चिपकून धूर निर्माण करतो़.


संजय मुंदलकर



Tuesday, 10 October 2023

SAANJANTANOO तुझा हरेक नखरा

 






दिलाचा तुझ्या ठाव जाणतो मी

नजरेतली फितुरी जाणतो मी 

झाकू नकोस मुखडा चंद्राचा

तुझा हरेक नखरा जाणतो मी


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)


SAANJANTANOO मी तुझीच रे धरा

 गगनी तू मगनी तू

हृदयी तू अंतरी तू

मी तुझीच रे धरा

मी तुझीच रे धरा

सांजना ... प्रियवरा

प्रियवरा ... सांजना


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)




Wednesday, 4 October 2023

नोकरी वा रोजगार मिळविण्याचे वय वाढले

 भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात आरबीआयने या आधी देशातील लोकांची बचत ५० वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे आणि अनेकांवर कर्जाचे ओझे वाढत आहे, असा अहवाल जाहीर केला होता. आता देशातील बेरोजगारीबाबत चिंताजनक अहवाल अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, देशातील २५ वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी ४२.३ टक्के बेरोजगार आहेत. अर्थात १२+ शिक्षण घेऊनही त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही़ यात कला, वाणिज्य, विज्ञान, आयटीआय, आयआयटी, अभियांत्रिकी, संगणक, वैद्यकीय क्षेत्राचा समावेश असू शकतो़ मोठा पैसा खर्च करून शिक्षण घेतले आणि या महागड्या शिक्षणानंतर हाताला काम मिळू शकले नाही. (कदाचित ते मिळविता येवू शकले नसेल़ कारण काहींना आरक्षण असले तरीही तीव्र स्पर्धा करावी लागते)





अझीम  प्रेमजी विद्यापीठाच्या ‘स्टेट आॅफ वर्किंग इंडिया’ या अहवालात असेही नमूद केले, की देशातील बेरोजगारीचा दर २०१९-२० मध्य ८.८ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये ७.५ टक्के आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच देशातील सुशिक्षित  तरुणांमध्ये  बेरोजगारीचे  प्रमाण वाढले आहे.


या अहवालानुसार, सर्वाधिक २२.८ टक्के बेरोजगारी दर २५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतलेल्या २५  वर्षांखालील  तरुणांमधील बेरोजगारीचा दर २१.४  टक्के आहे, जो सर्वाधिक आहे. ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ १.६ टक्के आहे. यावरून हेच दिसून येते, की नोकरी वा रोजगार मिळविण्याचे वय वाढले असून, ते ३५ वर्षांच्या पलीकडे पोहोचले आहे़ त्याआधी नोकरी हस्तगत करण्याची  ‘वेळ’ ही आजच्या अत्याधुनिक काळात तरी नाही, जेव्हा की सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण मोठा खर्च करून घेतलेले शिक्षण वाया जाणार की काय, अशी भीती उदयास येणे साहजिकच आहे. कारण पालकांनी स्वकमाईतून वा कर्जातून  मोठ्या  रकमा  उभ्या  केलेल्या असतात. ही बाब स्वप्नात सुद्धा नाकारता येणे शक्य नाही. याशिवाय २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरक्षर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १३.५ टक्के असल्याचे  दिसू आले़ तर, ४० वर्षे आणि त्यावरील निरक्षर गटातील बेरोजगारीचा  दर २०.४ टक्के आहे. यातून  हाच निष्कर्ष बाहेर पडतो, की सुशिक्षितांच्याच हाताला नोकरी वा रोजगार मिळत नसेल तर निरक्षर तर दूर की बात है...



अझीम प्रेमजी विद्यापीठाने हा अहवाल सरकारी आकडेवारीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. एनएसओचे रोजगार-बेरोजगार सर्वेक्षण, श्रमिक कार्यबल सर्वेक्षण, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, लोकसंख्या जनगणना यासारख्या अधिकृत आकडेवारीचा आधार घेतल्याचे म्हटले आहे. यात समाधानाची एक बाब सुद्धा उल्लेखित आहे. देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला असला तरी उत्पन्नाची पातळी स्थिर राहिली असल्याचे म्हटले आहे. 



याशिवाय सदर अहवालात महिलांना मिळत असलेल्या संधीचाही उल्लेख केला आहे. कोरोना  महामारीआधी  महिलांच्या  उत्पन्नात घट होऊ लागली होती. २००४ पासून महिला रोजगार दर एकतर घसरत आहे किंवा स्थिर आहे. २०१९ पासून महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. महामारीच्या काळात महिलांनी अधिक प्रमाणात स्वयंरोजगार सुरू केले. कोरोना महामारीच्या आधीच्या दिवसांत ५० टक्के  महिला स्वयंरोजगार करत होत्या आणि  त्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 


संजय मुंदलकर

Sunday, 1 October 2023

IT'S POLITICLE दिसंबर बहुत दूर नहीं ...

 पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि  तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीनिमित्त प्रचार, सभांतून सत्ताधारी-विरोधकांतील आरोप-प्रत्यारोप-टीकांचा धुरळा उडेल. एक  दिवशी मतदान पार पडून निकाल जाहीर होईल. भारतीय निवडणूक आयोगाने आपले  वेळापत्रक घोषित केले़ आणि सत्ताधारी आणि विरोधकांना कामाला जुंपले. तसा अप्रत्यक्ष प्रचार मागील काही महिन्यांपासूनच सुरू झाला होता. कारण या दोघांनाही ‘पंचराज्य’ कोणत्याही  परिस्थितीत काबीज करायचे आहे. [ SANJAY MUNDALKAR' NITYAASAN ]


पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे म्हणजे  केंद्रीय  पातळीवरील  सत्तांतराचे  वर्ष. त्यामुळे  राजकीय दृष्टीने पाहता देशातील मानसिक बदलांचा कस लागणार आहे. कारण ही ‘पंचराज्य’ च   सत्ताधारी आणि विरोधकांचे नशीब ठरवेल. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी सत्ताप्राप्तीसाठी दंड  थोपटले आहे. याठिकाणी  ज्या पक्षांची सत्ता येईल, त्या पक्षांचे ‘हौसले बुलंद’ होतील, यात शंका नाही. जो यशस्वी ठरेल, त्याचंच ‘खरं’ असेल. 


‘पंचराज्या’ची निवडणूक ही सत्ताधारी वा विरोधकांसाठी २०२४ आधी सेमी फायनल नाही,तर मोठा ‘स्पीड बे्रकर’ म्हणता येईल. कारण हा मोठा अडथळा जो पार करेल, त्याची ‘नाव’ पार होणार आहे. या राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचे मोठे परिणाम निश्चितच लोकसभा निवडणुकीवर दिसून येतील. मुळातच मोदी सरकारच्या  नऊ वर्षांत देशवासीयांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे प्रतिबिंब या निवडणुकीच्या निकालात पाहता येईल. सत्ताधाºयांचाही प्रवास सोपा नाही. प्रचारासभादरम्यान २०१४ पासून आतापर्यंत निवडणुकीत  दिलेल्या किती आश्वासनांची आणि कशी पूर्तता केली, तेही छातीठोकपणे सांगावे लागणार आहे, अन्यथा आश्वासन पूर्ण न केल्याबाबत माफी मागत आगामी लोकसभा निवडणुकीआधी ते पूर्ण करण्याची ‘फुल्ल गॅरंटी’ द्यावी लागणार आहे. अर्थातच, हे काम तितके सोपे नाहीच. 





देशाची वाटचाल बदलली, काँग्रेसनेही बदलावे

काँग्रेसलाही पुढील लोकसभेत सत्ता गाठायची असल्यास २०१४ पासूनच्या  निवडणूक प्रचारपद्धतीला तिलांजली देत  नव्याने मूळ रुजवावे लागेल. सुमारे दहा वर्षांची सत्ता भोगल्यानंतर यूपीएला (आता काहीसे नामकरण इंडिया असे ...) बदलणे गरजेचे आहे. काँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्यानंतर  मागील नऊ वर्षांत देशाची वाटचाल पूर्णपणे बदलली आहे. भाजपामुळे नवी आव्हाने निर्माण  झाली आहेत.

निवडणूकही ‘डिजिटल’ झाली आहे, असे म्हणता येईल. झालेल्या चुकांची खुलेदिलाने देशवासीयांची माफी मागावी लागेल. याशिवाय केवळ सत्ताधाºयांवर टीका करून चालणार नाही तर देशासमोर विकासाच्या नव्या संकल्पना मांडाव्या लागतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  मुद्यांना कसे सोडविता येईल, याचाही उहापोह करावा लागेल. विद्यमान सरकारने नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. मुख्य म्हणजे देशात भाजपा समर्थक तयार झाल्याच्या मुख्य बाबीकडे  दुर्लक्ष करता येणे काँग्रेसला परवडणारे नाही.


मागील कर्नाटक निवडणुकीत प्रामुख्याने  ‘नमो’ आणि  ‘रागां’  यांच्यातील जुगलबंदी  पाहावयास मिळाली़ काँग्रेसने आपली प्रचारपद्धती बदलविल्याने कर्नाटक हाती आला़ आता आणि पुढील सर्व निवडणुकांत ही हेच करावे लागणार आहे़ कारण पाच राज्यापैकी फक्त राजस्थान आणि  छत्तीसगडमध्ये  सत्ता आहे़ भाजपाकडेही एकटेच मध्य प्रदेश राज्य आहे़ (या राज्यातही सहज सत्ता मिळालेली नाही) तेलंगणामध्ये बीआरएसची आणि मिझोराममध्ये एमएनएफ सत्तेत आहे. तर, राजकारणाची  दिवसेंदिवस बदलत असलेली दिशा आणि दशा  पाहून  ही  पाचही  राज्ये  ताब्यात  घेण्यासाठी  ‘दिसंबर बहोत दूर नही...’



