Wednesday, 29 April 2020


लढवय्या इरफान

बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में (पानसिंह तोमर), ये शहर हमें जितना देता है उससे कहीं ज्यादा ले लेता है (लाईफ ईन ए मेट्रो), हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है और हमें आज भी राजा भैया बुलाया जाता है (साहिब बीवी और गँगस्टर), शराफत की दुनिया का किस्सा ही खत्म, अब जैसी दुनिया वैसे हम (जज्बा), आदमी जितना बड़ा होता है, उसके छुपने की जगह उतनी ही कम होती है (कसूर), डेथ और शिट किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है (पिकू), गलतिया भी रिश्तों की तरह होती है. करनी नही पडती, हो जाती है (डी डे), शैतान की सबसे बडी चाल ये है की वो सामने नही आता (हैदर), तुम मेरी दुनिया छिनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाउंगा(मदारी) आणि हासिलमधील...और जानसे मार देना बेटा, हम रह गये ना मारने में देर नही लगायेंगे, भगवान कसम, हे अभिनेता इरफान खान यांच्या काही चित्रपटांतील काही लोकप्रिय संवाद.
इरफान यांनी आपल्या अस्सल अभिनयाद्वारे लोकांना हसवले आणि त्यांच्या डोळ्यांतून आसूही पाडले. आपल्या विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला. इरफानची डोळेच सर्व काही सांगून जायची. डोळ्यांतील भाव आणि संवादातून त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरला जात असे़ लंच बॉक्स, इंग्रजी मीडियम, तलवार, मकबूल, ये साली जिेंदगी, हैदर, ब्लॅकमेल, हिंदी मीडियम, द वारियर, हासिल, लाईफ आॅफ पाई, द नेमसेक, रोग यासारख्या ५० हून अधिक चित्रपट आणि ए मायटी हार्ट, ज्युरासिक पार्क, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेझिंग स्पायडरमॅन अशा हॉलिवूडपटांतून इरफान यांनी स्वकर्तृत्वाने अभिनयाचे सर्वाेच्च शिखर गाठले.
इरफान यांनी चित्रपटांशिवाय चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता आणि श्रीकांत अशा मालिकांमध्ये अभिनय साकारला. नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करून इरफान आपली ओळख निर्माण करत असतानाच निर्माती मीरा नायर यांनी ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात भूमिका दिली होती.
मित्रांनो, चेहºयावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता इरफान खान यांचा अभिनयप्रवास सोपाही नव्हता. जयपुरातील पठाण परिवारात जन्मलेल्या इरफान यांची खरी रुची क्रिकेटकडे होती. जयपुरातील चौगान स्टेडियममध्ये सराव सुरू असतानाच सी.के. नायडू ट्रॉफीसाठी निवड झाली होती; परंतु कुटुंबियांनी परवानगी दिली नाही़ मग एका शिष्यवृत्तीच्या आधारे सन १९८४ मध्ये दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मध्ये (एनएसडी)अभिनयाचा अभ्यास केला़ ‘एनएसडी’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर इरफान यांनी दिल्लीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि तेथील अभिनय क्षेत्रात चांगले नावही कमावले. यानंतर त्यांनी मुंबईची दिशा पकडली.

अभ्यासाशी कट्टी

इरफान यांचे अभ्यासासोबत कधी पटले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, माझ्या अभ्यासावरून घरात नेहमीच तणाव राहत असे. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी जयपुरात घराशेजारच्याच शाळेत शिक्षण घेतले;परंतु त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या आईची खूप इच्छा होती. शाळेतील सर्व सहकाºयांना इंग्रजी भाषेत बोलताना ते पाहत होते़ मात्र, त्यावरून त्यांना अनेकदा शिक्षकाकडून शिक्षा मिळत होती.

सन्मान

इरफान खान यांना ‘हासिल’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर सन्मान मिळाला. ‘स्लमडॉग मिलिनिअर’मधील पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारल्यानंतर हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. ‘पानसिंह तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. ‘एक डॉक्टर की मौत’मधील त्यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ हा सन्मानही प्रदान करण्यात आला.
मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये त्यांना ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’ नामक आजाराचे निदान झाले होते. लंडनमध्ये कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतले. लढवय्या वृत्तीच्या इरफान यांना कामाशिवाय स्वस्थ बसवले नाही. ‘इंग्रजी मीडियम’ चित्रपटाचे छायाचित्रण पूर्ण केले. कोरोना लॉकडाऊनमुळे फारशी कमाई करू शकला नसला तरी त्यांचा अभिनय सरसच होता. चित्रपटामध्ये राधिका मदान आणि करिना कपूरदेखील
होती. या चित्रपटात शेवटची भूमिका केल्यानंतर दुर्दैवाने आयुष्यासोबतच अभिनयाचेही अर्धशतक पार करावे लागले. आज २९ एप्रिल २०२० रोजी झालेला त्यांना मृत्यू देशविदेशातील लाखो चाहत्यांना चटका लाऊन गेला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झालेला. ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला, त्याच मातेच्या पाठोपाठ त्यांनी पृथ्वीवरील आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचा अभिनय वर्षाेन्वर्षे स्मरणात राहिल...अलविदा इरफान!

© संजय इस्तारी मुंदलकर 

Saturday, 25 April 2020

आता तारणार केवळ काळी माय

आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे़ ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपणार की वाढणार? सरकारचा निर्णय काय असेल? असे अनेक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उभे राहिले आहे़ कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या तीव्रतेवरून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे विभाग पाडण्यात आले आहे़ त्यानुसार उपाययोजना, नियमांत शिथिलता देण्यात येत आहेत़ असे असले तरी रुग्णांची संख्या वाढतीवरच असल्याचे दिसून येते़ केंद्रीय आरोग्य खात्यानुसार, आज २५ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री सव्वा दहावाजेपर्यंत भारतात २४ हजार ९४२ इतके कोरोना रुग्ण असून ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील सुमारे ३२ दिवसांपासून देशातील उद्योगधंदे, कारखाने, कंपन्यांतील उत्पादन बंद आहेत़ साहजिकच नोकरदारांच्या हाती, मजुरांच्या हाती किती प्रमाणात पैसा आहेत, याबाबत तेच स्वत: सांगू शकतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्नधान्य स्वरुपात, लाभार्थ्यांना काही रकमेचा निधी पुरवण्यात आला आहे़ असे असले तरी प्रत्येकाची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते़ अगदी कार्पाेरेट क्षेत्रातील कंपनी मालकापासून सर्वसामान्य मजुरांना एका रांगेत आणण्यात कोरोना विषाणू कमालीचा यशस्वी ठरला आहे, असे म्हटले वावगे ठरू नये़
मूळ मुद्दा पुढील ३ मे रोजीचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच्या दिवसांतील आहे. कोणत्याही कारखान्यातील उत्पादन तत्काळ बाजारात येऊन त्याची किमत वसूल होणार नाही. त्यासाठी काही वेळ, काळ जाऊ द्यावा लागणार आहे. घटलेला विकासदर स्थिरस्थावर होण्यास बराच कालावधी लागेल़ अशास्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक घडी बसवण्यात केवळ एकच आणि एकच क्षेत्र आपल्या हाती आहे. ते म्हणजे शेती. आता शेतीची पूर्णपणे ‘मना’पासून (कारण आपण शेतजमिनीला स्वार्थापायी दूर लोटले होते.) मशागत करून तिच्यातून उत्पादन घेणे एवढेच आपल्या हाती आहे़ ज्या काळ्यामातीपासून आपण मानवजात दिवसांगणिक दूर जात होतो, तिची सेवा करणे (शेती उत्पादन घेणे) अगदी कमीपणाचे समजत होतो, ती आता पुन्हा नव्याने फुलवावी लागणार आहे़ पूर्वीपेक्षा अधिक घाम गाळून ‘मोती’ पिकवावे लागणार आहे़ अधिक पैसा कमावण्याच्या स्वार्थापायी सुपीक जमीन मुद्दाम पडित पाडून तिच्यावर लोकवस्तीचे बिनकामाचे ले-आऊट पाडून ठेवलेत, मोठमोठ्या इमारती बांधून ठेवल्या (अनेक ठिकाणी कुणाचेही वास्तव्य नाही.)़ आता ती अगोदरची घमेंड, मस्ती सोडावी लागेल. उरलेल्या शेतजमिनी कसणेच आपल्या हाती आहे. तरच ती आपल्याला जिवंत राखण्यास पहिल्यापेक्षा अधिक मदत करेल. ही काळी मायच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था तोलून धरेल, यात कुणाचेही दुमत असू नये.

पुढील काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होईल़ कापूस, तूर, धान, ज्वारी, जवस, उडिद, मूग, मटकी, सोयाबीन, तीळ अशा पिकांचा हा हंगाम़ देशात या काळात अधिक पिकांची पेरणी केली जाते आणि उत्पादनही अगदी कमी काळात हाती येते़ यापैकी खाद्यतेलाची समस्या भागवणारे सोयाबीन आणि जवस, दाळपिके अर्थातच तूर, उडिद, मूग, मटकी, धान्याची गरज भागवणारी ज्वारी आणि नगदी पिके म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन,ऊस आदींचा समावेश आहे. यापैकी कापूस, तूर वगळता इतर सर्व पिके कमी कालावधीत तयार होते. म्हणजे आपल्या सर्वांची अन्नाची गरज लवकर भागू शकते़ तर, कापूस आणि तूर पिकाच्या विक्रीतून नगदी पैसा हाती येतो़ शिवाय कापसाची निर्यातही करता येते़ उसापासून तयार होणारे उत्पादन हाती येण्यास बराच वेळ लागतो.

पाऊसही आपल्याच बाजूने

मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ‘लॉकडाऊन’ मध्येही अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. सरासरीइतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असा मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
आपल्या देशात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता २१ टक्के, तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची आशा आहे. चेन्नईत ४ जून, पणजीमध्ये ७ जून, हैदराबादमध्ये ८ जून, तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईत अनुक्रमे १० आणि ११ जूनपर्यंत दाखल होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे रब्बी पिकांचे अर्थात गहू, हरभरा पिकांचेही भवितव्य शेतकºयांच्या हाती राहणार आहे.

उपासमारीचेही मोठे संकट

जगातील सर्व देशांनी धान्यउत्पादनाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील काही महिन्यात अनेक ठिकाणी उपासमारीचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांच्याकडून देण्यात आला आहे़ विश्व खाद्य कार्यक्रमानुसार, कोव्हिड-19 मुळे जगातील आर्थिक क्षेत्रात आलेल्या संकटामुळे यंदा जगात तीव्र खाद्य असुरक्षाचा सामना करणाºया लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते.अर्थात या महामारीमुळे जगभरात २६.५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगात मागील वर्षातच खाद्य असुरक्षात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ‘डब्ल्यूएफपी’च्या आकडेवारीनुसार, पोटभर जेवण न मिळणाºयांची संख्या २०२० मध्ये २६.५ कोटीपर्यंत चढू शकते, हीच संख्या मागील वर्षात १३.५ कोटी इतकी होती.
जिनेव्हामध्ये आयोजित एका कार्यक्रमात विश्व खाद्य कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ तसेच संशोधन, मूल्यांकन आणि देखरेख विभागाचे  प्रमुख आरिफ हुसेन यांनी सांगितले की, कोव्हिड-19 हे संकट, त्या लोकांसाठी अत्यंत विनाशकारी आहे, जे यापूर्वीपासूनच अन्नसंबंधी समस्यांनी घेरलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी  लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे होणाºया नुकसानीबाबत जी-20 देशांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य किंमतीची अस्थिरता थांबण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विश्व खाद्य कार्यक्रम यांच्या वतीने २१ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या चौथ्या वार्षिक जागतिक अहवालात नमूद केले की, यंदाच्या कोरोनो विषाणू संकट जगभर पसरण्यापूर्वीच मागील वर्षापासून खाद्य असुरक्षा संकट घोंगावत होते. सुमारे ५५ देशांमध्ये १३.५ कोटी यासंबंधीची आपत्कालिन स्थिती सहन करत होते. या जागतिक कारणामुळेही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे.

मित्रांनो, मुळातच आपण कृषिदेशातील  नागरिक़ माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीसंबंधी कामांना ‘लॉकडाऊन’पासून बंधनमुक्त ठेवले आहे़ त्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. ज्या कुणाकडे शेतजमीन आहे, त्यांनी आता पिकांच्या उत्पादनाचे नियोजन करावे़ या नंतरच्या काळात सरकारकडून आणखी काही दिशानिर्देश लागू होण्याची शक्यता आहे़ पिककर्जेही मिळतील़ त्यातूनही कामे करता येईल; परंतु त्याचवेळी पूरक पिकांच्या उत्पादनावरही
भर देणे अगदी काळाची गरज बनली आहे़ पशुपालन (याद्वारे दुग्धव्यवसाय),चारा पिकांची लागवड, शेळीमेंढीपालन,कोंबडी,बदकांचे पालन, अंडी व्यवसाय, नर्सरी, मत्स्यपालन, फुलांची शेती, पाण्याची सोय असल्यास फळपिकांचे उत्पादन करता येणे शक्य आहे़ यातून आपली आणि पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती मूळपदावर आणण्यास आपण मोठी मदत करू शकतो.

© संजय इस्तारी मुंदलकर


Thursday, 9 April 2020

चीन, पाकिस्तानची मारली मती


चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील २०० देशांमध्ये संसर्ग फैलावला आहे. जिथून कोरोनाचा जन्म झाला आणि तो अन्यत्र पसरला, त्या चीनमधील संसर्ग संपल्यात जमा आहे. मात्र, त्याचवेळी  अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, नेपाळ, पाकिस्तान, भारत आदी देशांमध्ये या आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. हजारो मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत सर्वांधिक हाहाकार सुरू आहे.
आज ९ एप्रिल २०२० रोजी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ५० हजारांहून अधिक असून ८५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत ९३८ जणांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. फ्रान्समध्ये ही संख्या एक लाख ९ हजारांवर
पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये ६० हजारांहून अधिकांना बाधा झालेली आहे. तुर्कीमध्ये ३४ हजारांहून अधिकजण बाधित झाले आहेत.
जर्मनीत एक लाख ९ हजारजणांना बाधा झाली असून मृतांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये १४ हजारांहून अधिकांना संसर्ग झाला, तर  पोलंडमध्ये पाच हजारजण बाधित झाल्याची माहिती आहे. अशाप्रकारे सध्या जगभरात जीवघेण्या कोरोनाने थैमान घातले आहे. हे संपूर्ण संकट परतून लावण्यासाठी सर्व देशांकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुम्हा आम्हांचे दुर्दैव म्हणून की काय, अशा परिस्थितीत चीनने दक्षिण चीन महासागरात चक्क युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांत महासागरात अ‍ॅन्टी शिप, अ‍ॅन्टी सब-मरिन आणि अ‍ॅन्टी एअरक्राफ्टच्या मदतीने या क्षेत्रात मोठा युद्धसराव केला. याव्यतिरिक्त फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केल्याची माहिती आहे. या क्षेत्रात आपला प्रभाव दाखवून देणे हाच युद्धसरावामागील चीनचा हेतू असल्याचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील लष्करीविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सध्या दक्षिण चीन महासागरात अमेरिकेची कोणतीही युद्धनौका उपस्थित नसल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या युद्धनौका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या प्रशासनासोबत कार्यरत असल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. चीनने मात्र नेमके याच वेळेचा फायदा घेऊन युद्धसराव केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी या कृतीचा निषेध केला. त्यावर चीनने अमेरिकेवरच निशाणा साधला. आम्ही अन्य देशांना कोरोनाविरूद्ध लढण्यास मदत करत असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण चीन महासागरात अनेक लहान बेटे आहेत. त्यातील सर्वाधिक भागावर चीनने आपला दावा केला आहे, तर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई यांनी दावा नाकारला आहे. त्यातूनच सर्व देश कोरोनाविरोधात मोठा लढा देण्यात व्यस्त असताना चीन नुसताच खाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहे,असे म्हणता येईल.