संजय मुंदलकर


Friday, 29 September 2023

संयुक्त कुटुंबात हात आणि साथ सोबत-सोबत ...

 काही दशकांआधी भारतीय समाज संयुक्त होता. मोठ्या कुटुंबातून वास्तव्यास होता. एकेका कुटुंबात सामान्यपणे १० ते १२ सदस्यांचा समावेश असे. आईवडिल, मुले, सुना, नातू या नात्यांसोबत कधी कधी विधवा बहीण, आत्या वा अन्य नातेवाईकांचाही समावेश असे. सकाळपासून सुरू होणारा स्वयंपाक पार काही तासांपर्यंत चालायचा. शेतातील  कामे  असो वा घर हातभार लावणारी अनेक हात असल्याने कामे  कशी भराभर व्हायची !



काळ बदलत गेला. शेतांचे तुकडे झाले तसे कुटुंबे  दुभंगली. देशात कारखानदारीसोबतच विविध कार्यालये उदयास आली. नोकरीकडे जाणाºयांचे प्रमाण वाढले. आपल्या आईवडिलांच्या कुशीत पहुडणारी मुले  आता आपल्या मातापित्यांना आपल्याजवळ ठेवण्याच्या ‘पात्रते’ची  झाली. कधी  कधी  आईवडिलांना  भार समजून  तो वाटणीला आला. विवाहित बहिणींना  वेगवेगळ्या चॉईस मिळाल्या. जो तो आपल्या पुरतेच पाहू लागला. आणि त्यातून नव्या समस्या निर्माण झाल्या़ कुठे आजी आजोबा दूर झाले तर कुठे आत्या दुरावल्या. जगाचे रहाटगाडगे समजून समाजाने हे सर्व  मान्य केले. अद्यापही भारतीय कुटुंब विभागलेलेच आहे. संयुक्त  होण्याची वेळ आली असताना कुणाचीही मने समोर धजावत नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.






मात्र, त्याचवेळी अमेरिकन समाजात मोठे बदल होत आहेत. याठिकाणी संयुक्त कुटुंबे झपाट्याने वाढत आहेत. कदाचित त्यांनी ही कुटुंबपद्धत ‘सुखा’सोबत ‘समाधाना’चीही मानली असावी. कारण २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी आजोबांसोबत राहत आहेत. एका सर्वेक्षणानुसार,२०१५ ते २०२०च्या दरम्यान ‘सँडविच’ कुटुंबांची संख्या २८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, जे  त्यांचे पालक आणि  प्रौढ मुलांची काळजी घेतात, त्यांना ‘सँडविच’ पिढी म्हणतात. एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या लॉरा रेगन सहा वृद्ध सदस्यांच्या  कुटुंबाला  मदत  करतात. कधी कधी वृद्ध आई-वडील आणि मुलांची काळजी घेणे हे दोन भिन्न वास्तवांमध्ये जगण्यासारखे असते. दोन पिढ्यांना सुखी ठेवणे हे अवघड काम आहे; परंतु त्यांच्याकडूनच कामाचे व्यवस्थापन करायला शिकले आणि कुटुंबासोबतच्या आयुष्यातील  प्रत्येक दिवस  ही एक अनमोल भेट आहे याची मला जाणीव झाली, असे रेगन सांगतात.



विभक्त कुटुंबापेक्षा संयुक्त कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असल्याचे आढळून आले आहे. संयुक्त कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो, असेही अमेरिकन समाजात घडत आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये राहणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत़ तर, विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या केवळ  २० टक्क्यांची आहे. २७ टक्के उच्च उत्पन्न मिळवणाºया व्यक्ती संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा वाटा अनुक्रमे २१ आणि २४ टक्के आहे. 



संयुक्त कुटुंबातील सहजीवनात राहणारे ४८ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत. त्याच वेळी, विभक्त कुटुंबातील ४४ टक्के तरुण आनंद मानून घेतात. अमेरिकासारख्या नोकरीप्रधान समाज व्यवस्थेत लहान मुलांना आईवडिलांची जशी गरज आहे, तशीच आजी आजोबांची आणि अन्य नात्यांचीही आहे. संयुक्त कुटुंबाचा आनंद मिळतो, तो असा. कारण मनाने एकत्र राहण्याचे सुख केवळ याच समाज व्यवस्थेत अनुभवता येते. संयुक्त कुटुंबातील जबाबदाºयांच्या ओझ्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो, असे मानले जाते. कालांतरान े मात्र ही कुटुंबे पालक व मुलांत समतोल राखण्यास शिकली असल्याचेही आढळून आले आहे. ते आता जबाबदारीला ओझे मानत नाहीत. कारण त्यांचे हात आणि साथ आता सोबत-सोबत असतात़ 


संजय मुंदलकर