पाकिस्तानचे भूत

इमरान खान सरकारने कोरोनामुळे मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ लागू केलेले नाही. याशिवाय या देशात महागाई, दारिद्र्य आदी प्रकारांनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन कठीण परिस्थितीत व्यतित होत असताना सरकारला त्याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते़ कारण जगभरातील देशांवर कोरोना संकटाची टांगती तलवार असताना पाकिस्तानने मात्र मागील १९ मार्चला बलुचिस्ता
न प्रांतातून सुमारे ७५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाºया क्रूझ मिसाईल (क्षेपणास्त्र) बाबर-२ ची चाचणी केली. दुर्दैवाने १४ किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच ते जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी अधिकाºयांनुसार, बाबर-२ साठी पाकिस्तान चीनची मदत घेत आहे़ मुळात पाकिस्तानच्या मानगुटीवर भारताच्या डीआरडीओद्वारा निर्माण होणाºया एक हजार किलोमीटर लक्ष्य साधणाºया निर्भय क्रूझ मिसाईलसोबत बरोबरी करण्याचे भूत बसल्याचे दिसून येते.
©  संजय मुंदलकर

Monday, 6 April 2020

कोरोना आणि वसुंधरा


चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे; परंतु त्याचवेळी या कोरोना विषाणूमुळे सुरूअसलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पृथ्वीला, धरणीमातेला, वसुंधरेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. एका माहितीनुसार, धरतीवर अशी स्वच्छ हवा सुमारे ७५ वर्षांनंतर आढळली आहे. यापूर्वी दुसºया जागतिक महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती, असेही सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दुसºया महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्बन उत्सर्जन सर्वांत कमी होत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्याने जगभरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’चे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटले, की यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झाले होते. यावेळी १.४ टक्के घट दिसून आली होती. दुसºया महायुद्धाच्या काळात प्रामुख्याने युरोप, आशियातील अनेक देशांतील कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. आता इतक्या वर्षांनंतर चित्र पाहायला मिळत आहे, असेही रॉब जॅक्सन यांनी म्हटले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक कार्बन उत्सर्जनमध्ये १० ते २० टक्के घट झाली आहे; पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण २०२१ च्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढणार, हे अपेक्षित आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने (युनो) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ७.६ टक्के इतकी घसरण झाली तरच ‘ग्लोबल वॉर्मिंग’अर्थात जागतिक तापमानात १.५ अंश से
ल्सियसची कमतरता येईल.
हिंदी वृत्तपत्र राज एक्सप्रेसनुसार, एका नव्या अभ्यास सर्वेक्षणात पृथ्वी सभोवती असलेले सुरक्षा कवच अर्थात ओझोनच्या थरात सुधारणा होत आहे. पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील  संशोधन संस्था ‘सीआयआरईएस’ च्या (को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स) संशोधक अंतरा बँनर्जी यांनी युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो बोल्डर येथे यासंदर्भात माहिती दिली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात पर्यावरण बदलाविषयीचे संकेत मिळाले आहेत. हे बदल ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मुळे ओझोनच्या थराचे छिद्र आंकुचन पावत असल्याने होत आहेत.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल...

‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ हा एक जागतिक पातळीवरील करार आहे. या करारात ओझोन थराला कमजोर करणाºया घटकांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी काही देशांनी सहमती दर्शवली आहे. हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना संमेलनात पारित केला होता. या करारावर १६ सप्टेंबर १९८७ रोजी स्वाक्षºया करण्यात आल्या़ तसेच, हा करार १ जानेवारी १९८९ लागू करण्यात आला होता. विशेष म्हणजे या करारात आतापर्यंत सातवेळा संशोधन करण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनुसार ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’चे पूर्णत: पालन केल्यास २०५० पर्यंत ओझोन थराच्या छिद्राला पूर्ण झाकण्यात यश मिळू शकते.

‘लॉकडाऊन’ कारणीभूत

कोविद-१९ अर्थात कोरोना व्हायरस डिसीज 2019 पासून झालेल्या संक्रमणाला परतून लावण्यासाठी जगभरातील देशांनी ताळेबंदी
(लॉकडाऊन) लागू केली आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने पृथ्वीभोवतीच्या वातावरणात तसेच पर्यावरणात तीव्र गतीने सुधार झाला आहे. धरतीच्या दहाही दिशांतून होणारी वाहतूक बंद असून जगातील लाखो कारखाने, उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे विकसित, अर्धविकसित देशांतून होणाºया प्रदूषण उत्सर्जन प्रमाणात घट झाली आहे. परिणामी वायुमंडळातील हवा स्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे.
भारतासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ९० शहरांमध्ये नाममात्र वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली. यात असेही सांगण्यात येते की यामुळे श्वास घेणे सोपे झाले झाले़ (अर्थातच सर्वांना स्वच्छ हवा मिळाली.)
कोरोनामुळे देशात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या प्रभावामुळे प्रदूषणात घट झाली असली तरी सरकाराला या क्षेत्रात अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संकेतही पर्यावरण तज्ज्ञांनी दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कोरोनासंबंधित महामारीने जगातील मानवजातीला झोपेतून जागे केल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात मानवाला केवळ आपले आरोग्यच नाही, तर धरतीमातेचे आणखी शोषण करण्याऐवजी तिच्या अधिक सुरक्षिततेसाठी, तिच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न राहण्याची गरज दाखवून दिली आहे.

गंगा नदीही स्वच्छ

केंद्र सरकारने देशव्यापी ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. वाराणसी येथील आयआयटी अर्थात भारतीय प्रऔद्योगिकी संस्थातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सध्या बंद स्थितीत असलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत स्पष्ट केले आहे. नदीच्या पाण्यात स्वच्छतेबाबत ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुमारे ३६ देखरेख केंद्रांनी गंगा नदीचे पाणी विविध ठिकाणांवरून गोळा केले. विरघळलेला प्राणवायू, जैव रासायनिक प्राणवायूची गरज, एकूण कोलीफॉर्म, पीएच पातळी हे निकष पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात आले. विविध पातळीवर केलेल्या तपासून सुमारे २७ बिंदूंच्या आधारे हे पाणी आंघोळ, वन्यजीव तसेच मत्स्यांच्या प्रसारासाठी योग्य दर्जाचे असल्याचे सीपीसीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. उद्योगांकडून होणाºया प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची संधी ‘सीपीसीबी’ला प्राप्त झाली आहे. त्याआधारे उपाययोजना करता येईल, असेही सांगण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागातील हवा स्वच्छ झाल्याने आकाश निळेशार दिसून येत आहे.

हिमालयाचे दर्शन

वाहतूक आणि औद्योगिक कारखाने बंद असल्याने पर्यावरणाची स्थिती सुधारली आहे़ वायु प्रदूषण कमी झाल्याने वातावरण बिल्कुल साफ झाले आणि तब्बल ३० वर्षांनंतर हवा इतकी स्वच्छ झाली की पंजाबमधील जालंधर शहरापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागल्या. या शहरातील नागरिकांनी या दृश्याचा पुरेपूर आनंद घेतल्या़ या गोष्टीवरून असे दिसून येते की, आपण निसर्गाच्या सौंदर्याला किती मुकलो आहोत.

© संजय मुंदलकर

Tuesday, 17 March 2020

लोहार सुतार समाजाला संजिवनी  मिळावी...


आजच्या  परिस्थितीत बारा बलुतेदार वर्गातील जनता अगदीच मागासलेली राहिली आहे. त्या सर्वांचे  पारंपरिक  व्यवसाय यांत्रिकीकरणाने गिळंकृत केले आहे, पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले राहिल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागामध्ये पारंपरिक व्यवसायातून आपली कलाकुसर दाखवून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपला प्रपंच कसाबसा चालवत असे; परंतु  आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा  राक्षस बलुतेदारांपुढे उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसाय  कालबाह्य झाले, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. परिणाम असा झाला, की अनेक बलुतेदारांवर उपासमारीचे संकट उभे राहिले. शिक्षणाचा प्रश्न तर दूरवर राहिला.
 बलुतेदारांमध्येच पूर्वी समावेश असलेले मातंग व चांभार यांना शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देऊ केले खरे;परंतु त्यांनाही हव्या तशा सुविधा पुरवण्यात शासन प्रशासनाकडून पुरवण्यात येत  नसल्याचे दिसून येते. खºया अर्थाने शासनच काय पण प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करताना लोकप्रतिनिधींच्याही  नजरेस बलुतेदारांची जगण्यासाठीची धडपड दिसते. त्यांचे हलाखीचे जीवन, व्यवसायांना लागलेली घरघर, खुंटलेला विकास हे सर्व काही  उघड्या  डोळ्यांनी  दिसून येते़ मात्र, त्याकडे राजकीय मंडळी जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत करीत असतात. बलुतेदार घटकांची लोकसंख्या काही अपवाद सोडला, तर कित्येक गावांमध्ये बोटावर मोजण्याइतकीच असते. नेमका याच गोष्टींचा फायदा घेत  निवडणूक जिंकली जाते. बलुतेदारांमध्ये प्रामुख्याने लोहार, सुतार, सोनार, परिट ( धोबी), कुंभार, न्हावी, शिंपी, साळी,जोशी आदींची मिळून महाराष्टÑामध्ये जवळपास पाच कोटींच्या आसपास लोकसंख्या आहे.  मात्र, या लोकसंख्याचा वापर राजकारण्यांकडून फक्त निवडणुकीतील मतांपुरताच केला जातो.  निवडणूक  आली  की, आम्ही   बलुतेदारांसाठी  हे  करू, ते करू अशा भुलथापा मारून मते मिळवण्यात यशस्वी होतात. त्यानंतर मात्र दिलेल्या आश्वासनांचा दुसºया निवडणुकीपर्यंत विसर पडलेलाच दिसून  येतो.
लोहार आणि सुतार हा समाज त्यापैकीच  एक.  राजाच्या दरबारी लोहाराला विशेष स्थान होते. युद्धसंपन्न अशा शस्त्रागाराचा भार त्याच्या डोक्यावर असे. मान-सन्मान होता़ लढाईतील विजयाचा  विशेष वाटा  लोहाराचा असे. कधीकाळी श्रीमंती भोगणाºया या समाजाची आर्थिकस्थिती काळानुरूप बदलत गेली. उद्योगधंद्यांना उभारी देण्यात अग्रक्रमावर असलेल्या लोहार समाजाला संजीवनी देण्याची गरज आहे. उद्योगासाठी त्याच्यातील गुणकौशल्याचा वापर करून  घेण्यासाठी  संधी निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून या समाजाला  एखाद्या केंद्रीय  संस्थेशी जोडणे  काळाची  गरज  बनलेली आहे.  सुतार समाजाचेही तसेच झाले. एखाद्या लाकडातून किती सामान गवसेल? कोणत्या लाकडाचं आयुष्य किती? असा अंदाज वाढीबुवा हात लावून सांगायचा. कोणते शास्त्र होते त्याच्याजवळ, माहिती नाही. आता त्याच्या अंगभूत गुणांचे  काय झाले? त्याच्या व्यवसायावर ‘फर्निचर’ने अतिक्रण केले. प्लायवूड, सनमायका, फोरमायका या सारख्या बाजारात  सहज मिळणाºया  गुळगुळीत अन् चकचकीत सामानामुळे वाढीबुवाच्या  पोटापाण्याचा प्रश्न आणखी जटील बनला. आता तर अन्य समाजानेही त्याचा व्यवसाय ताब्यात  घेतल्याचे दिसून येते़ कधी संपूर्ण गावाची गरज भागवणारा हा समाज आता परागंदा झाला आहे, हे वास्तव पुसता येत नाही. मुळातच या समाजाला केवळ शिक्षण सुविधाच नाही तर त्याच्यातील कौशल्याचा, कलाकुसरीचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी त्याला  उद्योगात स्थान देणे, रोजगार देण्याचे कर्तव्य आता सरकारला, प्रशासनाला पार पाडावयाचे आहे. त्यामुळे  या  बांधवांसाठी ‘लोहार सुतार आर्थिक विकास महामंडळ’ अशा  अशी प्रशासकीय संस्था निर्माण करावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती, शिष्यवृत्ती, समाजातील ज्येष्ठांना निवृत्तीपेन्शनची व्यवस्था अशा काही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे अपेक्षित आहे़   याशिवाय परिट(धोबी) चांभार, कुंभार, न्हावी  या प्रमुख समाजघटकांतील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.         
या संदर्भात विश्वकर्मा लोहार सुतार विकास परिषद, नागपूर यांनी काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. देशात श्री विश्वकर्मा जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, महाराष्ट्र राज्यस्तरावर लोहार सुतार आर्थिक उन्नती महामंडळाची निर्मिती करण्यात यावी (याद्वारे दीर्घ मुदतीचे आणि कमी व्याजाचे कर्ज अपेक्षित), उपराजधानीतील एमआयडीसीमध्ये उद्योगनिर्मितीसाठी  दीर्घ लीजवर जागा देण्यात यावी, राजधानी मुंबई आणि उपराजधानीत अधिवेशन काळात समाजातील कारागिरांच्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीस प्रोत्साहन द्यावे, समाजबांधवांना मोफत किंवा ना नफा ना तोटा या  तत्त्वावर लाकडाचे वितरण करावे, राज्यातील महत्त्वाच्या शहरात वसतिगृहाची  निर्मिती करण्यात यावी, लोहार सुतार समाजातून एका व्यक्तिची विधानपरिषदेत नियुक्ती करावी, केंद्र सरकार वा राज्य  सरकारच्या  मालकीच्या कारखान्यांकडून समाजाला लोखंडाचा स्वस्त दरात पुरवठा व्हावा आदींचा यात समावेश आहे.

©संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 15 March 2020

वाहतूक नियमांबाबत समाज संवेदनशील नाहीच...


वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणाºयांची फार मोठी आहे. अगदी तरुण मुले, मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोकांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात. सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून हॉर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नलची वाट पाहणे हा गुन्हा आहे. अनेकदा या अगदी क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याचा अनुभव येत असतो.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव  आदीमुळे भारतातील  सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.

आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाºया वाहनांपासून ते जलद धावणाºया दुचाकी, जीप, मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, कंटेनर, सीमेंट वाहून नेणारी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात. साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होते.त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाºया लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय सर्वजण हतबल आहेत.

रस्त्यावर सर्वाधिक कोण...
आपण अनेकदा बोलून जातो की रस्त्यांवर गर्दी अधिक आहे. भरदुपारी काम करणारी मंडळी आपापल्या कार्यालयात असेल, तर ही रस्त्यांवरील मंडळी कोण आहे. तर यात सर्वाधिक संख्या ही रिकामटेकड्यांची आहे. ज्यांना काहीही काम नाही आणि यात सर्वात प्रमाण हे गुन्हेगारांचे आहे. ही मंडळी आपले सावज टिपत असतात. यात तरुणांचा अधिक भरणा दिसून येतो. यात बेरोजगारही आहे. याशिवाय मार्केटिंगच्या नावावर अनेकजण रस्त्यांवर असतात...त्यांची वाहने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होईल, अशापद्धतीने ठेवलेली असतात.  काहीजण नुसतीच फिरायला आलेली असतात. काही ग्राहक असतात, काही दुसºया शहरातून आलेली असतात. या सर्वांची वर्गवारी केली तर समाजातील एक छुपी बेरोजगारी आपल्याला दिसून येते. [ हा एक वेगळा विषय असला तरी त्याचा संबंध रस्ते अपघातासोबत आहेच ]




माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळ्या प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त आॅफिस वा दुकानात  जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील. यातील बºयाचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे.

 मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या आॅफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाºया व्यक्ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटवरून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.

भविष्यात  प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा  आॅपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला आॅनलाईन घेता येईल. औषधीही घरपोच मिळतील. लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रिया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे  आदी कामे इंटरनेटच्या साहाय्याने  करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही. भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाºया खर्चातही झपाट्याने घट होत आहे. 


दुसरीकडे समाजविघातक समस्याही या इंटरनेटने निर्माण केल्या आहेत. हे विसरून चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा वाहतुकीशी संबंध जोडावा, अशी स्थिती तरी नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. आपण अजूनही काळाची पावले ओळखली नाहीत़, हे फार मोठे दुर्दैव आपल्या समाजाचे आहे आणि  त्यातून विविध अडचणी, समस्या निर्माण होतात. समाज निकोप, सुरक्षित तरच देश बलशाली, हे सूत्र कायद्याने शिकवण्याची गरज नाही, हे ज्या दिवशी सर्वांना समजेल, तो दिन सोन्याचा असेच म्हणावे लागेल.

महामार्गावरील अपघातांची कारणे

* जड वाहनांच्या चालकाने २४ तासांतून किती वेळ वाहन चालवावे, यावर बंधन नाही
* वाहनांना थांबण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘सब वे’ चा अभाव
* लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना आराम करण्यासाठी सोय नाही
* मोठ्या वाहनांकडून पहाटेच्या सुमारास अपघात होतात. याबाबत जागृती नाही
* वाहनचालकाची झोप न होणे हेही मुख्य कारण
* अपघातग्रस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी सोय जवळजवळ उपलब्ध नसणे


संजय इस्तारी मुंदलकर

© NITYAAYAN

जादुई स्वरांची मल्लिका:भारतरत्न लता मंगेशकर



लता मंगेशकर...भारताच्या गानकोकिळा...भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ मिळवणाºया दुसºया गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशके रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या  नावाची दखल गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आले आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर २० भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारत नव्हे तर जगभरातील रसिकांवर त्यांची मोहिनी आहे.


लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. दीनानाथांची नाटक संस्था होती. ते स्वत:ही उत्तम गायक होते. लतादीदींना वडिलांकडूनच संगीताचे प्रशिक्षण मिळाले. अमान अली खाँ साहेब आणि अमानत खान यांच्याकडेही लतादीदींनी संगीताचे धडे गिरवले. घरातून संगीताचा वारसा आणि गुरुकृपा यामुळे लतादीदींसारख्या हिºयाची  झळाळी  वाढण्यास कितीसा वेळ लागणार? मात्र त्यालाही दृष्ट लागली. दीनानाथांचे १९४२ मध्ये निधन झाले आणि घराचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर आला. वडिलांच्या निधनानंतर लतादीदींसाठी गाणे केवळ आवड  न  राहता गरज बनली.  लतादीदींनी १९४२-४८ या काळात हिंदी आणि मराठी अशा आठ चित्रपटांत भूमिका केल्यात. 


 लतादीदींनी काम केलेला पहिला चित्रपट होता नवयुगचा ‘पहिली मंगळागौर’. याच चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई...’ हे गाणे गायिले. दीदींची गायनाची औपचारिक सुरुवात झाली ती ‘किती हसाल’ या चित्रपटाने (१९४२). पुढे दीदींनी ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले . लतादीदी जेव्हा गायन क्षेत्रात आल्या तेव्हा नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली असा आवाजांची चलती होती. अशा काळात आवाज पातळ असे सांगून लता दीदींना संगीतकार नाकारत होते.  संगीतकार गुलाम हैदर  यांनी  सुरुवातीला त्यांना संधी दिली नव्हती. मात्र, १९४९ मध्ये नियतीने लता मंगेशकर या नावाला एका झंझावाताचे रुप दिले. बरसात, अंदाज, दुलारी आणि महलसाठी दीदींनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर जे घडले तो इतिहास सर्वांना माहित आहे.

एस. डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीताकारांसोबत लतादीदींनी भारतीय चित्रपटसंगीताचे विश्व गाजवले. लतादीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी रसिकांना समृद्ध केले. लतादीदींनी भारतीय जनमानसाचे कान तृप्त केलेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे  ठरणार नाही. आतापर्यंत दीदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली.

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा  लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असे सांगितले जाते.
लतादीदीने मराठीत अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करावा. लागेल. लतादीदीने स्वत: ‘आनंदघन’ अशा नावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.


© संजय इस्तारी मुंदलकर        

Sunday, 1 March 2020

जयश्री गडकरांचं अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनय


अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या मनावर पाच दशके अधिराज्य गाजवणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सदाशिवगड येथे सामान्य कोकणी कुटुंबात जयश्री गडकर यांचा जन्म झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र झाले नाही. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या ‘अशी मी जयश्री’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे  त्यांनी  गायनाचेही धडे घेतले.
१९५५ साली व्ही. शांताराम यांच्या झिनक झनक पायल बाजे’ मधील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाºया तरुणींपैकी जयश्री गडकर एक होत्या. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ  १३ वर्षे. १९५६ साली ‘दिसत तसं नसतं’ मध्ये अभिनेते  राजा गोसावी  यांच्यासोबत जयश्री यांनी काम केले होते. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी नृत्य केले होते.
याच काळात रशियाचे नेते क्रुश्चेव भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी ‘घनश्याम सुंदरा...’ आणि ‘लटपट लटपट तुझं चालणं...’  गाण्यांवर नृत्य सादर केले.  छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली. ही छायाचित्रे दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली. त्यामुळे ‘दिसतं तसं नसतं’ मध्ये जयश्री गडकर यांना नृत्याची संधी मिळाली होती. दरम्यान, राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि ‘गाठ पडली ठका ठका’मध्ये नायिकेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहले नाही. सूर्यकांत हे नायक होते. पुढे ही जोडी सांगत्ये ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, लाखात अशी देखणी, साधी माणसं, सून लाडकी  या   घराची आदी चित्रपटांतून एकत्र झळकली. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सूर्यकांत यांच्याशिवाय अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबतही जयश्री यांची आॅन स्क्रीन जोडी जमली होती. राजा गोसावींसोबत तब्बल नऊ चित्रपटांत जयश्री यांनी काम केले होते. ‘सांगत्ये ऐका’मधील ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी अतिशय गाजली होती. तसेच, ‘साधी माणसं’ मधील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिगणी ठिणगी वाहून दे...’ ही गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली. मराठी चित्रपटांत सोज्वळ आणि तमाशाप्रधान भूमिका साकारून त्यांनी अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडवले होते.

लग्नानंतरही अभिनय...
१९७५ साली बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. अशी असावी सासू, हे दान कुंकवाचे, मुंबई ते मॉर्शिअसमध्ये ही जोडी एकत्र झळकली. ‘ससुराल’,‘लव कुश’, ‘डिटेक्टिव’, ‘संपूर्ण महाभारत’,‘जियो तो ऐसे जियो’ हिंदी चित्रपटांतूनही जयश्री यांनी भूमिका साकारल्या. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले.
 साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू  लावतेसाठी सलग तीन वर्षे राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जयश्री यांना मिळाला. जयश्री गडकर यांनी दग्दर्शन क्षेत्रातसुद्धा यशस्वी वावर केला.‘अशी असावी सासू’ हा चित्रपट त्यांनी  दिग्दर्शित केला होता. ‘अशी मी जयश्री’ हे जयश्री गडकर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. मराठमोळ्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकू न घेणाºया जयश्री गडकर  यांची  आत्मकथा वसंत भालेकर यांनी  शब्दांकित केली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया जयश्री गडकर  यांनी २९ आॅगस्ट २००८ रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

कैकयीऐवजी कौशल्या ...
भारतीय पहिली महामालिका ‘रामायण’मध्ये जयश्रींना  कै कयी बनायचे होते. तसे त्यांनी रामानंद सागर यांच्याकडे बोलून दाखवले. त्यावर ‘ही भूमिका  तुला दिली तर लोक मला शिव्या देतील, असे रामानंद यांनी जयश्रींना उत्तर दिले होते. कौशल्याच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच तुझंच नाव आम्ही ठरवलं होतं आणि  ही भूमिका तूच करावी, असे रामानंद सागर यांनी जयश्रींना म्हटले. विशेष असे की ‘रामायण’मध्ये दशरथ बनले होते त्यांचे पती बाळ धुरी.


© संजय इस्तारी मुंदलकर
   

Saturday, 29 February 2020

तेलाचं बोटं...

 लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.


प्रसंग १ : लहानपणी आई केसाला फक्त तेलाचं बोट लाव, असं सांगायची. आम्हाला मात्र मोठ्या अनिच्छेनं केलेल्या आंघोळीनंतर केसांना चिप...चिप करायची सवय होती. त्यामुळं हा प्रकार आईच्या लक्षात आला की, कधी कधी तिच्या हातचा धपाटा बसायचाच बसायचा! मात्र, आई फक्त तेलाचं बोटच लाव, असं का म्हणते, हे काही अजूनही समजलंं नाही.
प्रसंग २ : एकदा आई जेवताना म्हणाली होती, की भाजी ‘लव लव’ खा. असं ती अनेकदा म्हणायची. यातून हा जेवायचा, तो जेवायचायं, असं  तिला सूचवायचं असे. ‘लव लव’ खा, या वाक्याचा अर्थ तिला भाजीला भाकर ही ‘लावून लावून’ खा अर्थात भाजी थोडी खा. जेवणारी मंडळी बाकी आहे, असं काहीसं सांगण्याचा तिचा हेतू असायचा; पण आईच्या बोलण्यातून येणाºया तेवढ्या दोन-चार वाक्याचा अर्थ समजायला आम्हाला अर्ध आयुष्य लागलं.
प्रसंग ३ : तिदस्ताच्या दिवाळीपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या आसपास पोहोचले होते. तो ८२ रुपयांवर अनेकदा टांगता राहिला़ आज काल ८० रुपयांच्या आसपास झुलता असतो. सांगायचे हे की पेट्रोल महाग झाले तरी दुचाकी वा तत्सम वाहने वापरणाºयांची संख्या कमी झालेली नाही़़़होणारही नाही. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने महागाईची झळ नको तितकी सोसावी लागत असली तरी भारतवासी ज्याप्रमाणे नेटपँक कितीही महाग झाला तरी मोबाईलचा वापर करणे सोडणार नाही, त्याचप्रमाणे वाहन विकत घेणे आणि त्याला रस्त्यावर दौडवणे (चालवणे) सोडणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. अर्थातच आजच्या अर्थपूर्ण आर्थिक घडीला मागणी तसा पुरवठा होण्याची स्थिती नाहीच मुळी...कारण लोकसंख्या...





सांगायचं असे की १९ व्या आणि २० व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे अर्थात विविध संशोधनामुळे जगाचा जन्मदर  वाढला. यात मनुष्याचे आयुर्मान वाढले असले तरी तीव्र गतीच्या लोकसंख्यावाढीमुळे अन्नधान्य, निवारा, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी यासारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात  प्रगती साधली असली तरी आता कोणत्याही क्षेत्रातील विकासाला ही अवाढव्य  लोकसंख्या मुख्य अडथळा ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी आपली, समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जगाची ऐशोआरामाची वृत्ती वाढली. दुचाकी, चारचाकी वाहनांची गरज सरली; पण शौक निर्माण झाला. कुठलीही गरज नसताना महागडे मोबाईल हाती आले. सर्व आयुष्य आँनलाईन झाले. कुणालाही वेळ राहिला नाही़ संवाद संपला. सुख-दु:खाची विचारणा संपली़ महिला, बालकांवरील अत्याचार वाढले आणि अधोगती सुरू झाली.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्यादिन साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.

श्वास तुटत चालला 

लोकसंख्यावाढीने  केवळ खाण्यापिण्याच्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर जमिनीतील पाणी संपतेय, प्रदूषण इतके वाढले की हवेतील प्राणवायू संपतोय, दुष्काळ पडतोय, महापूर येतोय, सूर्याचं  तापमान  वाढतेय, हे सर्व एका दिवशी झालेले नाही, तर मागील अनेक वर्षापासून तीळतीळ  सुरू  आहे आणि त्यातूनच मानवाचा श्वास तुटत चालला आहे.  परिणामी मोठ्या समस्या निर्माण झाल्याने विकासकामे जागच्या जागी थांबली. लोकांना मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या.  मुलगाच हवा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म  दिला जातो. अशिक्षित असो शिक्षित लोकसंख्यावाढीच्या परिणामाची चिंता कुणातही दिसून येत नाही. यावाढीमुळेच  समाजात विसंगत आर्थिक स्थिती  निर्माण झाली. आजच्या घडीला एकीकडे एका घरात सरासरी चार-चार दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी वाहन, प्रशस्त  महागडे घर आणि आधुनिक सुविधा दिसून येत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, गरिबी, एक वेळच्या भुकेसाठीही अन्न मिळत नाही, भीक मागण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, हे विरोधी  चित्र अनुभवास येते. ही स्थिती बदलण्यासाठी  लोकसंख्या  नियंत्रणाचा  उपाय होता़ मात्र, ती वेळही  कधीचीच निसटून गेली आहे. आता ओढूनताणून केलेल्या  उपायांचा परिणाम तत्काळ  दिसून  येणार नाही. त्यासाठी पुढील १०० वर्षे वाट पाहावी  लागेल, असे तज्ज्ञ सांगतात़ ते सर्व पाहायला आम्ही असू की नाही, शंका आहे. तितकीच शंका या जगाच्या अस्तित्वाबाबतची आहे.         
                                               
© संजय इस्तारी मुंदलकर                                                                    

Tuesday, 18 February 2020

बेटी बचाओ, राजनिती पढाओ  

यंदाच्या १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्टÑात शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले.  यात भाजपचे  २४, शिवसेनेचे १८, राष्टÑवादीचे  चार, तर काँग्रेस आणि एमआयएमचा  प्रत्येकी एक खासदार  निवडून आला आहे. यापैकी आठ महिला खासदार संसदेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात भाजपकडून सर्वांधिक पाच, शिवसेना, राकाँ, अपक्ष  यांचे प्रत्येकी एकेक मिळून एकूण आठ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून                        एकू ण ८६७ उमेदवारांपैकी ८० महिला उमेदवारांना विविध पक्षांनी निवडणूक  रिंगणात उतरवले. यापैकी आठ महिलांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकीय कुटुंबातीलच आहेत. यात मुलगी, सून, अशी नाते जपणाºया आहेत. सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडून आल्या.  भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रीतम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हीना गावीत (भाजप-नंदुरबार), पूनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या सर्व लोकसभेसाठी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
बारामती मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांच्यावर मात केली.  सुळे यांनी आपल्या विजयाची हँट्ट्रिक केली आहे. कारण त्या  तिसºयांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. मागील  निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचेच शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व  माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. मागील निवडणुकीत त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.(यंदा मात्र त्यांचा हा मान अन्य ओडिशातील महिला उमेदवाराकडे गेला आहे.) २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्टÑवादीचे मनीष जैन यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता.
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांना पराभूत केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि  त्या विजयी ठरल्या. आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यावर मात केली. यंदा त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या निवडणुकीत हीना गावीत यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीतही पूनम -प्रिया असाच सामना रंगला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यां                                                     नी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ  यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आनंदराव आडसूळ यांनी राष्टÑवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना  पराभूत केले होते. पराभवाची परतफे ड करीत नवनीत लोकसभेवर निवडून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राकाँ उमेदवार धनराज महाले यांचा पराभव केला.
देशपातळीवर पाहिले तर १७  व्या लोकसभा निवडणुकीतील ५४२ वजयी उमेदवारांत महिला सदस्यांची संख्या केवळ ७८ इतकी आहे. विशेष म्हणजे महिला खासदारांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून त्यांची टक्केवारी ही १७ इतकी आहे. यापूर्वी महिला सदस्यांची सर्वाधिक संख्या ही नवव्या लोकसभेत २८ इतकी होती. राष्टÑीय निवडणूक आयोगाद्वारा लोकसभेच्या  ५४२ जागांबाबत केलेल्या निकालानुसार, यंदा निवडून आलेल्या सर्वाधिक ४० महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर  निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून  संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजय मिळाला आहे.याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष  राहुल  गांधी यांचा पराभव करत  विजय मिळवला  आहे. मनेका गांधी सुल्तानपूर आणि अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल  यांनी मिर्झापूर येथून निवडणूक जिकंली आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा , प्रज्ञा ठाकूर भोपाळ, मीनाक्षी लेखी  नवी दिली, किरण खेर चंडीगड आणि रिता बहुगुणा जोशी यांनी अलाहाबाद  येथून विजय मिळवला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून  तृणमूल काँग्रेस उमेदवार मुनमुन सेन, सलचर येथील सुष्मिता देव, सुपोल येथून रंजीत रंजन कन्नोज येथून समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, रामपूर येथून भाजप उमेदवार जयाप्रदा यांचा मात्र पराभव झाला.
यात उल्लेखनीय असे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून एकूण ८ हजार ४९ उमेदवार मैदान  उतरले होते. आणि यापैकी केवळ ७२४ महिला उमेदवार होत्या, जे प्रमाण कमीच आहे. काँगे्रसने सर्वाधिक ५४  आणि भाजपने ५३ महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवले होते. अन्य राष्टÑीय पक्षात बसपाने २४, तृणमूल कांग्रेसने २३, माकपाने १०, भाकपाने चार आणि राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने  एक महिला उमेदवाराला तिकीट दिली.अपक्ष महिला उमेदवारांचा संख्या २२२  इतकी होती, तर चार ट्रान्सजेंडर उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राजकीय पक्ष अपयशी

यंदा राज्यातील राजकारणाला दोनदा उभारी मिळाली. मे महिन्यात लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के)उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती.
याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता  टिळक भाजप (पुणे), मंजुळा  गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज   बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.

नातेसंबंधांना प्राधान्य

भारतीय लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला  नाही, जी  काही  उमेदवारी दिली आहे, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून येते. कारण तेच ते चेहरे पुढे आणले आहे. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिले आहे. यावरून  नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले  असे म्हणता येईल. राष्ट्रीयच काय पण प्रादेशिक पक्षानेही आपल्या किती जागा निवडून येवू शकतात, याचाच विचार केल्याचे दिसून येते.
एकीकडे महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्षित करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सदोदित चालू आहे. भारतीय लोकसंख्या ही आता तरुणांची आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते.
भारतीय राजकारणाने आता भारतीय महिलांना अन्य क्षेत्रासोबतच  राजकीय क्षेत्र  पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांचा हव्यास धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन, देशाच्या दुसºया संरक्षण मंत्री तसेच विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हेच दाखवून दिले आहे. मात्र, त्यासाठी महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर ठेवता कामा नये.

© संजय इस्तारी मुंदलकर            

Tuesday, 4 February 2020

माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये


चार्ली चॅपलिनच्या अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना  कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभे राहते; पण अनेकांना हसवणाºया या  चेहºयामागचे दु:ख कोणाला फारसे माहित नसेल.  चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं; पण माझं  हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये. त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
चार्ली यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन असे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या  नवव्या  वर्षीच  नोकरी करावी लागली. बालपणीच त्यांचे आईवडील अलग झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या १३ वर्षी चार्ली यांचे शिक्षणही सुटले.
चार्ली यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास  सुरुवात केली होती. अवघ्या १९ व्या  वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी  करार  केला  आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अभिनयाची सुरुवात अमेरिकेत केली. १९३० त्या सुमारास त्यांना आठवड्याला १५० डॉलर्स मिळत होते. यावर्षी त्यांनी तब्बल १३ चित्रपट निर्मात्यांशी करार केला होता. १९१८ सालापर्यंत ते जगातील लोकप्रिय चेहरा बनले होते.
१९१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. १९२१ मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली.  चार्ली यांनी  अ वूमन आॅफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाईम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी  चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट आजही पसंत केले जातात. चार्ली  यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी  जग  युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली लोकांना हसवत होते.

आयुष्यही वादात

खासगी आयुष्यासोबतच चार्ली  यांचे व्यावसायिक आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होते.  १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटाने फारच वाद झाला होता. यात  चार्ली  यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकेच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.
चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती.  या लग्नातून त्यांना ११ अपत्ये झाली. त्यांनी पहिले लग्न १९१८ मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केले; पण हे लग्न दोन वर्षेच टिकले. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि  १९४३  मध्ये १८ वर्षांच्या उना ओनिलसोबत संसार थाटला. त्यावेळी चार्ली ५४ वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.

महात्मा गांधींचे चाहते

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली  भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. मात्र, असे सांगण्यात येते की, गांधीजींना चार्ली यांना कधी भेटायचेच नव्हते. नंतर त्यांना कळले की चित्रपटात अभिनय करणारे चार्ली यांना गरिबांबद्दल कळवळा आहे़ यानंतर त्यांनी चार्लीची भेट घेतली. यावेळी दोघांत खादीविषयी मोठी चर्चा रंगली होती, असेही सांगितले जाते. बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांत चार्ली चॅपलिन यांची नक्कल केली होती.

अभिनयाला अमेरिका घाबरली

एखाद्या विनोदी (कॉमेडियन) अभिनेत्यापासून कुण्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न विचारला तर कुणीही बुचकळ्यात पडेल. एखाद्या कलाकाराच्या अभिनयापासून कुण्या देशाला काय धोका निर्माण होणार; परंतु असे घडलेले आहे आणि ते अमेरिकासोबत...चक्क एका महा
शक्तीबरोबर!
साधारण: १९५०-६० च्या दशकात संपूर्ण जग दोन भागात विभागल्या गेले होते. एका बाजूूला अमेरिकाचे नेतृत्व, तर दुसºया बाजूला साम्यवादाचे समर्थक होते़ अर्थातच या गटाचे नेतृत्च रशियाकडे होते. त्याच काळात हॉलीवूडमध्ये चार्ली चॅपलिन सुपरस्टार होते. मात्र अमेरिकाची गुप्तचर संस्था एफबीआयला  चार्ली हे साम्यवादी विचारधारापासून प्रभावित असल्याचा संशय होता. तसेच, ते आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना साम्यवादी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एफबीआयचे म्हणणे होते. विशेष म्हणजे चार्ली यांच्या खासगी आयुष्यातील घटनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. सन २०१५ मध्ये ब्रिटनची गुप्तहेर संस्था एमआई-5ची काही गुप्त दस्तावेज सार्वजनिक करण्यात आला. त्यातून ही बाब उघड झाली होती. त्यावेळी चार्ली सर्वाधिक काळ लंडनमध्ये व्यतित करत होते. त्यामुळे एमआई-5 वर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, यातून काहीही सिद्ध झाले नाही. १९५३ मध्ये चार्ली चॅपलिन अमेरिकाबाहेर गेले असता त्यांना पुन्हा अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर ते  स्विर्त्झलँडमध्ये राहावयास गेले
२५ डिसेंबर १९७७  रोजी म्हणजे नाताळच्या दिवशीच वयाच्या ८८ व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे निधन झाले; परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचे कॉफिनच चोरल्याचे चौकशीतून समोर आले. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी ६ लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती; परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह सहा फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.

© संजय इस्तारी मुंदलकर

Monday, 3 February 2020

कथेवरून उंची गाठलेला ‘शराबी’



अनेकदा चित्रपटात दारू पिणाºयाचे दृश्य असतात़ काहीजण दारूड्याच्या भूमिकेतही असतात; परंतु तो कथेचा भाग असतो़ मुख्य कथानकापासून (screen play) तो बराच लांब असतो़ काहीवेळा उपकथानक म्हणूनही तसे काही दृश्य चित्रित केले जातात. चित्रपटाच्या एकूण यशात त्याचे स्थान दुय्यमच ठेवले जाते; पण अख्खा चित्रपट दारूड्याच्या भूमिकेवर आधारित असेल तर....? असा चित्रपट बॉक्स आॅफिसवर (box office)  गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश मेहरा दिग्दर्शित शराबी चित्रपटाने मात्र मोठे यश मिळवले़ अगदी साध्या सोप्या कथेच्या सक्षम कथानकावर शराबी हिट ठरला.
भारतीय चित्रपटक्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपट ‘शराबी’ला मागील वर्षात तब्बल ३५ वर्षे पूर्ण झालेत. अमिताभ यांच्यासह  जयाप्रदा, प्राण, दीपक पाराशर, ओम प्रकाश, सत्येन कपूर आदींची भूमिका असलेला हा चित्रपट १८ मे १९८४  रोजी पडद्यावर आला आणि हिट ठरला.(hit on screen)
अगदी साध्या कथेवरून उंचीचा कळस गाठलेला चित्रपट म्हणजे ‘शराबी’ होय असे म्हणता येईल. मुलाच्या दारू पिण्यावरून पित्याशी होत असलेले वाद, गैरसमज असे या चित्रपटात दिसून येते. अन्य चित्रपटासारखे याठिकाणी बाप हा दारूडा  नाही, तर मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्यावरून बाप (प्राण) आणि मुलगा (अमिताभ) यांच्या वादाला सुंदर चित्रीत करण्यात आले आहे. सोबत आहे जयाप्रदासोबतचा प्रेमालाप तसेच मर्मभेदक संवाद आणि गाणी.
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी कथेला दारूड्याचा चित्रपट असे काही होऊ दिले नाही, हेच त्यांचे मोठे यश आहे. या चित्रपटाचा बिग-बी यांच्या कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये समावेश होतो.‘शराबी’ एक किस्सा सांगण्यात येतो की शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या हाताला अपघात झाला आणि त्यांना पूर्ण शूटिंग करताना त्यांना हात खिशात ठेवून काम करावे लागले. शराबी पाहताना ही बाब स्पष्ट जाणवते. अमिताभ आपला डाव खिशात ठेवून असल्याचे दिसून येते. ती घटना अशी की दिवाळीच्या सणादरम्यान ‘शराबी’चे शूटिंग अर्थात छायाचित्रण सुरू होते. एक जळता फटाका अमिताभ यांच्या हातावर पडला आणि त्यामुळे हात भाजला.  चित्रीकरणाच्या तारखा ठरल्यामुळे शूटिंग रद्द करणे शक्य नव्हते. म्हणून उशीर न लावता  काम  सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जळालेल्या हातासोबतच शूटिंग पूर्ण केली. बिग-बी यांना चित्रपटात आपला डावा हात खिशात ठेवावा लागला; पण त्याकाळी लोकांमध्ये ही फॅशन झाली होती. याशिवाय ‘इनक्लाब’ मध्येही त्यांना आपला डावा हात खिशात ठेवावा लागला होता. याबाबत अमिताभ सांगतात, की त्यावेळी हातावरील घाव भरलेले नव्हते. त्यामुळे हा डावा हात खिशात ठेवावा लागत होता. अनेकांना ती फॅशन असल्याचा समज झाला होता. विशेष म्हणजे लोकांनी तिचे अनुकरणही केले होते.

३५ हजार फुट उंचीवर कल्पना

अमिताभ यांनी एका आठवणीत सांगितले होते, शराबीची कल्पना १९८३ मध्ये सूचली होती. त्यासाठी त्यांचा पहिलाच जागतिक दौरा सुरू होता. त्यावेळी बिग-बी आणि त्यांच्या टीमने अमेरिका, इंग्लंडमधील १० शहरांत कार्यक्रम सादर केले होते. न्यू यॉर्कहून त्रिनिदाद, टोबागो प्रवासादरम्यान प्रकाश मेहरा यांनी वडील-मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटाची कल्पना त्यांच्यासमोर ठेवली, ज्यामध्ये मुलगा एका मद्यपीच्या भूमिकेत असेल. बिग बी म्हणाले की, अटलांटिक महासागरावर हवेत सुमारे ३५ हजार फुटांच्या उंचीवर कल्पना सूचली होती.
संवाद लहान ठेवण्याचा सल्ला
आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारूला कधीच हात न लावणारे अमिताभ यांना चित्रपटात एका दारू पिणाºया मुलाचा ‘परफेक्ट’ असा अभिनय करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रकाश मेहरा यांना संवाद लहान लिहिण्याचा सल्ला दिला. कारण नशेत डायलॉग बोलण्यास वेळ लागतो. बिग बी नुसार, पहिल्या दिवशीच्या  शूटनंतर मी सर्व गोष्टींचे निरीक्षण करून प्रकाशजींना सांगितले की, चित्रपटात मला जास्त वेळ नशेत राहायचे आहे आणि डायलॉग लांब असतील तर बोलायला वेळ लागेल. कदाचित चित्रपट पाच तासांचाही होईल. त्यानंतर काही सीन लहान करण्यात आले. असे सांगण्यात येते की काहीजण बारमध्ये अमिताभ यांचे घड्याळ, सोन्याची साखळीची चोरी करतात, ते दृश्य खुद्द बिग बी यांनी कोरियोग्राफ केले होते.

गाणीही लोकप्रिय (best songs) ‘शराबी’च्या यशात जितका वाटा कथा, पटकथा, संवादा आदींचा होता, तितकाच वाटा गाण्यांचाही होता. संगीतकार बप्पी लाहिरी यांनी सर्व गीतांचा उत्कृष्ट बाज चढवलेला.  दे दे प्यार दे...,  जहाँ मिल जाए चार यार..., इंतेहा हो गयी..., मुझे नौलखा मंगा दे...असो
की, मंझिले अपनी जगह , या सर्वांना  बप्पीदांनी न्याय दिला. अंजान आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरांनीही लिहिलेली ही सर्व  गाणी  हिट ठरली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही गाणी आजही सर्वांना ऐकावीशी वाटते. प्राण यांच्याशी कौटुंबिक वाद असो, ओम प्रकाश यांच्यासोबत मन मोकळे करणारे क्षण असो वा पे्रयसी जयप्रदासोबत प्रीतीचा प्रसंग असो अमिताभ यांनी सकस अभिनय केल्याचे दिसून येते. शराबीतील ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी, वरना ना हो, हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता. 

© संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 2 February 2020

ब्रिटनची ए (ब्रे) क्झिट...

सन २०१६ पासून सुरू झालेल्या ताणतणावानंतर ब्रिटनने ३१ जानेवारी २०२० रोजी युरोपीय महासंघातून बाहेर पडल्याचा आपला निर्धार पूर्ण केला. यावर पंतप्रधान बोरीस यांनी आपल्या देशात नवी पहाट उगवली ाहे. बदलांच्या क्षणात नव्या कर्तृत्वासाठी व्यासपीठ सज्ज झाले असून देशाला एकत्र करत पुढे नेणे हे माझे पंतप्रधान म्हणून कर्तव्य असल्याचे म्हटले आहे़ तसेच, एक नवी सुरुवात असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जॉन्सन यांनीच ब्रेक्झिटसाठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला होता. ब्रेक्झिटच्या मागणीला जून २०१६ मध्ये सर्वांत आधी संडरलँड नावाच्या शहराने सहमती दर्शवली होती. दुसरीकडे ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर युरोपसाठी नवी पहाट उगवेल, असा विश्वास युरोपीय महासंघाच्या युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, युरोपीय आयोगाच्या प्रमुख उरसुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय संसदेचे प्रमुख डेव्हिड सासोली यांनी संयुक्तपत्राद्वारे व्यक्त केला. तसेच, युरोपीय महासंघाचे सदस्य असताना मिळणारे फायदे आता ब्रिटनला मिळणार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअरमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. लंडन शहरातील मॉलवर युनियन जॅक फडकवण्यात आला. सर्व सरकारी इमारतींवर लाल, पांढºया आणि निळ्या रंगात रोषणाई करण्यात आली आणि या क्षणाची आठवण म्हणून ५० पेन्सच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याच वेळी हा प्रश्नही मनात निर्माण होतो की, असे काय झाले की साधारण: ५० वर्षांचे राजकीय, आर्थिक संबंध तोडल्याने ब्रिटनवासी आनंद व्यक्त करत आहे. त्यासाठी काही वर्षे भूतकाळात जावे लागणार आहे.
ब्रेक्झिट नेमके काय...
ब्रेक्झिट शब्द ब्रिटन आणि ब्रेक्झिट या दोन शब्दांतून निर्माण झाला आहे. म्हणजेच युरोपीयन महासंघापासून बाहेर पडण्याबाबतच्या करारातून नवा शब्द बाहेर आला आहे. सन २०१६ मध्ये युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्यावर ५२ टक्के-४ ८ टक्के असे मतदान झाले होते. या महासंघात काही युरोपीयन देशांचा समावेश असून त्यांच्यात मुख्यत्वे राजकीय आणि आर्थिक संबंध आहेत. दुसºया महायुद्धानंतर ‘ईयू’ अस्तित्वात आला होता. दोन देशांत आर्थिक संबंध असल्यास त्यांच्या युद्धाची शक्यता नसते. याच संकल्पनेवरच महासंघाने आकार घेतला होता, असे मानले जाते. काळाच्या ओघात महासंघाने मोठे रुप धारण केले असून, त्यांचे आता स्वत:चे चलन (युरो) सुद्धा आहे. यातील सदस्य देश त्याचा वापर करतात. याशिवाय सदस्य देशांतील नागरिकांना अन्य सदस्य देशांमध्ये प्रवास करण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. सर्वकाही व्यवस्थित असताना ब्रिटनने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत आतापर्यंत दोन पंतप्रधानांना आपले पद सोडावे लागले आहे. सर्वांत प्रथम २३ जून २०१३ रोजी तत्कालिन पंतप्रधान डेव्हिड कामरन यांनी पहिल्यांदाच ईयूमधील आपल्या देशाच्या भूमिकेवरील भविष्याबाबत मत व्यक्त केले आणि तेथूनच ब्रेक्झिटला ‘हवा’ मिळाली. अर्थातच यात त्यांची दूरदृष्टी होती. असे असले तरी ब्रेक्झिटच्या ते विरोधातच होते. ही बाब त्यांच्या राजीनाम्यानंतरच दिसून आली.
दुसरे असे की पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी देशावर पडत असलेल्या आर्थिक ओझ्यावर लक्ष केंद्रित केले होते. कारण सन २०१४ मध्ये देशात येणारे विदेशी नागरिकांची संख्या ही देशातील तिसरी मोठी समस्या म्हणून अधोरेखित झाली होती.
दुसरे असे की ब्रिटनमध्ये १९९४ मध्ये जितकी संख्या होती, ती सन २०१४ मध्ये दुप्पट झाली. युरोपीयन महासंघातील सदस्य देशांतील मोठ्या संख्येतील नागरिक रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीसाठी ब्रिटनच्या दिशेने धाव घेत आहे आणि त्यातून सरकारसमोर रोजगार पुरवण्याची आणि लोकसंख्या या दोन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले होते़ यानंतर ब्रेक्झिटचा विचार समोर आला होता. २३ जून २०१६ रोजी घेतलेल्या मतदानात ब्रेक्झिटच्या पाठिंब्यात ५१.९ टक्के मते पडली होती, तर विरोधात ४८.१ टक्के मते आली होती. यात फारसा फरक नसला तरी ब्रिटनने महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता़ यात देशातील ३० दशलक्ष नागरिकांनी भाग घेतला होता. मात्र, त्याचवेळी युनाएटेड किंगडमचा भाग असलेल्या स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडने ईयूमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनमधील सार्वमतामध्ये ५२ टक्के नागरिकांनी ब्रेक्झिटसाठी कौल दिल्याने कॅमेरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी २९ मार्च २०१७ रोजी देशाचे प्रमुखपद स्वीकारले. युरोपीय महासंघाला पत्र लिहून दोन वर्षांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच, ब्रेक्झिटचा फायदा घेण्यासाठी जून २०१७ मध्ये मुदतपूर्व निवडणूक घेतली. मात्र, त्यांच्या हुजूर पक्षाने बहुमत गमावले. मार्च २०१९ मध्ये संसदेने थेरेसा मे यांचा ब्रेक्झिटचा आराखडा फेटाळल्याने त्यांनी जून महिन्यात राजीनामा दिला. त्यानंतर जुलैमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी बोरिस जॉन्सन यांची निवड करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले. पंतप्रधानांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला अधिक गती दिली. नव्या वर्षात म्हणजेच २३ जानेवारी २०२० रोजी ब्रिटनच्या संसदेमध्ये कायदा मंजूर झाला आणि २९ जानेवारी २०२० रोजी युरोपीय संसदेने ब्रेक्झिटला मान्यता दिली़ यानंतर महाराणी ऐलिझाबेथ (द्वितीय) नेही त्यास मान्यता दिली. शेवटी ३१ जानेवारीला ब्रिटन देश अधिकृतरित्या युरोपीय महासंघाबाहेर पडल्याचे घोषित झाले. अशाप्रकारे तब्बत ५० वर्षांचे नाते संपुष्टात आले.
*****
x